शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यांमध्ये कोट्यवधींचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:29 IST

शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला कोट्यवधी रुपये किमती मुद्देमाल अनेक वर्षांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये तक्रारदारच सापडत नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही जप्त केलेल्या वस्तू परत करणे पोलिसांना शक्य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़

लोकमत  विशेषनाशिक : शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांकडून जप्त केलेला कोट्यवधी रुपये किमती मुद्देमाल अनेक वर्षांपासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये तक्रारदारच सापडत नसल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतरही जप्त केलेल्या वस्तू परत करणे पोलिसांना शक्य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़ मात्र; पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी कार्यवाही सुरू केली असून, सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल लवकरच परत केला जाणार आहे़  नाशिक शहरात १३ पोलीस ठाणी आहेत. प्रारंभी भद्रकाली, पंचवटी, सरकारवाडा, सातपूर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे होते़ कायदा व सुव्यवस्था तसेच वाढती लोकसंख्या यामुळे अंबड, उपनगर, इंदिरानगर, गंगापूर व आडगाव या नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली़, तर जानेवारी २०१६ मध्ये म्हसरूळ व मुंबई नाका ही आणखी दोन पोलीस ठाणी कार्यान्वित करण्यात आली़ शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहनचोरी, चोरी, घरफोडी, लूट, चेनस्नॅचिंग, जबरी चोरी आदी प्रकारचे दरवर्षी सुमारे हजार गुन्हे नोंद होतात.  पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण सुमारे २५ ते ३० टक्क्यांपर्यंत आहे. गुन्ह्यांची उकल झाल्यानंतर आरोपींकडून जप्त केलेले दागिने, वस्तू न्यायालयाच्या परवानगीने तक्रारदाराला परत करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. आतापर्यंत दोनवेळा मूळ मालकांना त्यांच्या वस्तू परत देण्यात आल्या असल्या तरी अजूनही बराचसा मुद्देमाल हा तक्रारदार सापडत नसल्याचे तो पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कारकुनाकडे पडून आहे़पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकुनाची जबाबदारीचोरीच्या गुन्ह्यात चोरांकडून जप्त केलेला मुद्देमाल हा न्यायालयीन आदेश होईपर्यंत संबंधित पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कारकुनाच्या ताब्यात असतो़ या संपूर्ण मुद्देमालाच्या संरक्षणाची जबाबदारी ही या कारकुनाची असते़ या सर्व मुद्देमालाचे रेकॉर्ड ठेवणे, न्यायालयाने प्रॉपटी रिटर्नचा आदेश दिल्यानंतर संबंधित मालकाला त्याला मुद्देमाल परत करणे, त्याची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी या कारकुनाकडे असते़ पोलीस ठाण्यातील या कारकुनाला के वळ एकच काम असत असे नाही तर पोलीस ठाण्यातील इतरही कामे त्याला करावी लागतात़ मुद्देमाल गहाळ झाल्याप्रकरणी यापूर्वी काही मुद्देमाल कारकुनांवर गुन्हेही दाखल करण्यात आलेले आहेत़प्रॉपर्टी रिटर्नसाठी़़़पोलिसांनी चोरी झालेला मुद्देमाल जप्त केल्यानंतर तो परत मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो़ या अर्जासाबत पोलीस ठाण्यात चोरीची दाखल झालेली फि र्याद, चोरी गेलेला मुद्देमाल आपलाच असल्याचे कायदेशीर पुरावे हे न्यायालयात सादर करावे लागतात़ अर्जदाराच्या अर्जानुसार न्यायालय संबंधित गुन्ह्याचा पोलीस तपास अधिकारी, सरकारी वकील तसेच काही प्रसंगी गुन्हेगारांचा म्हणणेही मागवते़ त्यानुसार कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर न्यायालय आदेश देते व संबंधिताला त्याचा मुद्देमाल परत मिळतो़ यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास अर्जदाराला मुद्देमाल मिळण्यास उशीर होऊ शकतो़मुद्देमाल वर्षानुवर्षे पडून राहण्याची कारणेचोरी वा घरफ ोडी होणाऱ्या व्यक्तीच्या मनावर सर्वांत मोठा आघात होतो़ त्याने कमावलेली आर्थिक वा वस्तूरूपी पुंजी काही तासांत लुटली जाते़ या दु:खदायी घटनेनंतर मानसिकरीत्या खचलेली ही व्यक्ती संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन फि र्याद देते़ काही महिन्यांनंतर म्हणा वा त्याच्या कर्मधर्मसंयोगाने पोलीस गुन्ह्याचा यशस्वी तपास करून गुन्हेगारांना हुडकून काढतात़ चोरट्यांना पकडल्यानंतर पोलीस खाक्या दाखवून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला जातो़ या मुद्देमालाच्या मालकाचा शोध घेत पोलीस त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात़ आपला मुद्देमाल सापडला याचा आनंद त्याला होत असतो़ मात्र आपला चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी त्याला भली मोठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते़४ न्यायालयात गेल्यानंतर वकिलाची नियुक्ती, कागदपत्रांची पूर्तता, पोलीस चौकशी, सरकारी वकील यांच्या प्रश्नाची उत्तरे, पुरावे असे सर्व न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्याला मुद्देमाल परत मिळतो़ मात्र ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि वेळखाऊपणाची असल्यामुळे चोरी गेलेल्या मुद्देमाल कमी किमतीचा असेल तर सरळ-सरळ याकडे दुर्लक्ष केले जाते़ त्यामुळे वर्षानुवर्षे हा मुद्देमाल पोलिसांकडे पडून राहतो़ आजमितीला कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पोलीस ठाण्यामध्ये पडून आहे़

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय