शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

काटेरी मुकुट आणि अपेक्षाचे ओझे !

By श्याम बागुल | Updated: February 6, 2019 18:18 IST

जिल्हा कॉँग्रेस कमिटीत कधी नव्हे कार्यकर्त्यांच्या खच्चून गर्दीने पार पडलेल्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी, ज्यांनी मालेगावी शेवाळे यांच्या नियुक्तीबद्दल जाहीर अभिनंदन करणारे फलक जागोजागी लावले ते प्रसाद हिरे व त्यांचेच समर्थक म्हणून मानले जात असलेले

ठळक मुद्दे शेवाळे यांच्या पदावर डोळा ठेवून असलेल्यांचा भ्रमनिरास झाला.पक्ष रसातळाला नेण्यात त्यांचाही तितकाच हातभार होता,

श्याम बागुलनाशिक : अपेक्षेबरहुकूम अखेर जिल्हा कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे डॉ. तुषार शेवाळे यांनी स्वीकारून या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या चर्चेला विराम दिला असला तरी, असा विराम देताना थेट अखिल भारतीय कॉँग्रेसचे सरचिटणीस व उत्तर महाराष्टÑाचे प्रभारी वालसी चांदरेड्डी यांनाच पदग्रहण सोहळ्यास पाचारण केल्यामुळे शेवाळे यांच्या नियुक्ती विषयीची नाराजी व्यक्त करण्यास अधीर झालेल्यांची तोंडे आपसूकच बंद झाली, दुसरे म्हणजे चांदरेड्डी यांनीच शेवाळे यांची नियुक्ती राहुल गांधी यांच्या मान्यतेने झाल्याचा जाहीर खुलासा करून टाकल्यामुळे शेवाळे यांच्या पदावर डोळा ठेवून असलेल्यांचा भ्रमनिरास झाला. उलट शेवाळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना प्रत्येक वक्त्याने त्यांना जिल्हाध्यक्षपदाच्या ‘काटेरी’ मुकुटाची जाणीव करून देत पक्ष रसातळाला गेल्याचे बोलही सुनावले, परंतु शेवाळे यांनी नुकताच कुठे पदभार स्वीकारला याचा विसर सोयीस्करपणे पाडून घेत, पक्ष रसातळाला नेण्यात त्यांचाही तितकाच हातभार होता, याचा उल्लेख करणे मात्र जाणीवपूर्वक टाळले.

जिल्हा कॉँग्रेस कमिटीत कधी नव्हे कार्यकर्त्यांच्या खच्चून गर्दीने पार पडलेल्या या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली असली तरी, ज्यांनी मालेगावी शेवाळे यांच्या नियुक्तीबद्दल जाहीर अभिनंदन करणारे फलक जागोजागी लावले ते प्रसाद हिरे व त्यांचेच समर्थक म्हणून मानले जात असलेले शांताराम लाठर या दोन्ही मालेगावच्या पदाधिका-यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून गेली. तसेच या पदग्रहण सोहळ्याला जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांपेक्षा मालेगाव, देवळा, बागलाण या तालुक्यांचीच असलेली सर्वाधिक हजेरी पाहता, शेवाळे जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष की कसमा पट्ट्याचे असा प्रश्नही पडल्याशिवाय राहिला नाही असो. असे असले तरी, जिल्हा कॉँग्रेसमध्ये गेल्या अठरा वर्षांपासून साचलेपण आल्याच्या केल्या जात असलेल्या तक्रारी व राजाराम पानगव्हाणे यांच्याविषयी पक्षश्रेष्ठींकडे केल्या जात असलेल्या कागाळ्या करण्याची संधी आता यापुढे संबंधिताना मिळणार नाही असे समजूनच काही वक्तव्यांनी या पदग्रहण सोहळ्यात जाता जाता पानगव्हाणे यांनी अठरा वर्षे जिल्हाध्यक्षपद कसे सांभाळले असेल याविषयी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच याच काळात पक्ष मात्र अगदीच रसातळाला गेल्याचे पराभूत मानसिकतेचे दाखले दिले. त्यातून पानगव्हाणे यांचे कौतुक कमी तर त्यांच्या काळात स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाचे खापरदेखील अप्रत्यक्ष फोडून टाकले. जिल्हाध्यक्षपदाचा मुकुट ‘काटेरी’ असल्याची जाणीव वेळोवेळी नवनियुक्त तुषार शेवाळे यांना प्रत्येक वक्तव्याने करून देण्यामागच्या कारणांचा उलगडा झाला नसला तरी, ज्यांनी ज्यांनी या सोहळ्याच्या निमित्ताने मार्गदर्शनाची संधी साधून घेतली त्यांनी मात्र अप्रत्यक्ष शेवाळे यांनी आपले ऐकूनच पुढचे राजकारण करावे असे सुचविले. मुळात शेवाळे हे गेली अनेक वर्षे कॉँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. स्व. बळीराम हिरे यांच्यापासून राजकारणाचे धडे घेतलेल्या शेवाळे यांनी वैद्यकीय क्षेत्र सांभाळतानाच सामाजिक उपक्रमांद्वारे जनसामान्यांशी आपली नाळ कायम ठेवली. राज्यातील दुसºया क्रमांकाच्या मविप्र शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष असताना मालेगाव तालुका कॉँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी अडचणीच्या काळात पेलले त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाशी जसे ते परिचित आहेत, त्यापेक्षा जिल्हा कॉँग्रेसचे राजकारण त्यांच्या अंगळवणी पडले आहे. जिल्हाध्यक्षपदाचा मुकुट काटेरीच असतो, हे नवीन सांगण्याची त्यांना कोणाची गरज नसली तरी, आगामी काळात पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी एकट्या तुषार शेवाळे यांच्याकडून बाळगण्याची अपेक्षा ठेवणाºयांनी मात्र आपण पक्षासाठी काय योगदान देणार याविषयी सोयीस्कर मौन पाळले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस