शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता, दंगलीचे लोण ठाणापाड्यात

By admin | Updated: July 16, 2015 23:56 IST

डझनभर पोलिसांच्या बदल्या, ६८ पोलीस जखमी, अनेकांची धरपकड

नाशिक - युवकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर हरसूल गावात उसळलेल्या दंगलीचे लोण पश्चिम पट्ट्यातील ठाणापाडा गावात पोहोचल्याने पोलिसांची अतिरिक्तकुमक हरसूलसह ठाणापाड्यात तैनात करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची पोलीस प्रशासनाने दखल घेत हरसूल पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह अर्धा डझन पोलीस कर्मचाऱ्यांच्याही अन्यत्र बदल्या केल्या आहेत. या तीन दिवसांत ६८ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्याचा अंदाज आहे.दरम्यान, काल (दि.१६) खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जि.प.सदस्य संपतराव सकाळे, मनसेचे सुधाकर राऊत, कॉँग्रेसचे विनायक माळेकर, रवींद्र भोये, ठाणापाड्याचे सरंपच मायावती महेंद्र साबळे, माकपचे भाऊराव राथड, अंबादास चौरे, भिवा पाटील, आनंदा चौधरी यांच्या उपस्थितीत ठाणापाड्यात सायंकाळी उशिरा शांतता समितीची बैठक झाली. बैठकीत खासदार चव्हाण, खासदार गोडसे, आमदार गावित यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सकाळपासूनच ठाणापाड्यात जाळपोळीचे आणि तोडफोडीचे प्रकार सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस फौजफाट्यासह ठाणापाड्यात तळ ठोकला होता, तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, आ.निर्मला गावित यांनी ठाणापाड्यात भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. हरसूलच्या दंगलीत काही निरपराध लोकांची पोलिसांनी धरपकड केली असून, त्यांच्या सुटकेसाठी आता पोलिसांनी प्रयत्न करावेत, तसेच नागरिकांनीही त्यांच्या सुरक्षेसाठीच पोलीस असून, शांतता न टिकविल्यास पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागेल, यात सर्वांचेच नुकसान असल्याचे खा.चव्हाण यांनी सांगितले. तत्पूर्वी खासदार चव्हाण, खासदार गोडसे, आमदार गावित, विजय करंजकर, राजाराम पानगव्हाणे, संपतराव सकाळे यांनी खून झालेला युवक रामदास भोये यांच्या कुटुंबीयांचे भेटून सांत्वन केले. तसेच ज्या विहिरीत खून झाला, त्या विहिरीचीही जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना युवकाचा खून झाल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीचे दूरध्वनीवरील संभाषण ऐकविले. तसेच यात हरसूल पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याचा आरोपही केला.