शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही तणावपूर्ण शांतता, दंगलीचे लोण ठाणापाड्यात

By admin | Updated: July 16, 2015 23:56 IST

डझनभर पोलिसांच्या बदल्या, ६८ पोलीस जखमी, अनेकांची धरपकड

नाशिक - युवकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर हरसूल गावात उसळलेल्या दंगलीचे लोण पश्चिम पट्ट्यातील ठाणापाडा गावात पोहोचल्याने पोलिसांची अतिरिक्तकुमक हरसूलसह ठाणापाड्यात तैनात करण्यात आली आहे. ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची पोलीस प्रशासनाने दखल घेत हरसूल पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह अर्धा डझन पोलीस कर्मचाऱ्यांच्याही अन्यत्र बदल्या केल्या आहेत. या तीन दिवसांत ६८ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाल्याचा अंदाज आहे.दरम्यान, काल (दि.१६) खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, आमदार निर्मला गावित, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जि.प.सदस्य संपतराव सकाळे, मनसेचे सुधाकर राऊत, कॉँग्रेसचे विनायक माळेकर, रवींद्र भोये, ठाणापाड्याचे सरंपच मायावती महेंद्र साबळे, माकपचे भाऊराव राथड, अंबादास चौरे, भिवा पाटील, आनंदा चौधरी यांच्या उपस्थितीत ठाणापाड्यात सायंकाळी उशिरा शांतता समितीची बैठक झाली. बैठकीत खासदार चव्हाण, खासदार गोडसे, आमदार गावित यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सकाळपासूनच ठाणापाड्यात जाळपोळीचे आणि तोडफोडीचे प्रकार सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पोलीस फौजफाट्यासह ठाणापाड्यात तळ ठोकला होता, तर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, आ.निर्मला गावित यांनी ठाणापाड्यात भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. हरसूलच्या दंगलीत काही निरपराध लोकांची पोलिसांनी धरपकड केली असून, त्यांच्या सुटकेसाठी आता पोलिसांनी प्रयत्न करावेत, तसेच नागरिकांनीही त्यांच्या सुरक्षेसाठीच पोलीस असून, शांतता न टिकविल्यास पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागेल, यात सर्वांचेच नुकसान असल्याचे खा.चव्हाण यांनी सांगितले. तत्पूर्वी खासदार चव्हाण, खासदार गोडसे, आमदार गावित, विजय करंजकर, राजाराम पानगव्हाणे, संपतराव सकाळे यांनी खून झालेला युवक रामदास भोये यांच्या कुटुंबीयांचे भेटून सांत्वन केले. तसेच ज्या विहिरीत खून झाला, त्या विहिरीचीही जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना युवकाचा खून झाल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीचे दूरध्वनीवरील संभाषण ऐकविले. तसेच यात हरसूल पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याचा आरोपही केला.