शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

शासकीय कार्यालयांमध्ये होणार 'थर्मल गन'ने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:47 IST

शासकीय कार्यालयातील सर्व खिडक्या पुर्णपणे उघडाव्या, कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फूट अंतर असावे त्यासाठी आवश्यक असेल तर कार्यालयातील बैठक व्यवस्थेत फेररचना करावी, कार्यालयात येणा-या अभ्यागतांना मास्क असणे अनिवार्य करण्यात यावा, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करावी

ठळक मुद्देअनेक व्यक्तींना एकत्र न बोलविता लहान गट करावेतहाय रिस्क, लो रिस्कची यादी तयार करावी

नाशिक : सर्वच शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू झाली असून, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने शासकीय कार्यालयांसाठी काही उपाययोजना सुचविल्या असून, त्यात प्रामुख्याने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांचे तपमान दररोज थर्मल स्कॅनरने तपासूनच प्रवेश देण्याबरोबरच प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.या संदर्भात शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांमध्ये शासकीय कार्यालयातील सर्व खिडक्या पुर्णपणे उघडाव्या, कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांमध्ये किमान तीन फूट अंतर असावे त्यासाठी आवश्यक असेल तर कार्यालयातील बैठक व्यवस्थेत फेररचना करावी, कार्यालयात येणा-या अभ्यागतांना मास्क असणे अनिवार्य करण्यात यावा, कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरची तसेच प्रत्येक स्वच्छतागृहात साबण, हॅण्डवॉशची व्यवस्था करावी, कार्यालयात नियमित वापर करण्यात येणा-या वस्तू दिवसातून तीन वेळा स्वच्छ पुसून घ्यावेत. कार्यालयातील संगणक, प्रिंटर, स्कॅनर दिवसातून दोन वेळा स्वच्छ पुसून घ्यावेत या वस्तुंचे निर्र्जंतूकीकरण ७० टक्के अल्कहोल असलेल्या सॅनिटायझरने करण्यात यावे, कार्यालय नियमितपणे साबण व पाण्याने स्वच्छ धुवून घेण्यात यावे.कार्यालयाच्या वापराबरोबरच कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घ्यायवयाच्या खबरदारीबाबतही शासनाने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्यात एकाच वाहनातून अनेक अधिकारी, कर्मचाºयांनी प्रवास करू नये, ई-आॅफिसचा जास्तीत जास्त वापर करावा, फाईल्स ई-मेलद्वारे पाठवाव्या, कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश द्यावा, कार्यालयीन बैठकीसाठी अधिकारी, कर्मचा-यांना प्रत्यक्ष बोलवूनये त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरसिंगचा वापर करावा, एकाच कामासाठी अनेक व्यक्तींना न एकत्र न बोलविता दोन-तीन व्यक्तींचे लहान गट करावेत.कार्यालयीन सर्व प्रकारच्या खबरदारी घेवूनही जर कार्यालयातील कर्मचारी, अधिका-याला संसर्ग झाल्यास काय उपायोजना योजाव्यात त्याबाबतही शासनाने मार्गदर्शन केले आहे. त्यात ताप १००.४ डिग्रीपेक्षा अधिक असल्यास त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करावे, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कर्मचारी, अधिकाºयास १४ दिवस कार्यालयात येवू देवू नये, अशा कर्मचारी, अधिका-याचा संपर्क आलेल्यांची हाय रिस्क, लो रिस्कची यादी तयार करावी व त्याबाबत खबरदारी घ्यावी अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNashikनाशिकTemperatureतापमान