शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भीती होतीच, पण सुदैवाने धोका टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:16 IST

चीनचे २०१६ पासून अनियंत्रित झालेले अवकाश प्रयोगशाळेचे यान अरबी समुद्रात कोसळणार अशी भीती भारतासह जगभरातील विविध देशांना वाटत होती. त्यामुळे भारतावर या चिनी अवकाश प्रयोगशाळा यानाचा धोका होताच; मात्र तो सुदैवाने टळला. हे यान अरबी महासागरात कोसळणार अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र यानाचा अवकाशात स्फोट होऊन त्याचे तुकडे उल्का वर्षावाप्रमाणे प्रशांत महासागरात कोसळले.

अपूर्वा जाखडी ।चीनचे २०१६ पासून अनियंत्रित झालेले अवकाश प्रयोगशाळेचे यान अरबी समुद्रात कोसळणार अशी भीती भारतासह जगभरातील विविध देशांना वाटत होती. त्यामुळे भारतावर या चिनी अवकाश प्रयोगशाळा यानाचा धोका होताच; मात्र तो सुदैवाने टळला. हे यान अरबी महासागरात कोसळणार अशी भीती व्यक्त केली जात होती; मात्र यानाचा अवकाशात स्फोट होऊन त्याचे तुकडे उल्का वर्षावाप्रमाणे प्रशांत महासागरात कोसळले. चीनने जगाला दाखविण्यासाठी २०११ मध्ये अवकाशात स्वतंत्ररीत्या साडेआठ टन वजनाची अवकाश प्रयोगशाळा २७० कोटी रुपये खर्च करून धाडले होते. अवकाश यान प्रयोगशाळा २०११ ते २०१५ पर्यंत योग्यरीत्या कार्यान्वित होती; मात्र अचानकपणे २०१६ पासून या यानाचे संपर्क चायनीज स्पेस एजन्सीसोबत पूर्णत: संपुष्टात आले. चीनच्या वैज्ञानिकांनी ही गंभीर बाब त्यांच्या एजन्सीने जगापासून लपविली.  मात्र ही बाब नासा, इसा या अंतराळ संस्थांच्या वैज्ञानिकांच्या लक्षात आली. त्यानंतर वैज्ञानिकांनी यानाला ट्रॅकिंग करण्यास सुरुवात केली. परंतु हे यान ट्रॅक होत नव्हते कारण पृथ्वी स्वत: व सूर्याभोवती फिरत असल्यामुळे ते अवघड होत होते आणि अवकाशात भरकटलेल्या यानाचे योग्य लोकेशन मिळत नव्हते. त्यामुळे भारतासह न्यूझीलंड, युरोप, ब्रिटन अशा सर्वच देशांना ते आपल्या हद्दीत कोसळण्याची भीती वाटत होती. या यानाचे वजन सुमारे साडेआठ टन इतके होेते. चीनने अवकाशात सोडलेल्या चीन प्रयोगशाळेचे नाव ‘पॅँगॉँग-१ चायनिज स्पेस स्टेशन’ असे दिले होते. हे यान २०१६पासून संपूर्णत: भरकटलेले होते. या यानावर कुठल्याही प्रकारे कोणाचेही नियंत्रण नव्हते. नियंत्रणाबाहेर यान झाल्याची जाणीव चायनिज स्पेस एजन्सीच्या वैज्ञानिकांना होती. जगापुढे आपले अपयश उघड होईल, या भीतीपोटी ही माहिती चीनकडून उघड करण्यात आली नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून हे यान अनियंत्रीत होऊन अवकाशात भरकटत होते. यान कधीही पृथ्वीवर कोसळू शकते, याची शक्यता होती. या दिशेने नासा, इसा या अंतराळ संस्थांसह भारताच्या इस्त्रोच्या वैज्ञानिकांनीही संशोधन सुरू ठेवत यान भारताच्या हद्दीत कोसळणार नाही, असा निष्कर्ष लावला होता. सोमवारी पहाटे चिनी प्रयोगशाळेचे यान अवकाशात जळाले आणि त्याचे तुकडे प्रशांत महासागरात पडले. यामुळे सागरी जैवविविधतेला काही प्रमाणात हानी पोहचली, मात्र पृथ्वीवरील वातावरणात त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.- लेखक नासाच्या स्पेस एज्युकेटर आहेत

टॅग्स :NASAनासा