शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बाळासाहेबांशी मतभेद होते, तितकेच प्रेमही! - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:21 IST

शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो. काही वैचारिक मतभेद झाल्याने शिवसेना सोडली - भुजबळ

नाशिक : शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो. काही वैचारिक मतभेद झाल्याने शिवसेना सोडली. बाळासाहेब ठाकरेंना कोणत्या परिस्थितीत अटक करण्यात आली हे त्यावेळचे जाणकार सांगतीलच. परंतु जितके बाळासाहेबांशी मतभेद होेते, तितकेच प्रेमही होते, हे नंतरच्या काळात साऱ्यांनाच ठाऊक झाले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अटक करणारे भुजबळ कसे चालले, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारणारे सेनेचे मंत्री महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माझ्या मांडीला मांडी लावून का बसले होते, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांना विचारला आहे. 

सेनेच्या काही बंडखोर आमदार व मंत्र्यांनी पक्ष सोडण्यासाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे करून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली ते भुजबळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कसे चालले, असा प्रश्न विचारल्याने त्याला प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिले. 

भुजबळ म्हणाले, मंडल आयोगावरून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाले व आपण सेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, हा सारा इतिहास राज्यातील जनतेला ठाऊक आहे. त्यानंतर ठाकरे यांच्याशी माझे भांडण जगजाहीर झाले. त्यांनी मुखपत्रातून आरोप केल्यामुळे मी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला, तर मुंबई दंगलीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन तत्कालीन काँग्रेस सरकारने जनतेला दिले होते. त्यामुळे मी गृहमंत्री असताना तत्कालीन मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आपल्यासमोर फाईल ठेवली. त्याचवेळी मी बाळासाहेब ठाकरेंना अटक न करण्याचे व कायद्याने अटक झाली तर त्यांना पोलीस कोठडी अथवा तुरुंगात न टाकता ‘मातोश्री’वरच ठेवण्याचे आदेश गृहखात्याला दिले होते. त्यामुळे बाळासाहेब यांना अटक झाली तरी, त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडलेदेखील, असेही त्यांनी सांगितले.

सेनेत सारे काही ‘ऑल वेल’ होईल शिवसेना संपणार नाही, कोणत्याही मराठी व्यक्तीला सेना संपवावी, असे वाटणार नाही. याचा पुनरुच्चार करून भुजबळ यांनी सेनेतील वादळ काही दिवसातच शांत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना