शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बाळासाहेबांशी मतभेद होते, तितकेच प्रेमही! - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:21 IST

शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो. काही वैचारिक मतभेद झाल्याने शिवसेना सोडली - भुजबळ

नाशिक : शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होतो. काही वैचारिक मतभेद झाल्याने शिवसेना सोडली. बाळासाहेब ठाकरेंना कोणत्या परिस्थितीत अटक करण्यात आली हे त्यावेळचे जाणकार सांगतीलच. परंतु जितके बाळासाहेबांशी मतभेद होेते, तितकेच प्रेमही होते, हे नंतरच्या काळात साऱ्यांनाच ठाऊक झाले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अटक करणारे भुजबळ कसे चालले, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारणारे सेनेचे मंत्री महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माझ्या मांडीला मांडी लावून का बसले होते, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सेनेच्या बंडखोर आमदारांना विचारला आहे. 

सेनेच्या काही बंडखोर आमदार व मंत्र्यांनी पक्ष सोडण्यासाठी छगन भुजबळ यांचे नाव पुढे करून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली ते भुजबळ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कसे चालले, असा प्रश्न विचारल्याने त्याला प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिले. 

भुजबळ म्हणाले, मंडल आयोगावरून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाले व आपण सेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, हा सारा इतिहास राज्यातील जनतेला ठाऊक आहे. त्यानंतर ठाकरे यांच्याशी माझे भांडण जगजाहीर झाले. त्यांनी मुखपत्रातून आरोप केल्यामुळे मी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला, तर मुंबई दंगलीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन तत्कालीन काँग्रेस सरकारने जनतेला दिले होते. त्यामुळे मी गृहमंत्री असताना तत्कालीन मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी आपल्यासमोर फाईल ठेवली. त्याचवेळी मी बाळासाहेब ठाकरेंना अटक न करण्याचे व कायद्याने अटक झाली तर त्यांना पोलीस कोठडी अथवा तुरुंगात न टाकता ‘मातोश्री’वरच ठेवण्याचे आदेश गृहखात्याला दिले होते. त्यामुळे बाळासाहेब यांना अटक झाली तरी, त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडलेदेखील, असेही त्यांनी सांगितले.

सेनेत सारे काही ‘ऑल वेल’ होईल शिवसेना संपणार नाही, कोणत्याही मराठी व्यक्तीला सेना संपवावी, असे वाटणार नाही. याचा पुनरुच्चार करून भुजबळ यांनी सेनेतील वादळ काही दिवसातच शांत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना