शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

नोंदणी विवाहाविषयी आली जागरूकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

खरे तर विवाहाची नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद‌्भवण्याची शक्यता गृहीत धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले ...

खरे तर विवाहाची नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद‌्भवण्याची शक्यता गृहीत धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जाते. किंबहुना तशीच उदाहरणे यापूर्वी दिसून आलेली आहेत; परंतु कोरानामुळे लागलेल्या निर्बंधांच्या काळात नोंदणी पद्धतीच्या विवाहाविषयीची जनजागृती वाढली असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनच्या नियमांमुळे अनेक सामाजिक संकेतही नव्याने रुजू होत असल्याने ही बाब सकारात्मकच घेतली पाहिजे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळाने अनेक बदल घडून आले आहेत. विवाहाच्या बाबतीतही लोकांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले. निर्बंधामुळे गर्दी जमविता येत नसल्याचे निमित्त असले तरी जाणीवपूर्वक नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठीदेखील लोक पुढे आले आहेत. खर्चापेक्षाही कायदेशीर विवाहदेखील महत्त्वाचा असल्याचा विचारही रुजला असल्याचे दिसते. त्यामुळे नोंदणी विवाहाविषयीची नागरिकांमध्ये जागरूकता आल्याचे यावरून म्हणता येईल.

कुटुंबीयांकडून विरोध असेल तरच नोंदणी विवाह केला जातो, हा प्रकार आता बाजूला पडू पाहत आहे. आता स्वेच्छेने नोंदणी विवाहासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. वधू-वरांकडील लोक आपल्या मुला-मुलींना नोंदणीसाठी आणत असल्याचे या काळात घडून आले. निर्बंधांच्या काळात झालेल्या विवाहांची संख्या पाहता जुळविलेले विवाह नोंदणी पद्धतीने करण्यात आले आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना कुटुंबीयांचा विवाह असेल तर त्यांना पोलीस संरक्षण दिले जाते, शिवाय शासनाकडून आर्थिक मदतही मिळते. शासकीय नियमाप्रमाणे विवाह नोंदणी शुल्क घेऊन अशा प्रकारचे विवाह कार्यालयात केेले जातात. लॉकडाऊनच्या काळात विशेषत: गेल्या तीन महिन्यांमध्ये नोंदणी विवाहाचे प्रमाण चांगले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

(फोटो)

( गुडमॉर्निंग पानासाठी)

160721\16nsk_29_16072021_13.jpg

एस.आर. ठाकरे