शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी विवाहाविषयी आली जागरूकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

खरे तर विवाहाची नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद‌्भवण्याची शक्यता गृहीत धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले ...

खरे तर विवाहाची नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद‌्भवण्याची शक्यता गृहीत धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जाते. किंबहुना तशीच उदाहरणे यापूर्वी दिसून आलेली आहेत; परंतु कोरानामुळे लागलेल्या निर्बंधांच्या काळात नोंदणी पद्धतीच्या विवाहाविषयीची जनजागृती वाढली असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनच्या नियमांमुळे अनेक सामाजिक संकेतही नव्याने रुजू होत असल्याने ही बाब सकारात्मकच घेतली पाहिजे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळाने अनेक बदल घडून आले आहेत. विवाहाच्या बाबतीतही लोकांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले. निर्बंधामुळे गर्दी जमविता येत नसल्याचे निमित्त असले तरी जाणीवपूर्वक नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठीदेखील लोक पुढे आले आहेत. खर्चापेक्षाही कायदेशीर विवाहदेखील महत्त्वाचा असल्याचा विचारही रुजला असल्याचे दिसते. त्यामुळे नोंदणी विवाहाविषयीची नागरिकांमध्ये जागरूकता आल्याचे यावरून म्हणता येईल.

कुटुंबीयांकडून विरोध असेल तरच नोंदणी विवाह केला जातो, हा प्रकार आता बाजूला पडू पाहत आहे. आता स्वेच्छेने नोंदणी विवाहासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. वधू-वरांकडील लोक आपल्या मुला-मुलींना नोंदणीसाठी आणत असल्याचे या काळात घडून आले. निर्बंधांच्या काळात झालेल्या विवाहांची संख्या पाहता जुळविलेले विवाह नोंदणी पद्धतीने करण्यात आले आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना कुटुंबीयांचा विवाह असेल तर त्यांना पोलीस संरक्षण दिले जाते, शिवाय शासनाकडून आर्थिक मदतही मिळते. शासकीय नियमाप्रमाणे विवाह नोंदणी शुल्क घेऊन अशा प्रकारचे विवाह कार्यालयात केेले जातात. लॉकडाऊनच्या काळात विशेषत: गेल्या तीन महिन्यांमध्ये नोंदणी विवाहाचे प्रमाण चांगले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

(फोटो)

( गुडमॉर्निंग पानासाठी)

160721\16nsk_29_16072021_13.jpg

एस.आर. ठाकरे