शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

नोंदणी विवाहाविषयी आली जागरूकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:13 IST

खरे तर विवाहाची नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद‌्भवण्याची शक्यता गृहीत धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले ...

खरे तर विवाहाची नोंदणी करणे कायद्यानुसार बंधनकारकच आहे. मात्र, सामाजिक अडचणी उद‌्भवण्याची शक्यता गृहीत धरून नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जाते. किंबहुना तशीच उदाहरणे यापूर्वी दिसून आलेली आहेत; परंतु कोरानामुळे लागलेल्या निर्बंधांच्या काळात नोंदणी पद्धतीच्या विवाहाविषयीची जनजागृती वाढली असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनच्या नियमांमुळे अनेक सामाजिक संकेतही नव्याने रुजू होत असल्याने ही बाब सकारात्मकच घेतली पाहिजे.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळाने अनेक बदल घडून आले आहेत. विवाहाच्या बाबतीतही लोकांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले. निर्बंधामुळे गर्दी जमविता येत नसल्याचे निमित्त असले तरी जाणीवपूर्वक नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठीदेखील लोक पुढे आले आहेत. खर्चापेक्षाही कायदेशीर विवाहदेखील महत्त्वाचा असल्याचा विचारही रुजला असल्याचे दिसते. त्यामुळे नोंदणी विवाहाविषयीची नागरिकांमध्ये जागरूकता आल्याचे यावरून म्हणता येईल.

कुटुंबीयांकडून विरोध असेल तरच नोंदणी विवाह केला जातो, हा प्रकार आता बाजूला पडू पाहत आहे. आता स्वेच्छेने नोंदणी विवाहासाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. वधू-वरांकडील लोक आपल्या मुला-मुलींना नोंदणीसाठी आणत असल्याचे या काळात घडून आले. निर्बंधांच्या काळात झालेल्या विवाहांची संख्या पाहता जुळविलेले विवाह नोंदणी पद्धतीने करण्यात आले आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना कुटुंबीयांचा विवाह असेल तर त्यांना पोलीस संरक्षण दिले जाते, शिवाय शासनाकडून आर्थिक मदतही मिळते. शासकीय नियमाप्रमाणे विवाह नोंदणी शुल्क घेऊन अशा प्रकारचे विवाह कार्यालयात केेले जातात. लॉकडाऊनच्या काळात विशेषत: गेल्या तीन महिन्यांमध्ये नोंदणी विवाहाचे प्रमाण चांगले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

(फोटो)

( गुडमॉर्निंग पानासाठी)

160721\16nsk_29_16072021_13.jpg

एस.आर. ठाकरे