शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव शुल्क परतीची अजूनही प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:59 IST

शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जासाठी भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात आले. वास्तविक या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शुल्क आकारणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून खुल्या प्रवर्गाप्रमाणेच शुल्क आकारणी करण्यात आली होती

नाशिक : शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जासाठी भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात आले. वास्तविक या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शुल्क आकारणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून खुल्या प्रवर्गाप्रमाणेच शुल्क आकारणी करण्यात आली होती. सदर शुल्क परत करण्याची मागणी महाराष्टÑ भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघाच्यावतीने करण्यात येऊनही केवळ आश्वासन दिले जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे भटक्या विमुक्त उमेदवारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वास्तविक शिक्षण सेवक म्हणून या चाचणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी यापूर्वीच टीईटी चाचणी दिलेली आहे. त्या टीईटी झालेल्यांना चाचणी शुल्कामध्ये अनुसूचित जाती जमातीप्रमाणे भटक्या विमुक्तांनाही परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आली होती. आता मात्र अभियोग्यता चाचणीला परीक्षा शुल्क सवलत नाकारण्यात आलेली आहे. शासनाने या चाचणी परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने भटक्या विमुक्तांकडून वसूल केलेले वाढीव परीक्षा शुल्क घेण्याची चूक केल्याची कबुली दिलेली आहे. परीक्षा परिषदेने वाढीव परीक्षा शुल्क घेतल्याचे मान्य केलेले आहे. मात्र अजूनही भटक्या विमुक्तांना शुल्क परत करण्यात आलेले नसल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर जी. जी. चव्हाण, हमेंत शिंदे, अ‍ॅड. अमोल घुगे, डी. के. गोसावी, कल्पना पांडे, रामेश्वर सोनोे, हिमांशू चव्हाण, धर्मराज शंकर काथवटे, भालचंद्र निरभवणे, सुरज काळे, संगीता विचारे, संजीवनी कनके, दत्तात्रय ओतारी, रंजना गांजे, दत्तात्रय रमेश साळुंके यांची स्वाक्षरी आहे. शासनाच्या वतीने गेल्या डिसेंबर महिन्यात शिक्षण सेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यामध्ये भटक्या विमुक्त संवर्गातील उमेदवारांना सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणेच ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले. वास्तविक भटक्या-विमुक्तांना अनुसूचित जाती-जमातींप्रमाणे परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. शिक्षण परिषदेने आकारलेल्या ५०० रुपये शुल्कामुळे भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली असून, ऐनवेळी परीक्षा शुल्कासाठी पैसे नसले तर कसे होणार, असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक