शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बाजार समितींसाठी मतदार याद्यांचा घोळ अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:37 IST

बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला सोमवारी (दि.१२) जाहीर केलेल्या मुदतीत अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही. या घोळामुळे निवडणूक प्रक्रि या लांबण्याची शक्यता आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला सोमवारी (दि.१२) जाहीर केलेल्या मुदतीत अंतिम यादी प्रसिद्ध करता आली नाही. या घोळामुळे निवडणूक प्रक्रि या लांबण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने जानेवारी महिन्यात मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा कार्यक्र म जाहीर करून निवडणुकीचे बिगुल वाजविले. मात्र प्रथमच शासनाने प्रत्येक शेतकºयाला मतदानाचा अधिकार बहाल करून ऐतिहासिक निर्णय घेतला; परंतु हा निर्णय घेताना आवश्यक मार्गदर्शन नसल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मतदान याद्यांचा घोळ कायम होता. गेल्या महिन्यात गणरचना जाहीर करून आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर हरकतींचा अक्षरश: पाऊस पडला होता. सटाणा बाजार समितीत तब्बल २६४ हरकती नोंदविल्या गेल्या त्यापैकी १६ हरकती फेटाळण्यात आल्या. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाºयांनी १२ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्र म जाहीर केला होता. त्यानंतर पंधरा दिवसांनी निवडणूक कार्यक्र म जाहीर करण्याचे संकेत दिले होते; मात्र कोणत्या शेतकºयांना मतदानाचा हक्क बहाल करायचा याबाबत शासनाकडून मुदतीत मार्गदर्शन न आल्याने जाहीर केल्यानुसार सोमवारी (दि.१२) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे आवश्यक होते. मात्र मतदार याद्यांचा घोळ अद्याप मिटलेला नाही.सामाईक उताºयाचा तिढा सुटलाजानेवारी महिन्यात तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यामध्ये सामाईक सातबारा उताºयावरील सर्वच शेतकºयांना वगळण्यात आले होते. त्यामुळे शासनाविरु द्ध कमालीची नाराजी पसरली होती. यामुळे पणनने दखल घेऊन सामाईक सातबारा उताºयावरील पहिल्या क्र मांकाच्या नावाला मतदानाचा हक्क बहाल करावा, असे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिले होते; मात्र यावर शेतकºयांनी आक्षेप घेतला होता. त्यावर सुनवाई झाली़ सामाईक सातबारा उताºयावरील प्रत्येक शेतकºयाच्या वाट्याला कमीत कमी दहा गुंठे क्षेत्र येईल अशा सामाईक उताºयावरील शेतकºयांनाच मतदानाचा हक्क मिळणार आहे. एखाद्या उताºयावर सहा जणांची नावे असतील आणि क्षेत्र ५९ गुंठेच असेल, तर एकाही शेतकºयाला मतदानाचा हक्क राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एकंदरीत सामाईक उताºयावरील नावांचा तिढा सुटला असला तरी या निर्णयामुळे बहुतांश अल्पभूधारक शेतकरी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डElectionनिवडणूक