शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय माघार नाही!

By admin | Updated: June 9, 2017 01:22 IST

राज्यव्यापी परिषदेत नेते ठाम : सरकारला धडा शिकविण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी कर्जमुक्तींसाठी संपावर उतरला असल्याने संप मोडून निघाला तर भविष्यात त्याला न्याय मिळणार नाही, त्यामुळे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार गुरुवारी राज्यव्यापी शेतकरी परिषदेत करण्यात आला. खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील, रघुनाथदादा पाटील, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील, कॉ. अजित नवले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या परिषदेत सर्वांनीच सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. प्रचारात नरेंद्र मोदी यांनी सरकार सत्तेवर आल्यास स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी तसेच शेतमालाच्या उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते. तीन वर्षे झाले, परंतु यातील एकाही आश्वासनाची पूर्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, सरकारची नियत साफ नसल्याने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्यांना सत्ता दिली, तिच सत्ता पुन्हा खेचून आणण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये असल्याचा इशाराही देण्यात आला. ३२ लाख कोटींचा आकडा कोठून काढला - जयंत पाटीलअल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ३२ लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा आकडा कोठून व कसा काढला याचा उलगडा झाला पाहिजे. अशा प्रकारची आकडेफेक करून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत नवीन ते काय? देशातील भांडवलदारांचे १६ लाख कोटीचे कर्ज माफ करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. या १६ लाख कोटींपैकी एकट्या रिलायन्सचे चार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तर शिक्षा भोगण्यास तयार - रघुनाथदादा पाटीलराज्य सरकारने ११ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकी गोठविण्याचे परिपत्रक काढले होते, त्याची अंमलबजावणी करावी व सुकाणू समिती ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत शिफारशी करेल त्याची पूर्तता केल्यास राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी आपण देण्यास तयार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्यावरही जर राज्यात शेतकरी आत्महत्या झाली तर आपण मुख्यमंत्री सांगतील ती शिक्षा भोगण्यास तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. आंदोलन कोणतेही असो ते सरकारच्या विरोधातच असते, अशा आंदोलनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास लावून मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा मलिन केली आहे. गद्दारांची संगत नाही - शेट्टीतीन वर्षांपूर्वी भाजपाला मते द्या म्हणून मीच फिरलो, परंतु आज मला त्याचा पश्चात्ताप होत आहे. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून एकवटला असताना सरकारने आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या या प्रयत्नात आमच्यातील एक गद्दारही निघाला. अशा गद्दाराविषयी मला शरम वाटते, परंतु गद्दारांच्या अवलादीची संगत फार काळ ठेवणार नाही. कर्जमुक्ती मिळावी यासाठी ज्याची मदत मिळेल ती घेऊ व प्रसंगी सैतानांना बरोबर घेण्यात येईल, मात्र कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे आंदोलनकर्त्यांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी अगोदर माझी कुंडली काढावी, मी घाबरत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास ‘वाईट दिवस’ जवळ आले याची जाणीवही ठेवण्यात यावी.