शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय माघार नाही!

By admin | Updated: June 9, 2017 01:22 IST

राज्यव्यापी परिषदेत नेते ठाम : सरकारला धडा शिकविण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : इतिहासात पहिल्यांदाच शेतकरी कर्जमुक्तींसाठी संपावर उतरला असल्याने संप मोडून निघाला तर भविष्यात त्याला न्याय मिळणार नाही, त्यामुळे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार गुरुवारी राज्यव्यापी शेतकरी परिषदेत करण्यात आला. खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील, रघुनाथदादा पाटील, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील, कॉ. अजित नवले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या परिषदेत सर्वांनीच सरकारवर फसवणुकीचा आरोप केला. प्रचारात नरेंद्र मोदी यांनी सरकार सत्तेवर आल्यास स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी तसेच शेतमालाच्या उत्पादन खर्चावर दीडपट भाव देण्याचे आश्वासन दिले होते. तीन वर्षे झाले, परंतु यातील एकाही आश्वासनाची पूर्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, सरकारची नियत साफ नसल्याने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी त्यांना सत्ता दिली, तिच सत्ता पुन्हा खेचून आणण्याची ताकदही शेतकऱ्यांमध्ये असल्याचा इशाराही देण्यात आला. ३२ लाख कोटींचा आकडा कोठून काढला - जयंत पाटीलअल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ३२ लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा आकडा कोठून व कसा काढला याचा उलगडा झाला पाहिजे. अशा प्रकारची आकडेफेक करून सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत नवीन ते काय? देशातील भांडवलदारांचे १६ लाख कोटीचे कर्ज माफ करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. या १६ लाख कोटींपैकी एकट्या रिलायन्सचे चार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तर शिक्षा भोगण्यास तयार - रघुनाथदादा पाटीलराज्य सरकारने ११ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकी गोठविण्याचे परिपत्रक काढले होते, त्याची अंमलबजावणी करावी व सुकाणू समिती ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत शिफारशी करेल त्याची पूर्तता केल्यास राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी आपण देण्यास तयार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिल्यावरही जर राज्यात शेतकरी आत्महत्या झाली तर आपण मुख्यमंत्री सांगतील ती शिक्षा भोगण्यास तयार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. आंदोलन कोणतेही असो ते सरकारच्या विरोधातच असते, अशा आंदोलनांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास लावून मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा मलिन केली आहे. गद्दारांची संगत नाही - शेट्टीतीन वर्षांपूर्वी भाजपाला मते द्या म्हणून मीच फिरलो, परंतु आज मला त्याचा पश्चात्ताप होत आहे. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून एकवटला असताना सरकारने आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या या प्रयत्नात आमच्यातील एक गद्दारही निघाला. अशा गद्दाराविषयी मला शरम वाटते, परंतु गद्दारांच्या अवलादीची संगत फार काळ ठेवणार नाही. कर्जमुक्ती मिळावी यासाठी ज्याची मदत मिळेल ती घेऊ व प्रसंगी सैतानांना बरोबर घेण्यात येईल, मात्र कर्जमुक्ती घेतल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांकडे आंदोलनकर्त्यांच्या कुंडल्या असतील तर त्यांनी अगोदर माझी कुंडली काढावी, मी घाबरत नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्यांची चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास ‘वाईट दिवस’ जवळ आले याची जाणीवही ठेवण्यात यावी.