शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

भुयारी मार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:20 IST

शहरातील सर्वाधिक रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकच भरच पडत चालली आहे़ उड्डाणपूल झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले़

नाशिक : शहरातील सर्वाधिक रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकच भरच पडत चालली आहे़ उड्डाणपूल झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले़  दरम्यान, पादचाºयांची रोजची सर्कस थांबविण्यासाठी या परिसरात भुयारी मार्ग करण्यात आला; मात्र गर्दुल्ले, भटक्यांचे वास्तव्य, अस्वच्छता यामुळे नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर करणे बंद केले व त्यानंतर हा भुयारी मार्गही बंद करण्यात आला़ सद्यस्थितीत या भुयारी मार्गाचा वापर शून्य असून, त्याची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे़  द्वारका सर्कल परिसराला मुख्य चार रस्ते जोडले गेले असले तरी या रस्त्यांचे तब्बल अकरा पदर या भागात एकवटतात. त्यामध्ये मुंबई नाका भागाकडे जाणाºया व येणाºया रस्त्याचे चार पदर, सारडा सर्कलकडे जाणारे दोन, बागवानपुºयाकडे जाणारा एक, धुळ्याच्या दिशेने जाणारे दोन व उड्डाणपुलाला जोडणारे दोन पदर द्वारका सर्कल परिसरात एकवटतात. आजूबाजूच्या रस्त्याने येणारी अवजड आणि दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे या भागात वाहतुकीचा खोळंबा होऊन वारंवार अपघातही घडतात. कधी कधी तर वाहतूक पोलिसांनाही ही गर्दी नियंत्रणात आणणे अवघड होते़  द्वारका चौकातील भुयारी मार्गाचा अल्पकाळ पादचाºयांकडून वापर करण्यात आला; मात्र त्यानंतर या ठिकाणी गर्दुल्ले, अस्वच्छता यामुळे पादचाºयांनी याकडे तोंड फिरविणेच पसंत केले़ त्यातच अनेक वर्षांपासून या ठिकाणी साफसफाई केली जात नसल्याच्या तक्रारीदेखील महापालिकेकडे केल्या. या तक्रारींना अनेक महिने केराची टोपली दाखविण्यात आली. त्यातच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीचअचानक भेटी देण्याचा सिलसिला सुरू केला. आयुक्तांची धास्ती घेतलेल्या अधिकाºयांनी १३ मे २०१८ रोजी कर्मचाºयांकडून द्वारका येथील भुयारी मार्ग व परिसराची साफसफाई केली.  सद्यस्थितीत द्वारका चौकातील भुयारी मार्गाचा वापर शून्य असून, केवळ बाजूचा मार्ग खुला करण्यात आला आहे़ त्यामुळे निर्मनुष्य असलेल्या या भुयारी मार्गात अनुचित घटना घडण्याची शक्यता येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे़ भुयारी मार्गाचा वापर करावयाची सवय लावायची ठरल्यास या ठिकाणी आणखी पोलीस नेमून जनजागृतीद्वारे नागरिकांची मानसिकता तयार करावी लागणार आहे़ याबरोबरच येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका व पोलीस तसेच एनएएचआय या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे़

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी