शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

भुयारी मार्ग ‘असून अडचण, नसून खोळंबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:20 IST

शहरातील सर्वाधिक रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकच भरच पडत चालली आहे़ उड्डाणपूल झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले़

नाशिक : शहरातील सर्वाधिक रहदारीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस अधिकच भरच पडत चालली आहे़ उड्डाणपूल झाल्यानंतर तरी वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल अशी नागरिकांची अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले़  दरम्यान, पादचाºयांची रोजची सर्कस थांबविण्यासाठी या परिसरात भुयारी मार्ग करण्यात आला; मात्र गर्दुल्ले, भटक्यांचे वास्तव्य, अस्वच्छता यामुळे नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर करणे बंद केले व त्यानंतर हा भुयारी मार्गही बंद करण्यात आला़ सद्यस्थितीत या भुयारी मार्गाचा वापर शून्य असून, त्याची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे़  द्वारका सर्कल परिसराला मुख्य चार रस्ते जोडले गेले असले तरी या रस्त्यांचे तब्बल अकरा पदर या भागात एकवटतात. त्यामध्ये मुंबई नाका भागाकडे जाणाºया व येणाºया रस्त्याचे चार पदर, सारडा सर्कलकडे जाणारे दोन, बागवानपुºयाकडे जाणारा एक, धुळ्याच्या दिशेने जाणारे दोन व उड्डाणपुलाला जोडणारे दोन पदर द्वारका सर्कल परिसरात एकवटतात. आजूबाजूच्या रस्त्याने येणारी अवजड आणि दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे या भागात वाहतुकीचा खोळंबा होऊन वारंवार अपघातही घडतात. कधी कधी तर वाहतूक पोलिसांनाही ही गर्दी नियंत्रणात आणणे अवघड होते़  द्वारका चौकातील भुयारी मार्गाचा अल्पकाळ पादचाºयांकडून वापर करण्यात आला; मात्र त्यानंतर या ठिकाणी गर्दुल्ले, अस्वच्छता यामुळे पादचाºयांनी याकडे तोंड फिरविणेच पसंत केले़ त्यातच अनेक वर्षांपासून या ठिकाणी साफसफाई केली जात नसल्याच्या तक्रारीदेखील महापालिकेकडे केल्या. या तक्रारींना अनेक महिने केराची टोपली दाखविण्यात आली. त्यातच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वीचअचानक भेटी देण्याचा सिलसिला सुरू केला. आयुक्तांची धास्ती घेतलेल्या अधिकाºयांनी १३ मे २०१८ रोजी कर्मचाºयांकडून द्वारका येथील भुयारी मार्ग व परिसराची साफसफाई केली.  सद्यस्थितीत द्वारका चौकातील भुयारी मार्गाचा वापर शून्य असून, केवळ बाजूचा मार्ग खुला करण्यात आला आहे़ त्यामुळे निर्मनुष्य असलेल्या या भुयारी मार्गात अनुचित घटना घडण्याची शक्यता येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे़ भुयारी मार्गाचा वापर करावयाची सवय लावायची ठरल्यास या ठिकाणी आणखी पोलीस नेमून जनजागृतीद्वारे नागरिकांची मानसिकता तयार करावी लागणार आहे़ याबरोबरच येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिका व पोलीस तसेच एनएएचआय या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे़

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी