शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

शेतकरी संघटनांमध्येच संघटन नाही

By admin | Updated: November 22, 2015 00:02 IST

विष्णुपंत ताकाटे : पेन्शनधारकांचा मेळावा

 पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांना ‘संघटीत’ करण्यासाठी अनेक संघटना जन्माला आल्या, परंतू या संघटनांमध्येच ‘संघटन’ नाही तर ते शेतकऱ्यांना काय न्याय मिळवून देणार, अशी टीका करत शरद जोशी यांच्या विचाराचा आदर्श ठेऊन अमलबजावणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते विष्णूपंत ताकाटे यांनी केले.निफाड तालुका ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने कारसूळ (ता. निफाड) येथे शनिवारी पेन्शनधारकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ताकाटे म्हणाले, ‘लाख मेले तरी चालतील पण जगाचा पोशिंदा जगला पाहिजे’ असे म्हटले जाते. परंतू, हा पोशिंदा जगविण्यासाठी सरकार प्रयत्नच करत नसल्याची टीका ताकाटे यांनी केली.आयटकचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले म्हणाले, सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला असला तरी त्याचा फायदा फक्त आठ टक्के लोकांना होणार आहे. तर ९२ टक्के लोकांना त्याचा काडीमात्रही फायदा नाही, असे प्रतिपादन आयटकचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी केले. देसले म्हणाले, सेवानिवृत्त कामगारांना जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आपला लढा असा सुरू राहील. निवृत्तीनंतर पेन्शनधारकांना जगण्यासाठी किमान साडेसहा हजार रु पये मिळावेत, अशी मागणी असतानाही शासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे जगभरात एकमेव पेन्शनधारक आहेत की, ज्यांना पेन्शनच्या पैशांवर महागाई भत्ता मिळत नाही. जमा रकमेवरील व्याजाची रक्कम तर दूरच; पण साधी पेन्शनमधील वाढही शासनाला मान्य नसेल तर यापेक्षा दुर्दैव नाही, असा आरोप देसले यांनी सरकारवर केला.आयटकचे कार्याध्यक्ष सुभाष काकड यांनीही सरकारवर तोफ डागत पेन्शनधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी सरकारचे कपडे उतरवले जातील, असा इशारा दिला. जिल्हाध्यक्ष सुधाकर गुजराथी यांनी प्रकाश जावडेकरांनी पेन्शनधारकांची फसवणूक केल्याचे सांगत पेन्शनधारकांच्या जीवावर निवडणुका जिंकल्याचे नमूद केले. देशभरात एक हजार रूपयांपेक्षा कमी पेन्शन असलेल्यांची संख्या 57 लाख असताना त्यांना न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.आयटकचे उपाध्यक्ष बापू रांगणेकर आणि खिजनदार प्रकाश नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्र माचे मुख्य आयोजक निवृत्ती ताकाटे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या. त्यांनी सादर केलेली पेन्शनधारकांची कविता उपस्थितांना चांगली भावली. कार्यक्र म यशस्वीतेसाठी संजय जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालक शंखपाळ गुरूजी यांनी केले.मेळाव्याला ईपीएफ फेडरेशनचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, सरपंच रामकृष्ण कंक, उपसरपंच देवेंद्र काजळे, सोसायटी चेअरमन हनुमंत शंखपाळ, पाणी वापर संस्थेचे भाऊसाहेब शंखपाळ, जिल्हा सचिव डी. बी. जोशी, कार्याध्यक्ष विलास विसपुते, संघटक चेतन पणेनर, उपाध्यक्ष नारायण आडणे, प्रवीण पाटील, खिजनदार प्रशांत देशमुख, सहसचिव एम. एन. लासुरकर, सुरेश कासार, भाऊसाहेब शिंदे, बळवंत जाधव यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)कोट...सैनिकांना वन रँक वन पेन्शन देण्यासाठी सरकारने १० हजार कोटी रु पये खर्च केले आहे. आम्हाला तीन हजार रूपये पेन्शन व महागाई भवा देण्यासाठी १४ हजार कोटी खर्च येईल, असे सरकारचे म्हणणे आहे. परए आमचे 2 लाख कोटीहून अधिक रूपये सरकारकडे पडून आहेत मग अडचण कशाची आहे. इपीएफ १९९५ पेन्शनधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी पीएफ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.- राजू देसले, संस्थापक अध्यक्ष, आयटक