शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

महापालिकेतील कामगार भरतीबाबत धोरणच ठरविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:01 IST

नाशिक- नाशिक महापालिकेत आऊटसोर्सिंगने सफाई कामगार भरती करण्याच्या विषयावरून वाद पेटला असून त्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप देखील होऊ लागले आहेत. मुळात ७७ कोटींचा ठेका, त्यातच त्यातील राजकिय हस्तक्षेपांची चर्चा आणि त्यानंतर होऊ घातलेली लढाई याचा विचार केला तर यात वाद नविन होणे नाही.

ठळक मुद्देआऊटसोर्सिंंग पडते महागमानधनावरील भरती म्हणजे मागच्या दाराने भरतीची संधी

संजय पाठक, नाशिक- नाशिक महापालिकेत आऊटसोर्सिंगने सफाई कामगार भरती करण्याच्या विषयावरून वाद पेटला असून त्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप देखील होऊ लागले आहेत. मुळात ७७ कोटींचा ठेका, त्यातच त्यातील राजकिय हस्तक्षेपांची चर्चा आणि त्यानंतर होऊ घातलेली लढाई याचा विचार केला तर यात वाद नविन होणे नाही. मुळ प्रश्न वेगळाच आहे, कर्मचारी भरती करण्यासाठी शासन परवानगी देत नाही, दिली तर आऊटसोर्गिंगने दिले जाते. त्यामुळे मानधनावर कामगार भरण्याची नेहेमीच मागणी केली जाते. आणि तसे केले की मागील दाराने हेच कामगार कायम केले जातात. त्यामुळे आता महापालिकेत कामगार भरतीबाबत धोरणात्मक निर्णय शासन पातळीवरच घेतला जाण्याची गरज आहे.

महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. दर महिन्याला अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत असल्याने दिवसेंदिवस संख्या कमी होत चालली आहे. माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी महापालिकेचा १४ हजार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध शासनाला सादर केला आहे. मुळातच शासनाचा सर्वच स्तरावर आस्थापना खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. अशावेळी सध्या ७ हजार कर्मचाºयांचा आकृतीबंध मंजूर असताना आणखी दुप्पट कर्मचारी भरण्याची परवानगी मिळेल ही अपेक्षाच गैर आहे. भांडवली कामांपेक्षा कर्मचा-यांच्या वेतन भत्ते आणि अन्य कामांवरच खर्च होत असेल तर मुलभूत सुविधा कशा काय देणार असा प्रश्न निर्माण होतो. सध्या आऊटसोर्सिंग हा प्रस्ताव शासनानेच स्विकारला आहे. आणि त्यानुसार तो महापालिका आणि अन्य शासकिय खात्यांवर देखील बंधनकारक केला आहे. त्यामुळेच ठेकेदारी पध्दत सुरू झाली आहे. नाशिक महापालिकेत आता ७०० सफाई कामगार भरले असले महापालिकेत असे पहिल्यांदाच होते असे नाही. पेस्ट कंट्रोल, पथदिप देखभाल दुरूस्तीपासून अलिकडे वृक्ष अधिकारी देखील याच पध्दतीने भरले गेले आहेत. त्यामुळे हे प्रथमच होते असे नाही. तथापि, ७७ कोटींचा ठेका आणि त्यात सातशे कर्मचारी भरण्याचे म्हंटले नंतर अनेकांच्या भुवया उंचवले जाणे स्वाभाविक आहे.

मुळात, अशाप्रकारचे ठेकेदारी पध्दतीने कर्मचारी भरण्याचे ठरवल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे घोळ होतात आणि आर्थिक संबंध प्रस्थापित होतात. त्यातून वाद होतात आणि नगरसेवकांच्या मागणीनुसार मानधनावर कर्मचारी भरावे तर त्यातचही घोळ होतात आणि नगरसेवकांच्या शिफारसीवरून भरलेले हेच कर्मचारी नंतर महापालिकेत कायम होण्यासाठी न्यायालयात जातात आणि मागील दाराने भरती होते. त्यामुळे पर्याय कोणताही निवडा वाद होणारच अशी स्थिती आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनानेच धोरण ठरविण्याची गरज आहे. मानधनावर काही प्रमाणात भरती करण्याची परवानगी दिली तरी ठेक्यातील घोळ कमी होतीलच आणि पारदर्शक पध्दतीने मानधनावर भरती केल्यास स्थानिक भूमिपूत्रांना देखील रोजगार मिळू शकेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ठेक्यामुळे होणारी महापालिकेची शोेभा टळू शकेल !

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार