शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महापालिकेतील कामगार भरतीबाबत धोरणच ठरविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:01 IST

नाशिक- नाशिक महापालिकेत आऊटसोर्सिंगने सफाई कामगार भरती करण्याच्या विषयावरून वाद पेटला असून त्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप देखील होऊ लागले आहेत. मुळात ७७ कोटींचा ठेका, त्यातच त्यातील राजकिय हस्तक्षेपांची चर्चा आणि त्यानंतर होऊ घातलेली लढाई याचा विचार केला तर यात वाद नविन होणे नाही.

ठळक मुद्देआऊटसोर्सिंंग पडते महागमानधनावरील भरती म्हणजे मागच्या दाराने भरतीची संधी

संजय पाठक, नाशिक- नाशिक महापालिकेत आऊटसोर्सिंगने सफाई कामगार भरती करण्याच्या विषयावरून वाद पेटला असून त्यावर भ्रष्टाचाराच्या आरोप देखील होऊ लागले आहेत. मुळात ७७ कोटींचा ठेका, त्यातच त्यातील राजकिय हस्तक्षेपांची चर्चा आणि त्यानंतर होऊ घातलेली लढाई याचा विचार केला तर यात वाद नविन होणे नाही. मुळ प्रश्न वेगळाच आहे, कर्मचारी भरती करण्यासाठी शासन परवानगी देत नाही, दिली तर आऊटसोर्गिंगने दिले जाते. त्यामुळे मानधनावर कामगार भरण्याची नेहेमीच मागणी केली जाते. आणि तसे केले की मागील दाराने हेच कामगार कायम केले जातात. त्यामुळे आता महापालिकेत कामगार भरतीबाबत धोरणात्मक निर्णय शासन पातळीवरच घेतला जाण्याची गरज आहे.

महापालिकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. दर महिन्याला अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत असल्याने दिवसेंदिवस संख्या कमी होत चालली आहे. माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी महापालिकेचा १४ हजार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध शासनाला सादर केला आहे. मुळातच शासनाचा सर्वच स्तरावर आस्थापना खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे. अशावेळी सध्या ७ हजार कर्मचाºयांचा आकृतीबंध मंजूर असताना आणखी दुप्पट कर्मचारी भरण्याची परवानगी मिळेल ही अपेक्षाच गैर आहे. भांडवली कामांपेक्षा कर्मचा-यांच्या वेतन भत्ते आणि अन्य कामांवरच खर्च होत असेल तर मुलभूत सुविधा कशा काय देणार असा प्रश्न निर्माण होतो. सध्या आऊटसोर्सिंग हा प्रस्ताव शासनानेच स्विकारला आहे. आणि त्यानुसार तो महापालिका आणि अन्य शासकिय खात्यांवर देखील बंधनकारक केला आहे. त्यामुळेच ठेकेदारी पध्दत सुरू झाली आहे. नाशिक महापालिकेत आता ७०० सफाई कामगार भरले असले महापालिकेत असे पहिल्यांदाच होते असे नाही. पेस्ट कंट्रोल, पथदिप देखभाल दुरूस्तीपासून अलिकडे वृक्ष अधिकारी देखील याच पध्दतीने भरले गेले आहेत. त्यामुळे हे प्रथमच होते असे नाही. तथापि, ७७ कोटींचा ठेका आणि त्यात सातशे कर्मचारी भरण्याचे म्हंटले नंतर अनेकांच्या भुवया उंचवले जाणे स्वाभाविक आहे.

मुळात, अशाप्रकारचे ठेकेदारी पध्दतीने कर्मचारी भरण्याचे ठरवल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे घोळ होतात आणि आर्थिक संबंध प्रस्थापित होतात. त्यातून वाद होतात आणि नगरसेवकांच्या मागणीनुसार मानधनावर कर्मचारी भरावे तर त्यातचही घोळ होतात आणि नगरसेवकांच्या शिफारसीवरून भरलेले हेच कर्मचारी नंतर महापालिकेत कायम होण्यासाठी न्यायालयात जातात आणि मागील दाराने भरती होते. त्यामुळे पर्याय कोणताही निवडा वाद होणारच अशी स्थिती आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शासनानेच धोरण ठरविण्याची गरज आहे. मानधनावर काही प्रमाणात भरती करण्याची परवानगी दिली तरी ठेक्यातील घोळ कमी होतीलच आणि पारदर्शक पध्दतीने मानधनावर भरती केल्यास स्थानिक भूमिपूत्रांना देखील रोजगार मिळू शकेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ठेक्यामुळे होणारी महापालिकेची शोेभा टळू शकेल !

 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार