शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

कळवण तालुक्यातील ‘त्या’ गावांमध्ये अद्याप भय कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 18:08 IST

दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत आहे.

ठळक मुद्देभूकंपाचे धक्के : यंत्र बसविण्यासाठी राज्य सरकारला साकडे१९८६, १९९९, २००० व २००१ मध्ये मोठ्या प्रमाणात धक्के

नाशिक : कळवण तालुक्यातील काही गावांना सातत्याने बसणा-या धक्क्यामुळे गावातील हजारो नागरिक अद्यापही दहशतीखाली वावरत असून, सध्या थंडीचे दिवस असूनही भूकंपाच्या भीतीने लोक रात्रीही घराबाहेर झोपू लागले आहेत. शासनाने सतत बसणा-या भूकंपाचे कारण शोधून उपाययोजना करावी तसेच या भागात भूकंपमापन यंत्र बसवावे, अशी मागणी दहा गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जयश्री पवार या दोघांनीही पुढाकार घेऊन शासनाला पत्र दिले आहे. तसेच संबंधित सर्वच गावांमध्ये तातडीच्या ग्रामसभा होऊन त्यात उपरोक्त मागणीचे ठराव करण्यात आले आहेत. दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत असून, १९८६, १९९९, २००० व २००१ मध्ये मोठ्या प्रमाणात धक्के बसल्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली होती. परंतु तेव्हढ्यापुरतेच ग्रामस्थांना आश्वासित केले गेले, उलट नागरिकांनी घाबरू नये व भूकंप झाल्यास काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केल्यानंतर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. गेल्या महिन्यात २ व ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री पुन्हा धक्के बसल्यामुळे ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. कारण दळवट परिसरात चणकापूर, धनोली, भेगू, भांडणे, बोरगाव आदी ठिकाणी लहान मोठी पाण्याचा साठा असलेली धरणे आहेत. पुण्यातील भूकंप तज्ज्ञांनी २००२ मध्ये भविष्यात दळवट परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र असल्याचा अनुमान काढला होता. त्यामुळे शासनाने काहीकाळ दळवट भागात भूकंपमापक यंत्र बसविले होते, कालांतराने मात्र ते काढून नेण्यात आले. अजूनही अधूनमधून धक्के बसत असून, त्याची कोणतीही नोंद घेण्याची यंत्रे याठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना अंदाज बांधणे कठीण होते. त्यामुळे शासनाने या ठिकाणी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी नितीन पवार व जयश्री पवार यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने वेरुळे, कोसुर्डे, भांडणे, करंभेळ, खडकवण, विरशेत, बापखेडा, तताणी, दळवट, लिंगामे, शिंगाशी या गावांनी ग्रामसभा घेऊन या भागात भूकंपमापन यंत्र बसविण्यात यावे, असे ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत. प्रशासनानेही ग्रामस्थांच्या भावनेशी सहमती दर्शवित राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पत्र पाठवून उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपNashikनाशिक