शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कळवण तालुक्यातील ‘त्या’ गावांमध्ये अद्याप भय कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 18:08 IST

दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत आहे.

ठळक मुद्देभूकंपाचे धक्के : यंत्र बसविण्यासाठी राज्य सरकारला साकडे१९८६, १९९९, २००० व २००१ मध्ये मोठ्या प्रमाणात धक्के

नाशिक : कळवण तालुक्यातील काही गावांना सातत्याने बसणा-या धक्क्यामुळे गावातील हजारो नागरिक अद्यापही दहशतीखाली वावरत असून, सध्या थंडीचे दिवस असूनही भूकंपाच्या भीतीने लोक रात्रीही घराबाहेर झोपू लागले आहेत. शासनाने सतत बसणा-या भूकंपाचे कारण शोधून उपाययोजना करावी तसेच या भागात भूकंपमापन यंत्र बसवावे, अशी मागणी दहा गावांतील ग्रामस्थांनी केली आहे.या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जयश्री पवार या दोघांनीही पुढाकार घेऊन शासनाला पत्र दिले आहे. तसेच संबंधित सर्वच गावांमध्ये तातडीच्या ग्रामसभा होऊन त्यात उपरोक्त मागणीचे ठराव करण्यात आले आहेत. दळवट, भांडणे, कोसुर्डे, जामले, दरेगाव, आमदर, वडाळा, जिरवाडे, बोरदैवत, शिव भांडणे, लिंगामा, करंभेळ, खिराड, बापखेडा, देवळीवणी आदी गावांमध्ये १९८३ पासून भूकंपाचे धक्के बसत असून, १९८६, १९९९, २००० व २००१ मध्ये मोठ्या प्रमाणात धक्के बसल्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली होती. परंतु तेव्हढ्यापुरतेच ग्रामस्थांना आश्वासित केले गेले, उलट नागरिकांनी घाबरू नये व भूकंप झाल्यास काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केल्यानंतर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. गेल्या महिन्यात २ व ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री पुन्हा धक्के बसल्यामुळे ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. कारण दळवट परिसरात चणकापूर, धनोली, भेगू, भांडणे, बोरगाव आदी ठिकाणी लहान मोठी पाण्याचा साठा असलेली धरणे आहेत. पुण्यातील भूकंप तज्ज्ञांनी २००२ मध्ये भविष्यात दळवट परिसर हा भूकंप प्रवण क्षेत्र असल्याचा अनुमान काढला होता. त्यामुळे शासनाने काहीकाळ दळवट भागात भूकंपमापक यंत्र बसविले होते, कालांतराने मात्र ते काढून नेण्यात आले. अजूनही अधूनमधून धक्के बसत असून, त्याची कोणतीही नोंद घेण्याची यंत्रे याठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना अंदाज बांधणे कठीण होते. त्यामुळे शासनाने या ठिकाणी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी नितीन पवार व जयश्री पवार यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने वेरुळे, कोसुर्डे, भांडणे, करंभेळ, खडकवण, विरशेत, बापखेडा, तताणी, दळवट, लिंगामे, शिंगाशी या गावांनी ग्रामसभा घेऊन या भागात भूकंपमापन यंत्र बसविण्यात यावे, असे ठराव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले आहेत. प्रशासनानेही ग्रामस्थांच्या भावनेशी सहमती दर्शवित राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पत्र पाठवून उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपNashikनाशिक