शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

'मोदी म्हणतात अभिनंदनला सोडवलं...मग कुलभूषणला का सोडवलं नाही?' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. तसेच एअर स्ट्राईक लष्कराने केला अन् 56 इंच छाती कोण फुलवतंय तर मोदी अशी टीका पवारांनी मोदींवर केली. नाशिक येथील सय्यद पिंप्री येथे घेण्यात आलेल्या सभेत पवार बोलत होते. 

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत पवारांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, काश्मीर येथे कर्तव्य बजावताना पायलट निनाद मांडवगणे हॅलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. देशासाठी प्राण दिले याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी सरकारला सांगावं की, शहीदांचा राजकीय फायदा तुम्ही घेऊ नका असं शरद पवारांनी सांगितले. 

राज्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात माझ्यावर टीका करतात. माझ्या घराण्यात वाद सुरू आहे, पुतण्यानं पक्ष ताब्यात घेतला अशी टीका मोदींकडून माझ्यावर करण्यात येते. मात्र मोदींना कुटुंब नाही, मला कुटुंब आहे. त्यामुळे त्यांना कुटुंब नाही म्हणून उगाच कुठेही टिप्पणी करतात असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. त्याचसोबत नरेंद्र मोदींनी देशाची काळजी करावी, माझ्या कुटुंबाची करु नका असा चिमटाही पवारांनी काढला 

मोदी यांच्या भाषणातून गांधी घराणे आणि काँग्रेसवर टीका केली जाते. देशासाठी काँग्रेसने काहीच केलं नाही असा आरोप पंतप्रधान मोदी करतात याचा शरद पवारांनी समाचार घेतला. जवाहरलाल नेहरूंनी 11 वर्ष देशासाठी तुरुंगात घालवली, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि मोदी म्हणतात त्यांनी देशासाठी काहीच केलं नाही. नरेंद्र मोदींना सरकारच्या कामगिरीबद्दल सांगण्यासाठी काही नाही म्हणून गांधी घराण्यावर टीका करतात असा आरोप शरद पवारांनी केला. 

तसेच सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अजिबात आस्था नाही. कांदा महागला तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतात. मागच्या सरकारमध्ये कांदा महागला म्हणून भाजपानं आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून कांदा भाव पडताय. भावात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरलंय असंही शरद पवारांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ केल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे. गहू आणी तांदूळ दरात या सरकारनं अत्यल्प वाढ केली. सर्व शेतीमाल उत्पादनात मोदी सरकारनं आघाडी सरकारच्या तुलनेत अत्यल्प वाढ केली म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना  घामाची किंमत मिळायला हवी. शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती चमत्कार करू शकते असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिकSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019