शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी म्हणतात अभिनंदनला सोडवलं...मग कुलभूषणला का सोडवलं नाही?' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. तसेच एअर स्ट्राईक लष्कराने केला अन् 56 इंच छाती कोण फुलवतंय तर मोदी अशी टीका पवारांनी मोदींवर केली. नाशिक येथील सय्यद पिंप्री येथे घेण्यात आलेल्या सभेत पवार बोलत होते. 

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत पवारांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, काश्मीर येथे कर्तव्य बजावताना पायलट निनाद मांडवगणे हॅलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. देशासाठी प्राण दिले याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी सरकारला सांगावं की, शहीदांचा राजकीय फायदा तुम्ही घेऊ नका असं शरद पवारांनी सांगितले. 

राज्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात माझ्यावर टीका करतात. माझ्या घराण्यात वाद सुरू आहे, पुतण्यानं पक्ष ताब्यात घेतला अशी टीका मोदींकडून माझ्यावर करण्यात येते. मात्र मोदींना कुटुंब नाही, मला कुटुंब आहे. त्यामुळे त्यांना कुटुंब नाही म्हणून उगाच कुठेही टिप्पणी करतात असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. त्याचसोबत नरेंद्र मोदींनी देशाची काळजी करावी, माझ्या कुटुंबाची करु नका असा चिमटाही पवारांनी काढला 

मोदी यांच्या भाषणातून गांधी घराणे आणि काँग्रेसवर टीका केली जाते. देशासाठी काँग्रेसने काहीच केलं नाही असा आरोप पंतप्रधान मोदी करतात याचा शरद पवारांनी समाचार घेतला. जवाहरलाल नेहरूंनी 11 वर्ष देशासाठी तुरुंगात घालवली, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि मोदी म्हणतात त्यांनी देशासाठी काहीच केलं नाही. नरेंद्र मोदींना सरकारच्या कामगिरीबद्दल सांगण्यासाठी काही नाही म्हणून गांधी घराण्यावर टीका करतात असा आरोप शरद पवारांनी केला. 

तसेच सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अजिबात आस्था नाही. कांदा महागला तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतात. मागच्या सरकारमध्ये कांदा महागला म्हणून भाजपानं आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून कांदा भाव पडताय. भावात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरलंय असंही शरद पवारांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ केल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे. गहू आणी तांदूळ दरात या सरकारनं अत्यल्प वाढ केली. सर्व शेतीमाल उत्पादनात मोदी सरकारनं आघाडी सरकारच्या तुलनेत अत्यल्प वाढ केली म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना  घामाची किंमत मिळायला हवी. शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती चमत्कार करू शकते असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिकSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019