शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडीचा पाणीप्रश्न गढूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 23:08 IST

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे. इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम खैरेवाडी येथील हे भयानक वास्तव आहे.

ठळक मुद्देप्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारे

इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका हा पावसाचा तालुका म्हणून परिचित असला तरी खैरेवाडी या आदिवासी वस्तीतील नागरिकांचा पाणीप्रश्न अतिशय गंभीर असून १०-२० कुटुंबे असलेल्या या गावातील लोकांना अत्यंत दर्जाहीन गढूळ पाणी प्यावे लागत आहे.इगतपुरीपासून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम खैरेवाडी येथील हे भयानक वास्तव आहे.जनावरेसुद्धा आपले तोंड पाण्याला लावत नसून तहानलेले राहणे पसंत करीत असल्याचे दिसून आले आहे. या आदिवासी वस्तीवरील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून ३ ते ४ किलोमीटर जंगलातून पायी जावे लागते. एका आटलेल्या विहिरीत जीवावर उदार होऊन खाली उतरून गाळमिश्रित पाणी आणावे लागत आहे.जिवंतपणी नरकयातना सोसणाऱ्या या आदिवासी नागरिकांकडून तालुक्यातील लोकप्रतिनिधीचा तसेच शासनाचा जळजळीत निषेध व्यक्त होत आहे. हा त्रास असह्य झाल्याने लोकप्रतिनिधीना या पाड्यावर पाणी प्यायला यायचे निमंत्रण आदिवासी नागरिकांनी दिले आहे.या दुर्लक्षित पाड्यावर सरकारची मदत पोहोचेल का? कारण मागील महिन्यात येथून ५ किमी अंतर असलेल्या बिवलवाडी येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन तेथील आदिवासी बांधवांचा पिण्याचा प्रश्न मार्गी लावला. आमचाही पाण्यासाठी संघर्ष थांबेल का, हा प्रश्न येथील संतप्त नागरिक करत आहेत.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीwater shortageपाणीकपात