शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोराेनाच्या घुसळणीतील नाट्यविश्व; हा वास कुठून येतोय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 01:52 IST

कोरोनाने संपूर्ण विश्वालाच हादरवले असले तरी कला आणि नाट्यक्षेत्रावर तर अन्य सर्व क्षेत्रांपेक्षा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोनापूर्व, कोरोनाकाळ आणि नुकताच सुरू होत असलेल्या कोरोनोत्तर काळातील नाट्यक्षेत्रातील आव्हानांचा पट उलगडत लॉकडाऊनमधील मानसिकतेचे वास्तववादी सादरीकरण ‘हा वास कुठून येतोय?’ नाटकातून करण्यात आले.

नाशिक : कोरोनाने संपूर्ण विश्वालाच हादरवले असले तरी कला आणि नाट्यक्षेत्रावर तर अन्य सर्व क्षेत्रांपेक्षा सर्वाधिक परिणाम झाला आहे. कोरोनापूर्व, कोरोनाकाळ आणि नुकताच सुरू होत असलेल्या कोरोनोत्तर काळातील नाट्यक्षेत्रातील आव्हानांचा पट उलगडत लॉकडाऊनमधील मानसिकतेचे वास्तववादी सादरीकरण ‘हा वास कुठून येतोय?’ नाटकातून करण्यात आले.

कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये कलावंंतांची मन:स्थिती आणि हतबलता अधोरेखित करण्यात लेखक प्राजक्त देशमुख आणि दिग्दर्शक सचिन शिंदे यशस्वी ठरले. शुक्रवारी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील अखेरचे नाटक सचिन शिंदे अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेच्या वतीने हा वास कुठून येतोय ? या नाटकातून करण्यात आले. नाटकाच्या इतिहासात कोरोनापूर्व आणि कोरोनात्तर अशी मांडणी होण्याची शक्यता आहे. कोरोनानंतर नाट्यक्षेत्र आणि त्यांच्या समस्या बदलल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये नाटक बंद असल्याने अनेक कलावंत नाटकापासून दुरावले. अनेक कलावंतांनी उपजीविकेचे साधन नसल्याने नवीन छोटे मोठे व्यवसाय उभारले तर अनलॉकनंतरही कलावंतांच्या समस्या संपल्या नाहीत. ५० टक्के क्षमतेने सुरू असणारे नाट्यगृह, कोरोनाकाळात दुरावलेले रसिक यांना परत नाटकाकडे वळविण्याचे मोठे आव्हान नाट्यकर्मी समोर उभे राहिले आहे. हा विषय नाटकातून मांडण्यात आला आहे. कलावंतांच्या अंतरंगाचे दर्शन हा वास कुठून येतोय ? या नाटकातून घडले. प्रकाश योजना प्रफुल्ल दीक्षित, संगीत रोहित सरोदे, श्रीनाथ म्हात्रे, तेजस जोशी, नेपथ्य लक्ष्मण कोकणे, चेतन बर्वे, शेखर सरोदे, वेशभूषा कविता देसाई, रंगभूषा माणिक काकडे यांच्यासह धनंजय गोसावी, नीलेश सूर्यवंशी, प्रवीण कुलकर्णी, क्षमा देशपांडे, श्रद्धा पाटील, प्रांजल सोनवणे, सुयश गायकवाड, सोनाली काळे, साहील चंद्रमोरे, अरवी गिरासे, प्राजक्त गांगुर्डे, निहाल शेख, शुभम लांडगे या कलाकारांनी अभिनयातून विषय सक्षमपणे पोहोचवला. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा या नाटकाने समारोप झाला. नाटकात प्राथमिक फेरीत अनेक दर्जेदार आणि वास्तववादी विषय हाताळण्यात आले आहेत. त्यामुळे स्पर्धा चुरशीची झाल्याने आता कलावंतांना आणि रसिकांना स्पर्धेच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक