शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

ढोलेवाडीजवळील खड्डा ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:21 IST

देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो खड्डा धोकादायक व जीवघेणा बनला आहे.

ठळक मुद्देदेवगाव : खड्डा बुजवण्याची वाहनचालकांची मागणी

देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो खड्डा धोकादायक व जीवघेणा बनला आहे.खतरनाक ठरू पाहत असलेल्या खड्ड्यासंदर्भात प्रवाशांसह वाहनचालकांमधून खड्डा बुजवण्याची मागणी होऊ लागली आहे. परंतु, संबंधित विभागाने खड्डा बुजवण्यासाठी कोणतेच प्रयत्न न केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी ढोलेवाडीजवळ देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावर रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. परंतु, संबंधित प्रशासनाने या भगदाडाकडे दुर्लक्ष केल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्याचे रूपांतर भल्यामोठ्या खड्ड्यात झाले असून आता खड्ड्याने संपूर्ण रस्ताच व्यापून टाकण्याची संबंधित विभाग वाट बघत असल्याचा खोचक सवाल प्रवाशांमधून केला जात आहे.रस्त्यावरील खड्ड्यामुळे रात्री-अपरात्री वाहनधारकांना अंदाज न आल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ढोलेवाडीजवळून एका उतारावरील वळणावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी खड्ड्यातून वाटचाल करत असताना अनेकांना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले आहे.रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने काही दुचाकीस्वार खड्ड्यात आदळून कोलमडल्याच्या घटना घडून जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वाहनधारकांकडून तो खड्डा बुजविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गक्रमण चालूसदर रस्ता नियमित वर्दळीचा असून या मार्गाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गक्रमण नियमितपणे चालू असते. तसेच मुंबई-नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्यामुळे या रस्त्याने मोठी रीघ लागलेली असते. त्र्यंबकेश्वरकडे पायी जाणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन प्रवाशांसह वारकऱ्यांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत