शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

ढोलेवाडीजवळील खड्डा ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:21 IST

देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो खड्डा धोकादायक व जीवघेणा बनला आहे.

ठळक मुद्देदेवगाव : खड्डा बुजवण्याची वाहनचालकांची मागणी

देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो खड्डा धोकादायक व जीवघेणा बनला आहे.खतरनाक ठरू पाहत असलेल्या खड्ड्यासंदर्भात प्रवाशांसह वाहनचालकांमधून खड्डा बुजवण्याची मागणी होऊ लागली आहे. परंतु, संबंधित विभागाने खड्डा बुजवण्यासाठी कोणतेच प्रयत्न न केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी ढोलेवाडीजवळ देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावर रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. परंतु, संबंधित प्रशासनाने या भगदाडाकडे दुर्लक्ष केल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्याचे रूपांतर भल्यामोठ्या खड्ड्यात झाले असून आता खड्ड्याने संपूर्ण रस्ताच व्यापून टाकण्याची संबंधित विभाग वाट बघत असल्याचा खोचक सवाल प्रवाशांमधून केला जात आहे.रस्त्यावरील खड्ड्यामुळे रात्री-अपरात्री वाहनधारकांना अंदाज न आल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ढोलेवाडीजवळून एका उतारावरील वळणावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी खड्ड्यातून वाटचाल करत असताना अनेकांना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले आहे.रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने काही दुचाकीस्वार खड्ड्यात आदळून कोलमडल्याच्या घटना घडून जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वाहनधारकांकडून तो खड्डा बुजविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गक्रमण चालूसदर रस्ता नियमित वर्दळीचा असून या मार्गाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गक्रमण नियमितपणे चालू असते. तसेच मुंबई-नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्यामुळे या रस्त्याने मोठी रीघ लागलेली असते. त्र्यंबकेश्वरकडे पायी जाणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन प्रवाशांसह वारकऱ्यांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत