शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ढोलेवाडीजवळील खड्डा ठरतोय जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 00:21 IST

देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो खड्डा धोकादायक व जीवघेणा बनला आहे.

ठळक मुद्देदेवगाव : खड्डा बुजवण्याची वाहनचालकांची मागणी

देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तो खड्डा धोकादायक व जीवघेणा बनला आहे.खतरनाक ठरू पाहत असलेल्या खड्ड्यासंदर्भात प्रवाशांसह वाहनचालकांमधून खड्डा बुजवण्याची मागणी होऊ लागली आहे. परंतु, संबंधित विभागाने खड्डा बुजवण्यासाठी कोणतेच प्रयत्न न केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित विभागावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी ढोलेवाडीजवळ देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावर रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडला होता. परंतु, संबंधित प्रशासनाने या भगदाडाकडे दुर्लक्ष केल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्याचे रूपांतर भल्यामोठ्या खड्ड्यात झाले असून आता खड्ड्याने संपूर्ण रस्ताच व्यापून टाकण्याची संबंधित विभाग वाट बघत असल्याचा खोचक सवाल प्रवाशांमधून केला जात आहे.रस्त्यावरील खड्ड्यामुळे रात्री-अपरात्री वाहनधारकांना अंदाज न आल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ढोलेवाडीजवळून एका उतारावरील वळणावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी खड्ड्यातून वाटचाल करत असताना अनेकांना छोट्या-मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले आहे.रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने काही दुचाकीस्वार खड्ड्यात आदळून कोलमडल्याच्या घटना घडून जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वाहनधारकांकडून तो खड्डा बुजविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गक्रमण चालूसदर रस्ता नियमित वर्दळीचा असून या मार्गाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गक्रमण नियमितपणे चालू असते. तसेच मुंबई-नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्यामुळे या रस्त्याने मोठी रीघ लागलेली असते. त्र्यंबकेश्वरकडे पायी जाणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन प्रवाशांसह वारकऱ्यांचा प्रवास सुखकर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत