शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दिंडोरी तालुक्यातील धरणांची पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 18:15 IST

दिंडोरी/ लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणांची पातळी सध्या घटली असून जवळजवळ एक महिन्यापासून करंजवण धरणाच्या पाण्याचे आवर्तन निफाड व येवला तालुक्यात सुरू असून सध्याच्या मितीला तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या करंजवण धरणामध्ये अवघा ३६ टक्के साठा राहिल्याने परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देमहिन्यापासून आवर्तन सुरू : पाणी बंद करण्याची स्थानिकांची मागणी

दिंडोरी/ लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणांची पातळी सध्या घटली असून जवळजवळ एक महिन्यापासून करंजवण धरणाच्या पाण्याचे आवर्तन निफाड व येवला तालुक्यात सुरू असून सध्याच्या मितीला तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या करंजवण धरणामध्ये अवघा ३६ टक्के साठा राहिल्याने परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.करंजवण धरणातून जवळपास एक महिन्यापासून पालखेड जलाशयात पाण्याचे आवर्तन चालू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तरी हे चालू असलेले पाणी आवर्तन त्वरित बंद करण्यात यावे अशी स्थानिक शेतकरी वर्गाने मागणी केली आहे. जर हे पाणी असेच चालू राहिले तर एप्रिल व मे महिन्यात दिंडोरी तालुक्यातील बळीराजांवर पाणीटंचाईची संक्रांत निर्माण होईल असे भाकीत व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात करंजवण धरण प्रथमच शंभर टक्के भरले होते. त्यामुळे परिसरातील बळीराजांवर आता पाणीटंचाईचे संकट कोसळणार नाही असे बोलले जात होते. परंतु सध्या गेल्या एक महिन्यापासून निफाड, येवला येथे हे पाण्याचे आवर्तन चालू असून धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे.यंदा दिंडोरी तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून जर धरणातील पाणी साठा कमी होत गेला तर तालुक्यातील नागरिकांना व शेतकरी वर्गाला मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे बोलले जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात करंजवण धरणांतून मोठ्या प्रमाणावर पालखेड धरणांत पाणी सोडण्यात येत असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ऐन उन्हाळ्यात कादवा नदीचे पात्र पाण्याविना उपाशी राहाते. परिणामी कादवा काठच्या गावांना नागरिकांना, जनावरांना, शेतकरी वर्गाला पाणीटंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो. पाणी आवर्तन सोडतांना सलग असू नये. त्यामध्ये काही प्रमाणात अंतर असावे अशी ही मागणी जोर धरीत आहे.धरणांची पाणीसाठा टक्केवारी याप्रमाणे:१) पालखेड :- ६४ %२)ओझरखेड:- ५७%३)तिसगाव :-४८%४)करंजवण :-३६%५)पुणेगाव :-३५%६)वाघाड :-२४%

(१८ दिंडोरी डॅम)

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात