शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

लेखनाचा प्रवास वास्तव, इतिहासाला धरून असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 00:32 IST

नाशिक : मराठी वाचक खूप जागरूक आहे. लेखकाकडून झालेली एखादी चूक त्याच्या चटकन लक्षात येते. त्यामुळे ऐतिहासिक लेखन करताना लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवरून कलाकार खाली पडू नये, आणि खेळही रंगात यावा, अशी ही कसरत असते, असे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.

नाशिक : मराठी वाचक खूप जागरूक आहे. लेखकाकडून झालेली एखादी चूक त्याच्या चटकन लक्षात येते. त्यामुळे ऐतिहासिक लेखन करताना लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवरून कलाकार खाली पडू नये, आणि खेळही रंगात यावा, अशी ही कसरत असते, असे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त श्री जैनसेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. १५) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ते बोलत होते. ह्यमी आणि माझे लेखनह्ण विषयावर त्यांनी दुसरे पुष्प गुंफले. बेबीलाल संचेती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रा. यशवंत पाटील, मोहनलाल ब्रह्मेचा, राजेंद्र कुमट, सोनल दगडी, संगीता बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.पाटील म्हणाले, ह्यपानिपतह्ण माझ्यासाठी ह्यपुण्यपतह्ण ठरले. या कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले, अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. तसेच या कादंबरीमुळे ७० पुरस्कार आणि मानसन्मान मिळवून दिला. लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना पुस्तके वाचून घडलो. इयत्ता पाचवीत असताना भगवान महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा गांधी, साने गुरुजी वाचले. शिक्षकांचेही योग्य मार्गदर्शन लाभल्याने वाचनासोबतच लेखनाची आवड निर्माण झाली.इतिहास लेखनात सणावळ्या, तह असतातच, मात्र लेखकाने त्यातून माणुसकीचा झरा शोधायचा असतो. लेखक हा समाज, प्रदेश, भाषेला बांधील नसतो; तो माणुसकीचा कैवारी असायला हवा.ऐतिहासिक लेखक अनेकदा मनाचे किती आणि इतिहासाचे किती लिहिले जाते, अशी विचारणा करतात. त्यामुळे लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. पुराव्याच्या आधारे लेखन करावे लागते, असे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम सुराणा यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी कटारिया यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक