शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

हंडामोर्चाचा इशारा देताच विहिरीची खोदाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 00:09 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पुंगटवाडी व मिलनवाडी यासह काही गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने श्रमजीवी संघटनेने १० मेपर्यंत पाण्याचे टँकर गावात ...

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेचा हंडा मोर्चा रद्द

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पुंगटवाडी व मिलनवाडी यासह काही गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने श्रमजीवी संघटनेने १० मेपर्यंत पाण्याचे टँकर गावात पोहोचले नाहीत, तर थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर रिकामे हंडे घेऊन गावातील महिला पायी चालत येतील, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन हलले असून, दोन जेसीबी लावून विहीर खोदण्याचे काम सोमवारी (दि.९) सुरू करण्यात आले.पाच- सहा दिवसांपूर्वीच श्रमजीवी संघटनेतर्फे भगवान मधे यांनी तहसीलदार यांच्यासह पंचायत समिती कार्यालयाला पत्र देऊन पाणीटंचाईकडे लक्ष वेधले होते. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने येत्या १० मेपर्यंत पाणीप्रश्न न सुटल्यास गावातील महिला रिकामे हंडे घेऊन पायी चालत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करतील, असा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत लागलीच दोन जेसीबी लावून विहीर खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. तसेच रोहिले, मुरंबी, वेळे येथेही टँकर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांत पुंगटवाडी व मिलनवाडी येथे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल त्यामुळे जि.प.नाशिक येथे दि.१० मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर धडकणारा मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचे श्रमजीवी संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.तोपर्यंत टँकरने पाणीसोमवारी तत्काळ मुळेगाव येथे विस्तार अधिकारी पवार, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी आणि ग्रामसेवक यांनी मुळेगाव गाठले आणि तत्काळ विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केले. जोपर्यंत काम सुरू आहे तोपर्यंत त्या वाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू राहील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.फोटो- ०९ त्र्यंबकेश्वर वॉटर०९ त्र्यंबक कोलाज

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरwater shortageपाणीकपात