शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हंडामोर्चाचा इशारा देताच विहिरीची खोदाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 00:09 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पुंगटवाडी व मिलनवाडी यासह काही गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने श्रमजीवी संघटनेने १० मेपर्यंत पाण्याचे टँकर गावात ...

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेचा हंडा मोर्चा रद्द

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पुंगटवाडी व मिलनवाडी यासह काही गावांना पाणीटंचाई जाणवत असल्याने श्रमजीवी संघटनेने १० मेपर्यंत पाण्याचे टँकर गावात पोहोचले नाहीत, तर थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर रिकामे हंडे घेऊन गावातील महिला पायी चालत येतील, असा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर जिल्हा परिषदेचे प्रशासन हलले असून, दोन जेसीबी लावून विहीर खोदण्याचे काम सोमवारी (दि.९) सुरू करण्यात आले.पाच- सहा दिवसांपूर्वीच श्रमजीवी संघटनेतर्फे भगवान मधे यांनी तहसीलदार यांच्यासह पंचायत समिती कार्यालयाला पत्र देऊन पाणीटंचाईकडे लक्ष वेधले होते. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे श्रमजीवी संघटनेने येत्या १० मेपर्यंत पाणीप्रश्न न सुटल्यास गावातील महिला रिकामे हंडे घेऊन पायी चालत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करतील, असा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेत लागलीच दोन जेसीबी लावून विहीर खोदण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. तसेच रोहिले, मुरंबी, वेळे येथेही टँकर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांत पुंगटवाडी व मिलनवाडी येथे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल त्यामुळे जि.प.नाशिक येथे दि.१० मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर धडकणारा मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचे श्रमजीवी संघटनेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.तोपर्यंत टँकरने पाणीसोमवारी तत्काळ मुळेगाव येथे विस्तार अधिकारी पवार, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी आणि ग्रामसेवक यांनी मुळेगाव गाठले आणि तत्काळ विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केले. जोपर्यंत काम सुरू आहे तोपर्यंत त्या वाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू राहील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.फोटो- ०९ त्र्यंबकेश्वर वॉटर०९ त्र्यंबक कोलाज

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरwater shortageपाणीकपात