शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पुरात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 01:54 IST

जातेगाव येथील खारी नदी पार करीत असताना महिला शेतमजूर व दोन मुली वाहून गेल्या होत्या. त्यातील दोन मृतदेह सापडले होते, तर एका मुलीचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांतून अखेर पूजा सोनवणे हिचा मृतदेह बोलठाण येथील नदीपात्रात सापडला

बोलठाण: जातेगाव येथील खारी नदी पार करीत असताना महिला शेतमजूर व दोन मुली वाहून गेल्या होत्या. त्यातील दोन मृतदेह सापडले होते, तर एका मुलीचा शोध घेण्यासाठी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांतून अखेर पूजा सोनवणे हिचा मृतदेह बोलठाण येथील नदीपात्रात सापडला. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

दि.२४ रोजी नांदगाव तालुक्यातील जातेगाव हद्दीतील खारी नदीच्या मार्गातून घरी जातांना शेतमजुरांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची बैलगाडी पाण्यात उलटली. यावेळी मीनाबाई दिलीप भैरव (४५), साक्षी अनिल सोनवणे (११), पूजा दिनकर सोनवणे (१५, रा.आडगांव, ता. कन्नड) हे पाण्याच्या प्रवाहात लाहून गेले. या दुर्घटनेतील मीनाबाई दिलीप भैरव, साक्षी अनिल सोनवणे यांचे मृतदेह त्याच दिवशी सापडले. मात्र, पूजा दिनकर सोनवणेचा शोध लागला नव्हता. दोन दिवस पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर दि. २६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथकाला पूजा सोनवणे हिचा मृतदेह सापडला.

सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, प्रदीप बागुल, आपत्ती व्यवस्थापन पथकासह सागर गडाख, विलास सूर्यवंशी, किसन जाधव, नीलेश नाठे, वैभव जमदाडे, किरण वाघ, संकेत वनारसे, बाळू आंबेकर, अजय चारोस्कर, कृष्णा धोंडगे, तसेच महसूल प्रशासनासह परिसरातील नागरिकांनी शोधकार्य हाती घेतले होते. तीन महिलांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू