शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

ठाणगावला दिवसाढवळ्या वृक्षतोड ;  कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:16 IST

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरात दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल होत असून, वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव परिसरात दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल होत असून, वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वनविभागाचे सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर क्षेत्र या भागात आहे. परिसरात वन्यप्राण्यांची संख्यादेखील जास्त आहे. वनविभागाने या परिसरातील मारुतीचा मोडा भागात नवीन वृक्षांची लागवड केलेली आहे. या भागात वृक्षांचे प्रमाण अधिक असल्याने व उन्हाळ्याची चाहूल लागल्याने महिलांच्या हाताला काही काम नसल्याने महिलांचा मोर्चा आता जंगलातील झाडांकडे वळालेला दिसत आहे. महिला सकाळी किंवा रात्रीच्या वेळी लाकडे गोळा करून सरपणाची मोळी घेऊन येताना दिसतात.  वनविभागाच्या वतीने कर्मचारी दिवसभर तळ ठोकून असतात. पण जोपर्यंत वन कर्मचारी तळ ठोकून असतात तोपर्यंत महिला जंगलात जात नाहीत. मारुतीचा मोडा, उंबरदरी धरण परिसर, लावदरी, भिकरवाडी परिसर आदी भागात जंगलातील वृक्षांचे प्रमाण जास्तच असल्याने महिलावर्ग लाकडे तोडण्यासाठी या भागात जात असतात. महिला झाडाची कत्तल करून एक दोन दिवस लाकडे सुकण्यासाठी ठेवतात व त्यानंतर घेऊन जातात. सकाळी दिवस उजाडण्याच्या अगोदर सरपणाची मोळी घेऊन येतात. वनविभागाने दिवसा व रात्री गस्त घालावी व जंगलतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.  वनविभागाच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. मारुती मोढा परिसरात मोरांचे प्रमाण अधिक असून, या भागात लोकवस्तीही जास्त आहे.मानवी वस्तीकडे मोरांचे जाणे-येणे अधिक असल्याने पाणवठे उभी केली तर वस्तीवर राहणारा लोकांना सुध्दा त्या पाणवडयात पाणी टाकता येऊ शकेल. परिसरात अन्य हिंस्त्र प्राण्यांचे प्रमाण जास्त असूनदेखील महिला सरपण गोळा करण्यासाठी जाताना दिसतात. कडक उन्हाळा लागलेला असून, वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे वळत आहेत. पावसाळ्याच्या सरपणासाठी महिला सरसकट जिवंत वृक्षांवर कुºहाड चालवत आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग