शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:09 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून यंदा दोन लाख दहा हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्णातील ९६ हजार १९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून यंदा दोन लाख दहा हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्णातील ९६ हजार १९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावीची परीक्षा सुरळीत पार पडावी तसेच परीक्षा कालावधीत संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने विभागात २७ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, त्यांची विभागातील ४३२ परीक्षा केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. दहावी परीक्षेचा गुरुवारी पहिलाच दिवस असून, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी आणि सिंधी या भाषा विषयांची परीक्षा असून, यात मराठी भाषा विषयाचा पेपर एक लाख ७६ हजार विद्यार्थी देणार आहेत. यावर्षी नाशिक विभागात ४३२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात येत असून, नाशिक जिल्ह्णात १९५ केंद्रांवर ९६ हजार १९२ विद्यार्थी, धुळे जिल्ह्णात ६३ परीक्षा केंद्रांवर ३० हजार २४९, जळगाव जिल्ह्णात १३१ केंद्रांवर ६३ हजार १५९ व नंदुरबार जिल्ह्णातील २१ हजार १८२ विद्यार्थ्यांची ४३ केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे.२७ पथकांची करडी नजरनाशिक विभागात ४३२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात ८, धुळे जिल्ह्णात ६, जळगावमध्ये ५ व नंदुरबारमध्ये ४ अशा २३ पथकांसह पाच विशेष पथकांची विभागातील सर्व परीक्षा केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे विशेष भरारी पथक अचानक परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी करेल, तर काही बैठे पथक परीक्षांवर नजर ठेवून असणार आहेत.संवेदनशील केंद्रांवर अधिक लक्षदहावी व बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांची दखल घेत शिक्षण मंडळाने यावर्षी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्णांतील २० संवेदनशील केंद्रांची यादी तयार केली असून, भरारी पथकांसोबतच काही केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक परीक्षेवर नियंत्रण ठेवणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा