शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:09 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून यंदा दोन लाख दहा हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्णातील ९६ हजार १९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरु वारपासून (दि. १) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेस सुरु वात होत असून, बारावीच्या परीक्षेनंतर आता शिक्षण मंडळातर्फे दहावी परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून यंदा दोन लाख दहा हजार ७८२ विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्णातील ९६ हजार १९२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दहावीची परीक्षा सुरळीत पार पडावी तसेच परीक्षा कालावधीत संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळाने विभागात २७ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, त्यांची विभागातील ४३२ परीक्षा केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. दहावी परीक्षेचा गुरुवारी पहिलाच दिवस असून, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराथी आणि सिंधी या भाषा विषयांची परीक्षा असून, यात मराठी भाषा विषयाचा पेपर एक लाख ७६ हजार विद्यार्थी देणार आहेत. यावर्षी नाशिक विभागात ४३२ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात येत असून, नाशिक जिल्ह्णात १९५ केंद्रांवर ९६ हजार १९२ विद्यार्थी, धुळे जिल्ह्णात ६३ परीक्षा केंद्रांवर ३० हजार २४९, जळगाव जिल्ह्णात १३१ केंद्रांवर ६३ हजार १५९ व नंदुरबार जिल्ह्णातील २१ हजार १८२ विद्यार्थ्यांची ४३ केंद्रांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे.२७ पथकांची करडी नजरनाशिक विभागात ४३२ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी विभागीय शिक्षण मंडळाने जिल्हानिहाय भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात ८, धुळे जिल्ह्णात ६, जळगावमध्ये ५ व नंदुरबारमध्ये ४ अशा २३ पथकांसह पाच विशेष पथकांची विभागातील सर्व परीक्षा केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे विशेष भरारी पथक अचानक परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी करेल, तर काही बैठे पथक परीक्षांवर नजर ठेवून असणार आहेत.संवेदनशील केंद्रांवर अधिक लक्षदहावी व बारावीच्या परीक्षांतील गैरप्रकारांची दखल घेत शिक्षण मंडळाने यावर्षी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या चार जिल्ह्णांतील २० संवेदनशील केंद्रांची यादी तयार केली असून, भरारी पथकांसोबतच काही केंद्रांवर पूर्णवेळ बैठे पथक परीक्षेवर नियंत्रण ठेवणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा