शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

नाशिकमध्ये तणाव निवळला

By admin | Updated: October 11, 2016 00:28 IST

जनजीवन पूर्वपदावर : शाळा, महाविद्यालये बंद; गृहराज्यमंत्र्यांची भेट

नाशिक : तळेगाव येथील अत्याचार प्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली आंदोलने आणि दगडफेकीमुळे निर्माण झालेला तणाव निवळला असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गही सुरळीत सुरू झाला आहे. सोमवारी जिल्ह्याचा ग्रामीण भाग वगळता शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. रविवारी रात्री उशिरापर्यंत तणावाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी शाळा, महाविद्यालये बंद होती. आंदोलकांनी केलेल्या शहर आणि ग्रामीण बसेसच्या नुकसानीमुळेबससेवा मात्र सोमवारीही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंधरा दिवसांच्या आत आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करू, असे स्पष्ट केले. शनिवारी तळेगाव येथे बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर जिल्हाभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. काही ठिकाणी शांततेत रास्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ, दगडफेक अशी हिंसक आंदोलने झाली. त्यामुळे आत्तापर्यंत ३५ पोलीस जखमी झाले आहेत. सोमवारी शहरातील नाशिकरोड, गंगापूर यांसह काही भागात किरकोळ आंदोलने झाली. तर ग्रामीण भागात दिंंडोरी तालुका बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला. या व्यतिरिक्त कळवण, निफाड तालुक्यातील चांदोरी, विंचूर आणि नैताळे तसेच येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातील वडाळभोई येथे रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये सुमारे वीस बसगाड्यांचे नुकसान झाल्याने शहर आणि लांबपल्ल्याच्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिक येथे येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सदर घटनेतील संबंधित आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे केसरकर यांनी पत्रकारांना सांगितले. तर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी नाशिकमधील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, राजकीय पक्षांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट बंदसोशल मीडियावर अफवांचा बाजार सुरू असून, तो रोखण्यासाठी पोलिसांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व मोबाइल इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. खासगी कंपन्या आणि बीएसएनएलने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार इंटरनेट बंद केल्याचे कळविले आहे. त्यामुळे मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर बंदी आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवस तात्पुरत्या स्वरूपात ही सेवा बंद असेल, असे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी सांगितले. मोबाइल बंदमुळे अनेकांचे हाल झाले असले, तरी यंत्रणेने उचललेल्या या पावलाचे सर्वसामान्यस्तरावर स्वागत करण्यात येत आहे.