शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

नाशिकमध्ये तणाव निवळला

By admin | Updated: October 11, 2016 00:28 IST

जनजीवन पूर्वपदावर : शाळा, महाविद्यालये बंद; गृहराज्यमंत्र्यांची भेट

नाशिक : तळेगाव येथील अत्याचार प्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली आंदोलने आणि दगडफेकीमुळे निर्माण झालेला तणाव निवळला असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यास प्रारंभ झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गही सुरळीत सुरू झाला आहे. सोमवारी जिल्ह्याचा ग्रामीण भाग वगळता शहरात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. रविवारी रात्री उशिरापर्यंत तणावाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी शाळा, महाविद्यालये बंद होती. आंदोलकांनी केलेल्या शहर आणि ग्रामीण बसेसच्या नुकसानीमुळेबससेवा मात्र सोमवारीही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंधरा दिवसांच्या आत आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करू, असे स्पष्ट केले. शनिवारी तळेगाव येथे बालिकेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर जिल्हाभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. काही ठिकाणी शांततेत रास्ता रोको करण्यात आला तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ, दगडफेक अशी हिंसक आंदोलने झाली. त्यामुळे आत्तापर्यंत ३५ पोलीस जखमी झाले आहेत. सोमवारी शहरातील नाशिकरोड, गंगापूर यांसह काही भागात किरकोळ आंदोलने झाली. तर ग्रामीण भागात दिंंडोरी तालुका बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला. या व्यतिरिक्त कळवण, निफाड तालुक्यातील चांदोरी, विंचूर आणि नैताळे तसेच येवला, नांदगाव, चांदवड तालुक्यातील वडाळभोई येथे रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये सुमारे वीस बसगाड्यांचे नुकसान झाल्याने शहर आणि लांबपल्ल्याच्या बससेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नाशिक येथे येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सदर घटनेतील संबंधित आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल, असे केसरकर यांनी पत्रकारांना सांगितले. तर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी नाशिकमधील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, राजकीय पक्षांनी शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील मोबाइल इंटरनेट बंदसोशल मीडियावर अफवांचा बाजार सुरू असून, तो रोखण्यासाठी पोलिसांनी नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व मोबाइल इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. खासगी कंपन्या आणि बीएसएनएलने जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार इंटरनेट बंद केल्याचे कळविले आहे. त्यामुळे मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर बंदी आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन दिवस तात्पुरत्या स्वरूपात ही सेवा बंद असेल, असे जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी सांगितले. मोबाइल बंदमुळे अनेकांचे हाल झाले असले, तरी यंत्रणेने उचललेल्या या पावलाचे सर्वसामान्यस्तरावर स्वागत करण्यात येत आहे.