शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

जाखोडच्या पाण्यावरून तणाव

By admin | Updated: November 25, 2015 23:52 IST

पुन्हा पाणी रोखले : संतप्त ग्रामस्थांनी धरणाचा ताबा घेऊन सोडले पाणी

 सटाणा : तहानलेल्या करंजाडी खोऱ्यासाठी जाखोड धरणातून सोडलेले पाणी मंगळवारी मध्यरात्री पुन्हा मुंगसे, पिंगळवाडे येथील ग्रामस्थांनी पोलीस यंत्रणेला न जुमानता रोखून विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, मंगळवारी दुपारी करंजाड ते आनंदपूरपर्यंतच्या सात गावातील चारशे ते पाचशे संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने हल्लाबोल करत धरणाचा ताबा घेतला आणि धरणाचा दरवाजा उघडून पाणी सोडले. दरम्यान, जाखोडच्या पाण्यावरून गावागावत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार आनंदपूरपर्यंत आवर्तनाचे पाणी पोहचेपर्यंत धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी दुसऱ्यांदा पाणी रोखणाऱ्या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता पुन्हा पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. मात्र मध्यरात्री एक वाजेनंतर पोलिसांची पाठ फिरताच दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी दुसऱ्यांदा धरणाचे दरवाजे बंद करून पाणी रोखले. धरणखालच्या या दोन्ही गावांच्या भूमिकेमुळे संतापाची लाट उसळून सुमारे चारशे ते पाचशेच्या संतप्त जमावाने मिळेल त्या वाहनाने थेट धरणावर हल्लाबोल करून ताबाच घेतला.यावेळी पाणी सोडून जमावाने घोषणा देत पाणी रोखणाऱ्यांना थेट आव्हान दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने शेवटच्या टोकाला पाणी पोहचेपर्यंत धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यावेळी अभियंता शिवाजी अहिरे, अशोक काकुळते, निकम यांच्यासह माधवराव दिघावकर, अशोक देवरे, संजय देवरे, वसंत पवार, बापू देवरे, राजेंद्र जाधव, बळीराम जाधव, रामभाऊ देवरे, प्रभाकर देवरे, पप्पू पवार, पोपट जाधव, किशोर ह्याळीज, साहेबराव खैरनार, कृष्णा जाधव, दिलीप शेवाळे, राकेश देवरे, विजय देवरे यांच्यासह चारशे ते पाचशे ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)