शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

आघार बुद्रुकसह धवळेश्वरला तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 21:55 IST

मालेगाव तालुक्यातील आघार बुद्रुक व धवळेश्वर येथे कमानीवर लावलेल्या ध्वजावरुन वाद झाल्याने दुपारी काही काळ तणाव निर्माण झाला होता: मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन बळाचा वापर करीत जमावाला पांगवले. पोलिस अधिकारी व तहसीलदार ज्योती देवरे यांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला. दरम्यान याप्रकरणी पोलीसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

आघार बुद्रुकला कमानीवर ग्रामदैवत तुळजाभवानी माता व धवळेश्वर येथील कमानीवर रु ख्मीणी मातेचा ध्वज लावण्याचा ठराव ग्रामसभेमध्ये करण्यात आला होता. या ठरावाला काही लोकांचा विरोध होता. त्यामुळे या दोन्ही गावात वाद होता. त्याचे रुपांतर तणावात झाले. तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोन्ही समाजातील नागरिकांना एकत्र बसवत हा प्रश्न मिटवला.शनिवारी आघार बुद्रुक ग्रामस्थांनी ग्रामदैवत तुळजाभवानी मातेचा ध्वज वाजत गाजत लावला होता. परंतु रविवारी (दि.२६) दुपारी अचानक ध्वज लावण्याच्या कारणावरु न धुसफूस सुरू झाली. दोन्ही गट आमने- सामने उभे ठाकल्याची माहिती पोलिसांना कळताच तहसीलदार देवरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील बच्छाव घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. वाद वाढू लागल्याने पोलीसांना काहीसा बळाचा वापर करावा लागला. त्यानंतर गावात शांतता पसरली. दोन्ही गावातील परिस्थिती नियंत्रणात असून या घटनेशी संबंधीत पाच जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा