शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

समुपदेशकांवरच येतोय ताण

By admin | Updated: July 2, 2014 00:17 IST

सेवेची सक्ती : विनामोबदला विद्यार्थ्यांसाठी करावी लागते चोवीस तास ड्यूटी

 

नाशिक : दहावी आणि बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, तसेच कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावण्याची जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या समुपदेशकांवरील ताण वाढला आहे. त्यांच्या मर्जीशिवाय आणि विनामोबदला त्यांना या समुपदेशनाच्या कामाला जुंपले जात असून, त्यातून त्यांना कोणत्याही प्रकारे पैसा आणि प्रतिष्ठा मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. दहावी, बारावीतील अनुत्तीर्ण मुलांना अपयशाच्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाने समुपदेशकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील नोंदणीकृत समुपदेशकांची यासाठी नियुक्ती केली जाते. त्याप्रमाणेच नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांसाठी त्या-त्या जिल्ह्यातील समुपदेशकांची नियुक्ती केली जाते. जेव्हा दहावी किंवा बारावीचा निकाल असतो तेव्हा विभागीय मंडळाकडून व्यवसाय मार्गदर्शन केंद्राकडून समुपदेशकांची नावे मागविली जातात. अशी नावे प्राप्त झाल्यानंतर मंडळाकडून त्यांची नावे जाहीर केली जातात. विशेष म्हणजे अशा प्रकारे आपल्या नावाच्या निवडीपासून ते त्यांचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक छापण्यापासून समुपदेशकांना कोणतीही पूर्वसूचनाच दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विभागीय मंडळाकडून या समुपदेशकांना साधा संपर्कही साधला जात नाही किंवा त्यांचे भ्रमणध्वनी कार्यान्वित आहेत किंवा नाहीत, याची कोणतीही शहानिशाच केली जात नाही. गेल्या काही वर्षांपासून समुपदेशकांमध्ये याविषयीची नाराजी आहे. मात्र त्यांच्या तक्रारीला वारंवार केराची टोपली दाखविली जाते. जे हजारो विद्यार्थी कदाचित मंडळाकडे तक्रारीचे फोन करू शकतात, असे सारे फोन कॉल्स या समुपदेशकांना येतात. पर्यायाने मंडळावरील ताण कमी होतोच, शिवाय पालक आणि विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शनही मिळते. निदान ही कृतज्ञता ओळखून तरी विभागीय मंडळाने या समुपदेशकांना मानधन सुरू करावे, अशी अपेक्षा आहे; मात्र त्याबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही. मुंबईतील विभागीय परीक्षा मंडळाकडून समुपदेशकांना मानधन सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर नाशिक विभागातील समुपदेशकांना मानधन सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र समुपदेशक स्पष्टपणे ही बाब सांगू शकत नसल्याने त्यांच्यावरच ताण वाढला असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)ा तास ड्यूटी