शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राममध्ये जागा वाटपावरून तंटा

By admin | Updated: July 9, 2015 00:05 IST

साधू-महंत नाराज : प्रशासनाने झटकली जबाबदारी

नाशिक : तपोवनात साकारलेल्या साधुग्राममधील प्लॉट वाटपाची जबाबदारी आखाडा प्रमुखांवर सोपवून नामनिराळे राहू पाहात असलेल्या जिल्हा प्रशासनाविरुद्ध साधू-महंतांनी क्रोध प्रकट करीत वाटप केल्या जात असलेल्या जागा घेण्यास नकार दिला. अडगळीच्या व अडचणीच्या जागा देऊन प्रशासन अवमान करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येऊन काही व्यक्ती पैसे घेऊन जागा वाटप करीत असल्याची तक्रार करण्यात आली. भर दुपारी सुरू झालेल्या या तंट्यामुळे तपोवनात धार्मिक तणाव निर्माण होत असल्याचे पाहून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली परंतु तोडगा काढण्यात अयशस्वी झाले. साधुग्राममध्ये महापालिकेने १९३७ प्लॉट विकसित केले असून, त्याचे वाटप तीन आखाडे व साडेसहाशे खालशांना केले जात आहे. मुळात प्रशासनानेच ते प्रत्येक आखाडा, खालशांच्या मागणीनुसार वाटप करणे अपेक्षित होते व त्यासाठी संयुक्त बैठकही बोलविण्यात आली होती. परंतु त्या बैठकीत जागा वाटपाची काही एक चर्चा न होता पडद्याआड आखाडा परिषदेलाच सहमतीने जागा वाटपाचे अधिकार प्रदान करून प्रशासन नामनिराळे झाले. प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसांपासून जागा वाटप करताना राबविण्यात येणाऱ्या पद्धतीमुळे अनेक खालशांच्या प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी अगदीच कोपऱ्यात व अपुरी जागा देण्यात आल्याची तक्रार केली तर काहींनी पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. शौचालयाला लागून जागा देण्यात येत असल्याने आरोग्य कसे सांभाळणार असा सवालही करण्यात आला तर काहींनी रस्त्यावरील मोक्याच्या जागा पैसे देऊन वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. दिगंबर आखाड्याच्या प्रमुखांनी तर या साऱ्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून या साऱ्या गोष्टीला प्रशासनच जबाबदार असल्याचे क्रोधीत होऊन सांगितले व सायंकाळी बैठक घेऊन पुढील रणनीती ठरविण्याचा इशारा दिल्यावर घाबरलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तपोवनात धाव घेऊन वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु क्रोधीत साधूंनी उपस्थित केलेल्या मुद्यावर समाधानकारक तोडगा निघण्याची वा काढण्याची शक्यता नसल्याने पाहून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जागा वाटपाचा ‘आपसी’ मुद्दा असल्याचे सांगितले. साधू-महंतांनी आपापसात बसून त्यांना योग्य व सोयीची जागा मिळावी म्हणून आखाडा प्रमुखांकरवी जागा वाटप केले जात असून, हा वाद त्यांनाच मिटवावा लागणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)