शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

साधुग्राममध्ये जागा वाटपावरून तंटा

By admin | Updated: July 9, 2015 00:05 IST

साधू-महंत नाराज : प्रशासनाने झटकली जबाबदारी

नाशिक : तपोवनात साकारलेल्या साधुग्राममधील प्लॉट वाटपाची जबाबदारी आखाडा प्रमुखांवर सोपवून नामनिराळे राहू पाहात असलेल्या जिल्हा प्रशासनाविरुद्ध साधू-महंतांनी क्रोध प्रकट करीत वाटप केल्या जात असलेल्या जागा घेण्यास नकार दिला. अडगळीच्या व अडचणीच्या जागा देऊन प्रशासन अवमान करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येऊन काही व्यक्ती पैसे घेऊन जागा वाटप करीत असल्याची तक्रार करण्यात आली. भर दुपारी सुरू झालेल्या या तंट्यामुळे तपोवनात धार्मिक तणाव निर्माण होत असल्याचे पाहून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली परंतु तोडगा काढण्यात अयशस्वी झाले. साधुग्राममध्ये महापालिकेने १९३७ प्लॉट विकसित केले असून, त्याचे वाटप तीन आखाडे व साडेसहाशे खालशांना केले जात आहे. मुळात प्रशासनानेच ते प्रत्येक आखाडा, खालशांच्या मागणीनुसार वाटप करणे अपेक्षित होते व त्यासाठी संयुक्त बैठकही बोलविण्यात आली होती. परंतु त्या बैठकीत जागा वाटपाची काही एक चर्चा न होता पडद्याआड आखाडा परिषदेलाच सहमतीने जागा वाटपाचे अधिकार प्रदान करून प्रशासन नामनिराळे झाले. प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसांपासून जागा वाटप करताना राबविण्यात येणाऱ्या पद्धतीमुळे अनेक खालशांच्या प्रमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी अगदीच कोपऱ्यात व अपुरी जागा देण्यात आल्याची तक्रार केली तर काहींनी पुरविण्यात आलेल्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. शौचालयाला लागून जागा देण्यात येत असल्याने आरोग्य कसे सांभाळणार असा सवालही करण्यात आला तर काहींनी रस्त्यावरील मोक्याच्या जागा पैसे देऊन वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. दिगंबर आखाड्याच्या प्रमुखांनी तर या साऱ्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून या साऱ्या गोष्टीला प्रशासनच जबाबदार असल्याचे क्रोधीत होऊन सांगितले व सायंकाळी बैठक घेऊन पुढील रणनीती ठरविण्याचा इशारा दिल्यावर घाबरलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तपोवनात धाव घेऊन वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु क्रोधीत साधूंनी उपस्थित केलेल्या मुद्यावर समाधानकारक तोडगा निघण्याची वा काढण्याची शक्यता नसल्याने पाहून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. या संदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जागा वाटपाचा ‘आपसी’ मुद्दा असल्याचे सांगितले. साधू-महंतांनी आपापसात बसून त्यांना योग्य व सोयीची जागा मिळावी म्हणून आखाडा प्रमुखांकरवी जागा वाटप केले जात असून, हा वाद त्यांनाच मिटवावा लागणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)