शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विकासासाठी विनाशाची प्रवृत्ती रोखायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:19 PM

ब्रह्मगिरी पर्वताच्या परिसरात सुरू असलेल्या खोदकामाच्या विरुद्ध पर्यावरणप्रेमींच्या तीव्र भावना आणि आंदोलनाची दखल अखेर प्रशासनाला घ्यावी लागली. दंडात्मक कारवाई करून हे खोदकाम रोखण्याचा निर्णय झाला. महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. जणूकाही याच कर्मचाऱ्यांमुळे हे खोदकाम सुरू होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सभोवताली घडणाऱ्या या बाबींची अजिबात कल्पना नव्हती, असे भासविण्याचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देगेल्यावर्षी अंजनेरी परिसराच्या अशाच प्रश्नाविषयी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवलाआरोग्य यंत्रणेपुढे आव्हानकेवळ घोषणा नको

मिलिंद कुलकर्णी             पर्यावरणप्रेमींच्या सजग आणि सतर्क भूमिकेचे समाजाने स्वागतच करायला हवे. जागरूक पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नांमुळे पर्यावरणाचे रक्षण होत आहे. ज्या शासकीय विभागांवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे, ते विभाग नेमके करतात काय, हा सामान्यांना न उलगडणारा प्रश्न आहे. सरकार बदलले की पर्यावरणाचे धोरण बदलते, हा अनुभव आहे.गेल्यावर्षी अंजनेरी परिसराच्या अशाच प्रश्नाविषयी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला होता. कारवाईचे नाटक तेव्हादेखील झाले होते; पण कालांतराने सगळे पूर्वपदावर आले. विकासासाठी विनाश ही संकल्पना जागतिक पातळीवरच रूढ करण्याचा आणि त्याचे जाणीवपूर्वक समर्थन करण्याचा संघटित प्रयत्न भांडवलदार करीत असतात. त्याला शासकीय, राजकीय आणि प्रशासकीय अशा तिन्ही पातळ्यांवर मूक पाठिंबा असतो. एवढ्या बलाढ्य यंत्रणेशी लढणे मूठभर पर्यावरणप्रेमींना अवघड असते. ब्रह्मगिरीच्या रूपाने मिळालेले यश कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारे आहे. म्हणून त्याचे महत्त्व आहे.आरोग्य यंत्रणेपुढे आव्हानकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक जिल्हा अग्रस्थानी होता. संपूर्ण देशात नाशिकच्या रुग्णसंख्येविषयी चर्चा होती. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, सामाजिक संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांनी दुसरी लाट थोपविण्यात यश आले आहे, मात्र अजूनही ११,००० रुग्ण उपचार घेत आहेत. मृत्यूंची संख्या रोज ३० पेक्षा अधिक आहे. रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय राज्य शासनाने रहित केला आहे. त्याच्या मागील उद्देश निश्चितच चांगला आहे; परंतु सार्वजनिक रुग्णालयातील आरोग्य सेवा तसेच अन्य सेवा यांचा दर्जा वाढविण्याची आवश्यकता आहे. कोरोनापश्चात आजारांनी तोंड वर काढले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने साथरोगांचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांच्याशी मुकाबला करावा लागणार आहे.केवळ घोषणा नकोकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रशासन व समाज गाफील असताना गाठले. प्रगत देशांमध्ये दुसरी आणि तिसरी लाट सुरू असताना आम्ही मात्र पहिली लाट यशस्वीपणे रोखली म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत होतो. दुसऱ्या लाटेने पितळ उघडे पडले. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा निर्धार हवेत विरला होता. पीएम केअर फंडातील काही व्हेंटिलेटर्स कार्यान्वित झाले नव्हते. ऑक्सिजन प्रकल्पाची धाव केवळ निविदा प्रक्रियेपर्यंत होती. त्यामुळे दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले. तेव्हा आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा पुरती हतबल दिसून आली. आता रुग्णसंख्या कमी होत असताना सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना रुग्णवाहिका ताब्यात मिळाल्या आहेत; परंतु त्या पूर्ण क्षमतेने वापरात नसल्याचे चित्र आहे. आता ४० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा झाली आहे. जून महिना अखेरपर्यंत हे प्रकल्प कार्यान्वित होतील असा निर्धार व्यक्त झाला आहे. तो वास्तवात उतरला तर सार्वजनिक आरोग्य यंत्रणा बळकट होण्यास मदत होईल. संभाव्य तिसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करता येईल. 

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासRevenue Departmentमहसूल विभाग