शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार वीज बील थकबाकीदारांची बत्ती गूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST

नाशिक : मीटरवरील आकडे आणि वाढीव वीजदर याबाबत ग्राहकांमध्ये मेाठ्या प्रमाणावर शंका असताना दुसऱ्या बाजूला ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ...

नाशिक : मीटरवरील आकडे आणि वाढीव वीजदर याबाबत ग्राहकांमध्ये मेाठ्या प्रमाणावर शंका असताना दुसऱ्या बाजूला ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीमही सुरू झाल्याने ग्राहकांची धावपळ वाढली आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असून, आतापर्यंत सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्यात आलेला आहे. थकबाकीची रक्कम मोठी असल्याने अशा प्रकारची मोहीम राबविण्यात येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

ऑगस्ट महिन्यात १० हजार २६० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, या ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना एकूण थकबाकीसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी भुर्दंड सोसावा लागणार आहे. नाशिक मंडळाअंतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण २ लाख ८१ हजार ग्राहकांकडे ६७ कोटी ३२ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील ३७ हजार ग्राहकांकडे १९ कोटी ५६ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील २ हजार ८९० ग्राहकांकडे ६ कोटी ३६ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील २ हजार ७१७ ग्राहकांकडे १७० कोटी ४२ लाख, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ३६ ग्राहकांकडे २० कोटी ७४ लाख थकबाकी आहे. नाशिक परिमंडलात एकूण ७ लाख २९ हजार ग्राहकांकडे ८५५ कोटी ४० लाख रुपये थकबाकी आहे.

महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेतून महावितरणच्या थकबाकी वसुलीमध्ये वाढ होत असली तरी ग्राहकांमधील शंकांचे समाधान मात्र होत नसल्याचेही बोलले जात आहे. वाढीव वीज बिलाचे गणित महावितरणकडून मांडले जात असताना अचानक वाढलेल्या वीज बिलाबाबत ग्राहकांचे समाधान होताना दिसत नाही. वीज बिलाच्या दरात वाढ झाल्याची माहिती असंख्य ग्राहकांपर्यंत पोहोचलेली नाही. याशिवाय दंडात्मक रकमेबाबतची नाराजीदेखील आहे. नेमकी याबाबतच स्पष्टता नसल्याने माहिती ग्राहकांच्या पचनी पडत नसल्याचे एकूणच चित्र आहे.

--इन्फो--

वीज बिल भरण्यासंदर्भात येणाऱ्या भ्रमणध्वनीवरून केवळ दोन तास वीज बिल भरण्याची मुदत दिली जाते. दुपारी दोन वजल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्याचे सांगितले जाते. विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबतची कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहे. त्यातून त्यांचे समाधान करण्याऐवजी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. मंडळ पातळीवरील कर्मचाऱ्यांकडून थेट कारवाईची भाषा केली जात असल्याने अनेकांना बिल भरण्यासाठी पुरेसा वेळही मिळत नसल्याची तक्रार आहे.