शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
2
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
3
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
4
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
5
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
6
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
7
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
8
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
9
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
10
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
11
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
12
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान
13
Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
14
...तर वैष्णवीसोबत असे घडलेच नसते; हगवणेंच्या मोठ्या सुनेच्या दाव्याने खळबळ
15
परदेशी विद्यार्थ्यांसाठी हार्वर्ड विद्यापीठाचे दरवाजे बंद! ७८८ भारतीय विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार?
16
बँकांनी व्याजदर कापले? नो टेन्शन! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला FD पेक्षाही जास्त परतावा देईल
17
भीषण अपघात, भरधाव कार रस्त्यावरून घसरून झाडावर धडकली, तीन मित्रांचा जागीच मृत्यू 
18
Video: स्मृती मंधानाने दणक्यात साजरा केला बॉयफ्रेंडचा वाढदिवस; बॉलिवूड स्टार्सचीही हजेरी
19
आर्यन खान तुरुंगात कसा राहायचा? राऊतांच्या 'नरकातील स्वर्ग'मध्ये शाहरुखच्या लेकाचाही उल्लेख
20
वैष्णवीचं बाळ जवळ ठेवणाऱ्या निलेश चव्हाणचे कारनामे उघड; पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेरे बसवले, अन्....

सांगा, आम्ही शिकायचं कसं?

By admin | Updated: September 26, 2014 23:59 IST

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर : विद्यार्थिनींचा संतप्त सवाल

विंचूर : प्रसंग पहिला : येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर भरवस फाट्यावरून घराकडे जात असते. कोपरगावकडे जाणारा ट्रक युवतीजवळ थांबतो. काही कळण्याच्या आत तिला वाहनात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. समयसुचकता दाखवत युवतीने आरडाओरड केल्यामुळे ट्रकचालक वाहनासह पलायन करतो.प्रसंग दुसरा : अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना मोटारसायकलस्वार तिला रस्त्यात अडवतो. मुलीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मुलीच्या किंचाळण्याने मजूर, शेतकरी धाव घेतात. हुल्लडबाजी करणाऱ्या युवकाला जमावाकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले जाते.प्रसंग तिसरा : सायंकाळी साडेपाचला शाळा सुटल्यानंतर बसने प्रवास करणारे विद्यार्थी तिनपाटीवर बसची वाट पाहत थांबतात. बसचालक मुलांना मागून बस येत आहे, या बसमध्ये पास चालत नाही असे सांगून प्रवेश नाकारतात. कित्येक वेळ वाट पाहून बस येत नसल्याचे बघून उशीर झाल्याने काही विद्यार्थी मोटारसायकलस्वारास हात देऊन थांबविण्यासाठी विनंती करीत असल्याचे चित्र दिसून येते.एस.टी. महामंडळाचे अडवणुकीचे धोरण, विद्यालयाच्या आवाराबाहेर हुल्लडबाजी करणारे टोळके व रस्त्यावरील असुरक्षितता यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून, ‘आम्ही शाळेत जायचं का नाही’, असा सवाल उपस्थित केला आहे. एकही मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. कर्मवीर विद्यालयाच्या संकुलात उत्तम शिक्षण मिळत असले तरीही शाळाबाह्य असुविधांमुळे पालकांंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यालयात सुमारे २५००च्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विद्यार्थीसंख्या मोठी असल्याने शालेय प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरीही शाळेच्या बाहेर कंपाउंडजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांना आवर घालता आलेला नाही. टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने संबंधित विभागाला अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. विंचूर मध्यवर्ती गाव असल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बरीचशी मुले बसनेच प्रवास करतात. तथापि, अनेक वेळा बसमध्ये प्रवेश मिळत नसल्याने त्यांचे हाल होत असतात. येवला आगारातील अनेक बसवाहक विद्यार्थ्यांना टाळण्यासाठी नाशिकऐवजी औरंगाबाद अशी पाटी लावत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे.