शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, आम्ही शिकायचं कसं?

By admin | Updated: September 26, 2014 23:59 IST

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर : विद्यार्थिनींचा संतप्त सवाल

विंचूर : प्रसंग पहिला : येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर भरवस फाट्यावरून घराकडे जात असते. कोपरगावकडे जाणारा ट्रक युवतीजवळ थांबतो. काही कळण्याच्या आत तिला वाहनात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. समयसुचकता दाखवत युवतीने आरडाओरड केल्यामुळे ट्रकचालक वाहनासह पलायन करतो.प्रसंग दुसरा : अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना मोटारसायकलस्वार तिला रस्त्यात अडवतो. मुलीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मुलीच्या किंचाळण्याने मजूर, शेतकरी धाव घेतात. हुल्लडबाजी करणाऱ्या युवकाला जमावाकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले जाते.प्रसंग तिसरा : सायंकाळी साडेपाचला शाळा सुटल्यानंतर बसने प्रवास करणारे विद्यार्थी तिनपाटीवर बसची वाट पाहत थांबतात. बसचालक मुलांना मागून बस येत आहे, या बसमध्ये पास चालत नाही असे सांगून प्रवेश नाकारतात. कित्येक वेळ वाट पाहून बस येत नसल्याचे बघून उशीर झाल्याने काही विद्यार्थी मोटारसायकलस्वारास हात देऊन थांबविण्यासाठी विनंती करीत असल्याचे चित्र दिसून येते.एस.टी. महामंडळाचे अडवणुकीचे धोरण, विद्यालयाच्या आवाराबाहेर हुल्लडबाजी करणारे टोळके व रस्त्यावरील असुरक्षितता यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून, ‘आम्ही शाळेत जायचं का नाही’, असा सवाल उपस्थित केला आहे. एकही मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. कर्मवीर विद्यालयाच्या संकुलात उत्तम शिक्षण मिळत असले तरीही शाळाबाह्य असुविधांमुळे पालकांंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यालयात सुमारे २५००च्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विद्यार्थीसंख्या मोठी असल्याने शालेय प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरीही शाळेच्या बाहेर कंपाउंडजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांना आवर घालता आलेला नाही. टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने संबंधित विभागाला अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. विंचूर मध्यवर्ती गाव असल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बरीचशी मुले बसनेच प्रवास करतात. तथापि, अनेक वेळा बसमध्ये प्रवेश मिळत नसल्याने त्यांचे हाल होत असतात. येवला आगारातील अनेक बसवाहक विद्यार्थ्यांना टाळण्यासाठी नाशिकऐवजी औरंगाबाद अशी पाटी लावत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे.