शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
2
भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
3
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
6
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
7
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
8
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
9
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
10
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
11
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
12
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
13
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
14
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
15
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
16
Operation Sindoor Live Updates: भारत पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबला! डोनाल्ड ट्रम्प यांनी काय सांगितलं?
17
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
18
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
19
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
20
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक

मशागतीसाठी बैलजोडी औताला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 20:59 IST

खडकी : जमिनीची जलद मशागत करण्यासाठी पारंपारिक बैलजोडीच्या औताला फाटा देऊन ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर यंत्रानेच पसंती दिली जात आहे. १ हजार ४०० रुपये प्रतिहेक्टर दराने जमिनी कांदा पिकासाठी तयार केल्या जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सध्या ५० रुपये किलो दराने कांदा विकत खाण्याची वेळ आल्याने पोशिंदाच याचक झाला आहे.

खडकी : जमिनीची जलद मशागत करण्यासाठी पारंपारिक बैलजोडीच्या औताला फाटा देऊन ट्रॅक्टरद्वारे रोटाव्हेटर यंत्रानेच पसंती दिली जात आहे. १ हजार ४०० रुपये प्रतिहेक्टर दराने जमिनी कांदा पिकासाठी तयार केल्या जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या सध्या ५० रुपये किलो दराने कांदा विकत खाण्याची वेळ आल्याने पोशिंदाच याचक झाला आहे.शेतकरी आपल्या पारंपारिक शेती व्यवसायाबरोबरच पाळीव प्राण्याची जतन करतो बैल, गायी,म्हशी, शेळ्या मोठ्या आदि जनावराच्या माध्यमातून दुधासारखा दुय्यम व्यवसाय करतो. तसेच बैल जोडीला औताला जोडून जमिनीची मशागत करतात मात्र सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली नसल्याने जमिनी झटपट नागरणी, वखारणी करावी लागत आहे.बैलजोडी औताच्या माध्यमातुन तयार करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र जमिनीचा जसा वाफसा होत आहे. त्या सवडीने जमीन तयार करावीत लागत आहे. गहू, हरभºयाचा हंगाममध्ये पेरणीला सुरूवात करावी लागणार आहे. तसेच उन्हाळ व रांगडा कांद्याचीही लागवड करावी लागणार आहे. यामुळे यंत्राचाच वापर करावा लागत आहे. मात्र ओली जमीन तयार करण्यासाठी ट्रॅक्टर मालकांनी १४०० रुपये एकराने रोटाव्हेटरद्वारे जमीन करुन मिळत आहे.गत तीन वर्षाच्या दुष्काळामुळे २५ एकराचा शेतकरी स्वस्त धान्य दुकानावर रांगा लावून गहू धान्य घेत आहे. शेतकºयाकडे दोन वर्षाचा साठा होऊ शकतो त्यामुळे गव्हाच्या कणग्या खाली झाल्या आहे. लहान बालके बाजरीच्या भाकरींना कंटाळली आहेत. त्यात स्वस्त धान्य दुकानातील खिचली मात्र गृहिनींना चांगली साथ देत आहे. कारण सायंकाळच्या स्वयंपाकाची चिंता सतावते मात्र खिचडीमुळे हा ताण कमी झाल्याने अन्नसुरक्षा योजनेचा मोठा लाभ मिळत आहे. जो शेतकरी आपला कांदा बाजारात विक्रीला नेत असे तोच शेतकरी सद्यस्थितीत ५० रुपये कांदा विकत घेऊन खात आहे. मात्र नगरवासियांनाच महागाईची घड भरते. कांद्याचे दर वाढले की महागाईला पेव फुटते त्यामुळे कांदा बाजारावर त्वरित परिणाम होत आहे. कांद्याची साठवण संपल्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महाग कांदा खरेदी करावा लागणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक