शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

घाटगे यांच्या चरित्रातून मूल्यांची शिकवण

By admin | Updated: November 24, 2014 00:23 IST

दिनकर गांगल : शंकर बोऱ्हाडे लिखित ‘देशभक्त शेषराव घाटगे’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन

नाशिक : देशभक्त शेषराव घाटगे यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रांमधून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. त्यातील अनेक प्रसंग समाजाला मूल्यांची शिकवण देतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांनी ‘देशभक्त शेषराव घाटगे’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना केले.आय.एम.ए. सभागृहात सारांश प्रकाशनच्या वतीने आयोजित समारंभात प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे लिखित ‘देशभक्त शेषराव घाटगे’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन गांगल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार होत्या. यावेळी दिनकर गांगल यांनी सांगितले, नेरपिंगळाई, अमरावती येथील देशभक्त शेषराव घाटगे यांची पत्रे त्यांच्या वारसांनी जपून ठेवली म्हणून एक चांगला ठेवा लोकांसमोर येऊ शकला. शेषरावांच्या पत्रातील भाषा ही गडकऱ्यांसारखीच आहे. शेषरावांची पत्रे सुसंस्कार देणारी असून, त्यांनी त्यातून समाजाचा बारकाव्याने केलेला अभ्यासही प्रतीत होतो. उशिराने का होईना त्यांच्या विचारांचा खजिना बोऱ्हाडे व घाटगे कुटुंबीयाने उपलब्ध करून दिला. त्यामुळे समाजाची वैचारिक जडणघडणच होणार असल्याचे गांगल यांनी सांगितले. यावेळी लेखक प्रा. शंकर बोऱ्हाडे, प्रा. गो. तु. पाटील व डॉ. विजय घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्रीमती नीलिमा पवार यांनीही चरित्रग्रंथामुळे समाजाला मोठा वैचारिक खजिना उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. स्वानंद बेदरकर यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घाटगे यांनी आभार मानले. व्यासपीठावर नेरपिंगळाई येथील डॉ. मोतीलाल राठी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, कामगार नेते दत्ता निकम, श्रीकांत घाटगे आदि, तर सभागृहात माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जयप्रकाश जातेगावकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, मिलिंद मुरुगकर, प्राचार्य दिलीप धोंडगे, प्राचार्य दिलीप शिंदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)