शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिक्षक, विद्यार्थ्यांनी अडविले बंधाऱ्याद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 23:05 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : भूतमोखाडा येथे दोन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे.जलपरिषद मित्र परिवाराने हाती घेतलेल्या वनराई बंधारा मोहिमेत भूतमोखाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कृतिशील शिक्षक अमृत चौधरी यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक प्रकाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली व जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वनराई बंधाऱ्यांची शिक्षक विद्यार्थ्यांनी निर्मिती केली आहे.रिकाम्या गोण्यात माती टाकून आडवा बांध भरण्यात येत असून, याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही हरसूल सारख्या ग्रामीण भागात उन्हाळ्यात ग्रामस्थांना तसेच जंगली प्राणी, जनावरे, पशुपक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येत आहे.यावेळी विहिरी तळ गाठत आहे. मात्र, वाहून जाणारे पाणी अडविल्यास जमिनीत ते मुरते व भूजल पातळीत वाढ होत असल्याने हे वनराई बंधारे काही महिन्यांसाठी ग्रामस्थांना लाभदायक ठरते, विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत होत आहे. काही दिवसांनंतर हे वनराई बंधारे परिपक्व होत असल्याने काही ठिकाणी मे महिना अखेरची पाणी साठवण क्षमता तग धरून राहत आहे.पाण्याचे महत्त्व पटू लागल्याने ग्रामस्थ हिरीरिने या मोहिमेत सहभागी होत आहेत. वनराई बंधाऱ्यांचा श्रमदानात सक्रिय होताना दिसत आहेत. यावेळी यादव महाले, प्रकाश बरफ, काशिनाथ बरफ, शिवराम बरफ, जलमित्र पोपट महाले, अनिल बोरसे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते..

टॅग्स :WaterपाणीStudentविद्यार्थी