शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शिक्षक, विद्यार्थ्यांनी अडविले बंधाऱ्याद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 23:05 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : भूतमोखाडा येथे दोन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे.जलपरिषद मित्र परिवाराने हाती घेतलेल्या वनराई बंधारा मोहिमेत भूतमोखाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कृतिशील शिक्षक अमृत चौधरी यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक प्रकाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली व जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वनराई बंधाऱ्यांची शिक्षक विद्यार्थ्यांनी निर्मिती केली आहे.रिकाम्या गोण्यात माती टाकून आडवा बांध भरण्यात येत असून, याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही हरसूल सारख्या ग्रामीण भागात उन्हाळ्यात ग्रामस्थांना तसेच जंगली प्राणी, जनावरे, पशुपक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येत आहे.यावेळी विहिरी तळ गाठत आहे. मात्र, वाहून जाणारे पाणी अडविल्यास जमिनीत ते मुरते व भूजल पातळीत वाढ होत असल्याने हे वनराई बंधारे काही महिन्यांसाठी ग्रामस्थांना लाभदायक ठरते, विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत होत आहे. काही दिवसांनंतर हे वनराई बंधारे परिपक्व होत असल्याने काही ठिकाणी मे महिना अखेरची पाणी साठवण क्षमता तग धरून राहत आहे.पाण्याचे महत्त्व पटू लागल्याने ग्रामस्थ हिरीरिने या मोहिमेत सहभागी होत आहेत. वनराई बंधाऱ्यांचा श्रमदानात सक्रिय होताना दिसत आहेत. यावेळी यादव महाले, प्रकाश बरफ, काशिनाथ बरफ, शिवराम बरफ, जलमित्र पोपट महाले, अनिल बोरसे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते..

टॅग्स :WaterपाणीStudentविद्यार्थी