शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

शिक्षक, विद्यार्थ्यांनी अडविले बंधाऱ्याद्वारे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 23:05 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : भूतमोखाडा येथे दोन वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील भूतमोखाडा येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी वनराई बंधाऱ्याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविले आहे. यामुळे जनावरांना, तसेच ग्रामस्थांना वापरासाठी हा वनराई बंधारा उपयुक्त ठरला आहे.जलपरिषद मित्र परिवाराने हाती घेतलेल्या वनराई बंधारा मोहिमेत भूतमोखाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे कृतिशील शिक्षक अमृत चौधरी यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक प्रकाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली व जलपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वनराई बंधाऱ्यांची शिक्षक विद्यार्थ्यांनी निर्मिती केली आहे.रिकाम्या गोण्यात माती टाकून आडवा बांध भरण्यात येत असून, याद्वारे वाहून जाणारे पाणी अडविण्यात येते. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही हरसूल सारख्या ग्रामीण भागात उन्हाळ्यात ग्रामस्थांना तसेच जंगली प्राणी, जनावरे, पशुपक्ष्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ येत आहे.यावेळी विहिरी तळ गाठत आहे. मात्र, वाहून जाणारे पाणी अडविल्यास जमिनीत ते मुरते व भूजल पातळीत वाढ होत असल्याने हे वनराई बंधारे काही महिन्यांसाठी ग्रामस्थांना लाभदायक ठरते, विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत होत आहे. काही दिवसांनंतर हे वनराई बंधारे परिपक्व होत असल्याने काही ठिकाणी मे महिना अखेरची पाणी साठवण क्षमता तग धरून राहत आहे.पाण्याचे महत्त्व पटू लागल्याने ग्रामस्थ हिरीरिने या मोहिमेत सहभागी होत आहेत. वनराई बंधाऱ्यांचा श्रमदानात सक्रिय होताना दिसत आहेत. यावेळी यादव महाले, प्रकाश बरफ, काशिनाथ बरफ, शिवराम बरफ, जलमित्र पोपट महाले, अनिल बोरसे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते..

टॅग्स :WaterपाणीStudentविद्यार्थी