शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

भविष्याचा वेध घेत शिक्षकांनी विद्यार्थी घडवावे

By admin | Updated: February 26, 2017 23:06 IST

नाशिक : जागतिकीकरणाच्या युगात प्रचंड स्पर्धा वाढली असताना भारतातील शिक्षणप्रणाली अद्याप बदललेली नाही. असे प्रतिपादन राष्ट्रीय इन्डिपेंडन्ट लेबर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी केले.

नाशिक : जागतिकीकरणाच्या युगात प्रचंड स्पर्धा वाढली असताना भारतातील शिक्षणप्रणाली अद्याप बदललेली नाही. नावीन्यतेचा, चिकित्सक दृष्टिकोनचा अभाव यांसह विविध समस्यांनी शिक्षणव्यवस्था ग्रासली आहे. त्यासाठी शिक्षकांनी व्यापक चळवळ उभारून भविष्याचा वेध घेत विद्यार्थी घडविले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय इन्डिपेंडन्ट लेबर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांनी केले.  मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे इन्डिपेंडन्ट सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी टीचर्स युनियनच्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक मुंबई विद्यापीठातील लोककला विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, प्रा. गंगाधर अहिरे, अ‍ॅड. अंकिता मुदलियार, संघटनेचे अध्यक्ष रोहित गांगुर्डे, सरचिटणीस किशोर शिंदे, कार्याध्यक्ष संजय साळवे, सूर्यभान जगताप उपस्थित होते. पाटील म्हणाले, विकसनशील भारतासमोर दर्जेदार, कौशल्याधिष्ठित विद्यार्थी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. मात्र त्या शिक्षकांपुढेदेखील विविध समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये, शिक्षक भरतीला लागलेला ब्रेक, संस्थाचालकांची मनमानी यांसह विविध प्रश्न गंभीर स्वरूपाचे बनल्याने शिक्षकांनाही ज्ञानदानाचे कार्य करणे कठीण झाले असल्याचे पाटील म्हणाले.  डॉ. चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करताना, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याचे काम निष्ठेने करीत राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागात शिक्षणाची दुरवस्था असून, यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भावी नागरिक घडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असेही डॉ. चंदनशिवे म्हणाले. यावेळी शिक्षकांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रोहित गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकइन्डिपेंडन्ट सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी टीचर्सच्या वर्धापनदिनी शिक्षकांना गौरविण्यात आले. यात प्रा. भारत शिरसाठ, डॉ. मिलिंद बागुल, अशोक निकम, मिलिंद यादव, किसन चव्हाण, रोहिणी शिंदे यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  विशेष संघटन पुरस्कार नानासाहेब पटाईत यांना प्रदान करण्यात आला. तर अनिल माळी, भारती भोये, अशोक दाणी, गंगाधर खुरकुटे, मिलिंद शिरसाठ, रमेश पवार, शांताराम गांगुर्डे, शिवाजी माळी, गणेश अहिरे, दिगंबर नारायणे, कल्पना जगताप, के. के. गांगुर्डे, अन्सारी शिफक अहमद अजीज शेख, वंदना भोये या शिक्षकांचा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.