शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शालार्थ आयडीसाठी शिक्षकांची अडवणूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:06 IST

शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नाशिक : शिक्षकांचे वेतन सुरू होण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या शालार्थ आयडी प्रणालीच्या माध्यमातून शालार्थ आयडीचे वितरण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक कार्यालयात साडेचारशेच्या दरम्यान फाईल पेंडिंग असल्याने शिक्षक संघटनांकडून याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालक अशी दोन पदे एकाच अधिकाºयाकडे असल्याने शिक्षकांची दुहेरी अडचण होत असून, शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालकपदी त्वरित कायमस्वरूपी अधिकारी नेमण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. नाशिक विभागात शालार्थ आयडीच्या सुमारे २ हजार २०० फाईली पेंडिंग होत्या. याविरोधात शिक्षक संघटनांनी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात आंदोलने, मोर्चे काढत त्यांची संख्या साडेचारशेवर आणली आहे. मात्र, नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातून या फाईली मार्गी लावायला अद्यापही मुहूर्त मिळत नसल्याने अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून संशय घेतला जात आहे. या स्थितीत शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय, महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी कार्यालय, वेतन पथकाच्या कार्यालयाजवळ मध्यस्थांचा वावर वाढलेला दिसून येत आहे. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या सेवानिवृत्तीनंतर हे पद अजूनही रिक्त असून, या पदाचा कार्यभार सध्या माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे आहे. महापालिका शिक्षण प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांची बढती झाल्याने त्यांच्या रिक्त पदाचा कार्यभार उदय देवरे यांच्याकडे आहे. या दोन्ही पदांवर प्रभारी अधिकारी असल्याने शिक्षकांना त्यांच्या समस्यांविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.उपसंचालकांची करावी लागते प्रतीक्षानाशिक विभागीय उपसंचालक कार्यालयामध्ये नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांतून शिक्षक त्यांच्या समस्या घेऊन येतात. मात्र, उपसंचालक भेटत नसल्याने शिक्षकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. तर शिक्षिकांसोबत लहान बाळेही सोबत असल्याने त्यांची हेळसांड होताना दिसते. शिवाय नाशिकपर्यंत येण्या-जाण्याचा खर्च करूनही अनेकदा उपसंचालकांची भेट होत नसल्याने शिक्षकांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याची तक्रार शिक्षकांमधून दबक्या आवाजात होताना दिसून येत आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र