शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

दाखले मिळवाताना होतेय शिक्षकांची त्रेधातिरपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 22:48 IST

सोयगांव : जिल्ह्यातील ग्रामीण व काही शहरी भागात जि. प. व माध्यमिक, उच्च माध्य शिक्षकांना मात्र नवीन प्रवेशासाठी दाखले व विद्यार्थी मिळवताना मोठी त्रेधातिरपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देमुलांना शाळेत पाठवण्यास नकार

सोयगांव : जिल्ह्यातील ग्रामीण व काही शहरी भागात जि. प. व माध्यमिक, उच्च माध्य शिक्षकांना मात्र नवीन प्रवेशासाठी दाखले व विद्यार्थी मिळवताना मोठी त्रेधातिरपीट करावी लागत आहे.करोनामुळे अगोदरच शिक्षण क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले असून पालक मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देतांना दिसताय.दरवर्षी जुन महिन्यात राज्यातील सर्वच शाळा सुरू होतात. नवीन प्रवेशासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांची लगबग सुरू होते. बहुत करून शहरी भागातील पालक इंग्रजी माध्यमातील शाळांना प्राधान्य देतात. ग्रामीण भागातील काही पालक ही त्याच मार्गाने म्हणजे मराठी माध्मालाच पसंती देतात. प्रवेश घेतांना शाळा इमारत, सुविधा, शिक्षण दर्जा, वाहन सुविधा आदीबाबी विचारात घेऊन प्रवेश निश्चिती होते.तुकडी वाचवण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट असल्याने कोणत्याही परिस्थितीत शाळेचा पट राखण्यासाठी शाळेतील शिक्षक मे महिन्यापासूनच विद्यार्थी शोध मोहीम चालू होते. ह्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.विद्यार्थी मिळवणे म्हणजे गड जिंकल्यासारखे झाले.करोना काळात हॉस्पिटल मिळणे अवघड तसे नवीन विद्यार्थी मिळणे झाले.मिळेल तिथून हजार पाचशे देऊन विद्यार्थी व दाखला आणणे हेच काम महत्त्वाचे झाले आहे.मुळातच आता राज्यात शिक्षित पालक असल्याने लोकसंख्या नियंत्रित झाली आहे, हम दो हमारे दो यावरून लोकं आता हम दो हमारा एक यावर येऊन थांबलेत. मग जुन्या नियमाप्रमाणे शाळेत विद्यार्थी संख्या नियंत्रित झाली. मात्र काहीही झाले तरी शाळेत नवीन विद्यार्थी व दाखले आणा अन्यथा परिणामास तयार राहा अशी तंबी दिली जातेय. त्यामुळे शिक्षक जीवाचे रान करून दाखला मिळेल तिकडे जाण्यास तयार होतोय. त्यात काही शिक्षकांनी तर दाखले विकणे हा व्यवसाय करून ठेवला आहे. ह्या पद्धतीमूळे काही विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंड न पाहता दहावी, बारावी पर्यंत मजल मारली असून स्वतः चे नाव लिहीता येत नाही अशी अवस्था आहे.त्यामुळे शासनाने जन्म दर लक्ष्यात घेऊन शाळा, तुकडी, विद्यार्थी संख्या निश्चित करावी. तसेच शाळांनी इमारत सुधारणा, सुविधा ह्याबाबत सुधारणा करावी.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा