शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दाखले मिळवाताना होतेय शिक्षकांची त्रेधातिरपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 22:48 IST

सोयगांव : जिल्ह्यातील ग्रामीण व काही शहरी भागात जि. प. व माध्यमिक, उच्च माध्य शिक्षकांना मात्र नवीन प्रवेशासाठी दाखले व विद्यार्थी मिळवताना मोठी त्रेधातिरपीट करावी लागत आहे.

ठळक मुद्देमुलांना शाळेत पाठवण्यास नकार

सोयगांव : जिल्ह्यातील ग्रामीण व काही शहरी भागात जि. प. व माध्यमिक, उच्च माध्य शिक्षकांना मात्र नवीन प्रवेशासाठी दाखले व विद्यार्थी मिळवताना मोठी त्रेधातिरपीट करावी लागत आहे.करोनामुळे अगोदरच शिक्षण क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान झाले असून पालक मुलांना शाळेत पाठवण्यास नकार देतांना दिसताय.दरवर्षी जुन महिन्यात राज्यातील सर्वच शाळा सुरू होतात. नवीन प्रवेशासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक यांची लगबग सुरू होते. बहुत करून शहरी भागातील पालक इंग्रजी माध्यमातील शाळांना प्राधान्य देतात. ग्रामीण भागातील काही पालक ही त्याच मार्गाने म्हणजे मराठी माध्मालाच पसंती देतात. प्रवेश घेतांना शाळा इमारत, सुविधा, शिक्षण दर्जा, वाहन सुविधा आदीबाबी विचारात घेऊन प्रवेश निश्चिती होते.तुकडी वाचवण्यासाठी विद्यार्थी संख्येची अट असल्याने कोणत्याही परिस्थितीत शाळेचा पट राखण्यासाठी शाळेतील शिक्षक मे महिन्यापासूनच विद्यार्थी शोध मोहीम चालू होते. ह्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे.विद्यार्थी मिळवणे म्हणजे गड जिंकल्यासारखे झाले.करोना काळात हॉस्पिटल मिळणे अवघड तसे नवीन विद्यार्थी मिळणे झाले.मिळेल तिथून हजार पाचशे देऊन विद्यार्थी व दाखला आणणे हेच काम महत्त्वाचे झाले आहे.मुळातच आता राज्यात शिक्षित पालक असल्याने लोकसंख्या नियंत्रित झाली आहे, हम दो हमारे दो यावरून लोकं आता हम दो हमारा एक यावर येऊन थांबलेत. मग जुन्या नियमाप्रमाणे शाळेत विद्यार्थी संख्या नियंत्रित झाली. मात्र काहीही झाले तरी शाळेत नवीन विद्यार्थी व दाखले आणा अन्यथा परिणामास तयार राहा अशी तंबी दिली जातेय. त्यामुळे शिक्षक जीवाचे रान करून दाखला मिळेल तिकडे जाण्यास तयार होतोय. त्यात काही शिक्षकांनी तर दाखले विकणे हा व्यवसाय करून ठेवला आहे. ह्या पद्धतीमूळे काही विद्यार्थ्यांनी शाळेचे तोंड न पाहता दहावी, बारावी पर्यंत मजल मारली असून स्वतः चे नाव लिहीता येत नाही अशी अवस्था आहे.त्यामुळे शासनाने जन्म दर लक्ष्यात घेऊन शाळा, तुकडी, विद्यार्थी संख्या निश्चित करावी. तसेच शाळांनी इमारत सुधारणा, सुविधा ह्याबाबत सुधारणा करावी.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा