शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

द्राक्षांवर करपा, कांद्यावर दिसू लागली फूलकीड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 02:36 IST

सततच्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, तर एक-दोन महिन्याच्या कांदा पिकावर फूलकीड दिसू लागली असून काही ठिकाणी जमिनीत बुरशी तयार झाल्याने तयार किंवा काढणीयोग्य कांदा सडू लागल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी करून या रोगांचा प्रादुर्भाव रोखावा असा सल्ला देण्यात आला आहे. जेथे गव्हाची अगाद पेरणी झाली आहे तेथे ओंबी बारीक राहिल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे

ठळक मुद्देढगाळ हवामान : जमिनीतील बुरशीमुळे कांदा सडण्याची शक्यता

नाशिक : सततच्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, तर एक-दोन महिन्याच्या कांदा पिकावर फूलकीड दिसू लागली असून काही ठिकाणी जमिनीत बुरशी तयार झाल्याने तयार किंवा काढणीयोग्य कांदा सडू लागल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी करून या रोगांचा प्रादुर्भाव रोखावा असा सल्ला देण्यात आला आहे. जेथे गव्हाची अगाद पेरणी झाली आहे तेथे ओंबी बारीक राहिल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या हवामानाच्या खेळामुळे वातावरणात गारव्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष आणि कांदा ही पिके संकटात आली आहेत. द्राक्षांच्या मणी वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या भागात डिसेंबरमध्ये पाऊस पडला आहे, त्या भागातील काही द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून पिंपळगाव बसवंत येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रात काही नमुने तपासणीसाठी आले असल्याने त्यास दुजोरा मिळत आहे. सकाळी पडणारे दव आणि त्यानंतरचे ढगाळ वातावरण यामुळे नवीन बागांवर डावणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लेट छाटणीच्या बागांना सध्या तरी फारसा धोका दिसत नाही. ढगाळ वातावरणामुळे जमिनीत बुरशी वाढू लागली आहे. यामुळे जमिनीत कांदा सडू लागल्याची उदाहरणेही समोर येऊ लागली आहेत.

रब्बीतील गहू आणि हरभरा या पिकांना फारसा धोका नसला तरी, मध्यंतरीच्या पावसामुळे काही ठिकाणी गव्हाचे तुरे पिवळे पडल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. कडक ऊन पडल्यानंतर ते गहू पुन्हा पूर्वपदावर येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. फुलोऱ्यात येणाऱ्या हरभऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस अळी पडण्याची शक्यता असते. यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी, असा सल्ला दिला जात आहे.

१५ पासून पाहणी

बदलत्या हवामानामुळे गव्हावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आणि रोगांची माहिती घेण्यासाठी निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्यावतीने येत्या १५ जानेवारीपासून जिल्ह्याच्या विविध भागात पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना रोगनियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच औषध फवारणीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती