शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

द्राक्षांवर करपा, कांद्यावर दिसू लागली फूलकीड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 02:36 IST

सततच्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, तर एक-दोन महिन्याच्या कांदा पिकावर फूलकीड दिसू लागली असून काही ठिकाणी जमिनीत बुरशी तयार झाल्याने तयार किंवा काढणीयोग्य कांदा सडू लागल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी करून या रोगांचा प्रादुर्भाव रोखावा असा सल्ला देण्यात आला आहे. जेथे गव्हाची अगाद पेरणी झाली आहे तेथे ओंबी बारीक राहिल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे

ठळक मुद्देढगाळ हवामान : जमिनीतील बुरशीमुळे कांदा सडण्याची शक्यता

नाशिक : सततच्या ढगाळ हवामानामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे, तर एक-दोन महिन्याच्या कांदा पिकावर फूलकीड दिसू लागली असून काही ठिकाणी जमिनीत बुरशी तयार झाल्याने तयार किंवा काढणीयोग्य कांदा सडू लागल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी करून या रोगांचा प्रादुर्भाव रोखावा असा सल्ला देण्यात आला आहे. जेथे गव्हाची अगाद पेरणी झाली आहे तेथे ओंबी बारीक राहिल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या हवामानाच्या खेळामुळे वातावरणात गारव्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष आणि कांदा ही पिके संकटात आली आहेत. द्राक्षांच्या मणी वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या भागात डिसेंबरमध्ये पाऊस पडला आहे, त्या भागातील काही द्राक्षबागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला असून पिंपळगाव बसवंत येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रात काही नमुने तपासणीसाठी आले असल्याने त्यास दुजोरा मिळत आहे. सकाळी पडणारे दव आणि त्यानंतरचे ढगाळ वातावरण यामुळे नवीन बागांवर डावणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लेट छाटणीच्या बागांना सध्या तरी फारसा धोका दिसत नाही. ढगाळ वातावरणामुळे जमिनीत बुरशी वाढू लागली आहे. यामुळे जमिनीत कांदा सडू लागल्याची उदाहरणेही समोर येऊ लागली आहेत.

रब्बीतील गहू आणि हरभरा या पिकांना फारसा धोका नसला तरी, मध्यंतरीच्या पावसामुळे काही ठिकाणी गव्हाचे तुरे पिवळे पडल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे. कडक ऊन पडल्यानंतर ते गहू पुन्हा पूर्वपदावर येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. फुलोऱ्यात येणाऱ्या हरभऱ्यावर या महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस अळी पडण्याची शक्यता असते. यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी, असा सल्ला दिला जात आहे.

१५ पासून पाहणी

बदलत्या हवामानामुळे गव्हावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी आणि रोगांची माहिती घेण्यासाठी निफाड येथील गहू संशोधन केंद्राच्यावतीने येत्या १५ जानेवारीपासून जिल्ह्याच्या विविध भागात पाहणी करण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना रोगनियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्याबरोबरच औषध फवारणीविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती