शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

निफाड तालुक्यातील करवसुली निम्म्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:39 IST

सायखेडा : वर्षभर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागात घटलेले आर्थिक उत्पादन, तोट्यात गेलेली द्राक्ष शेती यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याचा परिणाम थेट ग्रामपंचायत करवसुलीवर झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ निम्मी करवसुली झाली आहे.

ठळक मुद्देदैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे.

सायखेडा : वर्षभर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे वाढलेली बेरोजगारी, ग्रामीण भागात घटलेले आर्थिक उत्पादन, तोट्यात गेलेली द्राक्ष शेती यामुळे आर्थिक कोंडी निर्माण झाल्याचा परिणाम थेट ग्रामपंचायत करवसुलीवर झाला असून, यंदाच्या आर्थिक वर्षात तालुक्यात केवळ निम्मी करवसुली झाली आहे.वार्षिक ताळेबंद हा मार्च महिन्यात असतो. दरवर्षी मार्च महिना सुरू होईपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी थकीत आणि चालू वर्षाचे कर भरत असतात. यंदा मात्र मार्च महिना सुरू झाला असला तरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व कर भरण्यास नागरिकांची टाळाटाळ सुरू आहे. वर्षभर असणारा कोरोना आणि त्यामुळे गेलेली हातातील कामे यामुळे चार पैसे गाठीशी आले नाहीत, बेरोजगारी वाढली, कुटुंब चालवणे अवघड असताना कर कुठून भरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. द्राक्ष शेती सलग दुसऱ्या वर्षी तोट्यात आहे. खर्चसुद्धा वसूल होत नाही, अशा परिस्थितीत बँक कर्ज, मुलांचे लग्न, घर खर्च, शिक्षण, दैनंदिन गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे.ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळत नाही, त्यामुळे पैसे कोठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत कर भरण्याकडे पाठ फिरवली आहे.ग्रामपंचायत वर्षभर जमा होणाऱ्या करातून कर्मचाऱ्यांचे पगार, पाणी पुरवठा, किरकोळ दुरुस्ती, लाईट बिल, फर्निचर, स्टेशनरी अशी कामे करीत असते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच यांच्या मर्जीतील दोन किंवा तीन माणसांना कर्मचारी म्हणून घेतले आहे. आज पगार वेळेत होत नसल्याने तेच कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.कधी नव्हे; इतका ग्रामपंचायत कर थकीत झाला आहे. विविध कारणांनी नागरिक अडचणीत आले असले तरी ग्रामपंचायत ही आपल्या गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. वसुली झाली नाही तर कामे करणे अवघड होईल, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.- संदीप कराड, गटविकास अधिकारी पंचायत समिती, निफाड.सन एप्रिल २०२० ते मार्च २०२१घरपटीचे उद्दिष्ट१५ कोटी ४४ लाखझालेली वसुली७ कोटी ८४ लाखपाणीपट्टीचे उद्धिष्ट७ कोटी २५लाखझालेली वसुली३ कोटी२२ लाखथकीत रक्कम११ कोटी

टॅग्स :nifadनिफाडTaxकर