शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

शेतकऱ्यांना पटविण्याचे काम तलाठ्यांकडे

By admin | Updated: July 9, 2017 00:11 IST

नाशिक : तलाठ्यांचे शेतकऱ्याशी जवळचे नाते असल्याने त्याचा उपयोग समृद्धी महामार्गाच्या जमिनी खरेदीसाठी करून घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गाव पातळीवर तलाठ्यांचे प्रत्येक शेतकऱ्याशी जवळचे नाते असल्याने त्याचा उपयोग समृद्धी महामार्गाच्या जमिनी खरेदीसाठी करून घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी तातडीने सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समृद्धी महामार्गात जागा जाणाऱ्या शेतकऱ्यांना पटविण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींचे दर शुक्रवारी जिल्हा समितीने जाहीर केले असून, त्यात हेक्टरी ४० ते ८० लाखांपर्यंत वाढीव दर देण्यात आले आहेत. परंतु या महामार्गाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात घेता शेतकरी जागा देतील का? याविषयी प्रशासनालाच साशंकता वाटू लागली आहे. त्यामुळेच की काय दुसऱ्या शनिवारची शासकीय सुटी असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी सिन्नर व इगतपुरीच्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीत समृद्धी महामार्ग ज्या गावातून जाणार आहे त्या गावातील तलाठ्यांना समृद्धी महामार्गाची माहिती देण्यात आली, तसेच या महामार्गासाठी कोणत्या गावातून किती हेक्टर तसेच कोणते गट जातील याबाबत अवगत करण्यात आले आहे. समितीने जमिनीचे दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळविण्यासाठी तलाठ्यांनी त्या त्या शेतकऱ्यांशी आपणहून संपर्क साधून त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले. समितीने जमिनीचे दर कसे ठरविले याबाबत तलाठ्यांना माहिती असायला हवी म्हणून या दर निश्चितीची पद्धती त्यांना समजावून सांगण्यात आली. बैठकीस उपजिल्हाधिकारी महेश पाटील, राहुल पाटील, विठ्ठल सोनवणे राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.