शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

शेतकऱ्यांना पटविण्याचे काम तलाठ्यांकडे

By admin | Updated: July 9, 2017 00:11 IST

नाशिक : तलाठ्यांचे शेतकऱ्याशी जवळचे नाते असल्याने त्याचा उपयोग समृद्धी महामार्गाच्या जमिनी खरेदीसाठी करून घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गाव पातळीवर तलाठ्यांचे प्रत्येक शेतकऱ्याशी जवळचे नाते असल्याने त्याचा उपयोग समृद्धी महामार्गाच्या जमिनी खरेदीसाठी करून घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी शनिवारी शासकीय सुटीच्या दिवशी तातडीने सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समृद्धी महामार्गात जागा जाणाऱ्या शेतकऱ्यांना पटविण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींचे दर शुक्रवारी जिल्हा समितीने जाहीर केले असून, त्यात हेक्टरी ४० ते ८० लाखांपर्यंत वाढीव दर देण्यात आले आहेत. परंतु या महामार्गाला सुरुवातीपासून शेतकऱ्यांचा असलेला विरोध लक्षात घेता शेतकरी जागा देतील का? याविषयी प्रशासनालाच साशंकता वाटू लागली आहे. त्यामुळेच की काय दुसऱ्या शनिवारची शासकीय सुटी असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी सिन्नर व इगतपुरीच्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. या बैठकीत समृद्धी महामार्ग ज्या गावातून जाणार आहे त्या गावातील तलाठ्यांना समृद्धी महामार्गाची माहिती देण्यात आली, तसेच या महामार्गासाठी कोणत्या गावातून किती हेक्टर तसेच कोणते गट जातील याबाबत अवगत करण्यात आले आहे. समितीने जमिनीचे दर जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळविण्यासाठी तलाठ्यांनी त्या त्या शेतकऱ्यांशी आपणहून संपर्क साधून त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले. समितीने जमिनीचे दर कसे ठरविले याबाबत तलाठ्यांना माहिती असायला हवी म्हणून या दर निश्चितीची पद्धती त्यांना समजावून सांगण्यात आली. बैठकीस उपजिल्हाधिकारी महेश पाटील, राहुल पाटील, विठ्ठल सोनवणे राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.