शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

नांदगाव तालुक्यात ५९,८०६ हेक्टर क्षेत्रावरचे पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:14 IST

नांदगाव (संजीव धामणे) : तालुक्यात यंदा खरीप हंगामात ५९,८०६ हेक्टर क्षेत्रावरचे पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बोलठाण, वेहेळगाव, जातेगाव ...

नांदगाव (संजीव धामणे) : तालुक्यात यंदा खरीप हंगामात ५९,८०६ हेक्टर क्षेत्रावरचे पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. बोलठाण, वेहेळगाव, जातेगाव या मंडळांमध्ये रोहिणी नक्षत्र मध्येच पेरणीयोग्य पाऊस झाल्याने, १० जूनपर्यंत ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. जूनअखेर १६८ टक्के पाऊस तालुक्यात झाला. त्यामुळे खरीप कामांना वेग आला आहे. यंदा सोयाबीन, मूग, तूर या पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली असून, सोयाबीन १७० हे. मूग ५,७०० हे. व तूर ८३९ क्षेत्रावर लागवड झाली आहे. कपाशीचे क्षेत्रात घट झाली आहे.

‘कमी खर्च अधिक उत्पादन’ या धोरणानुसार, मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी बियाणे उगवण क्षमता चाचणी, बीजप्रक्रिया मोहीम, रासायनिक खतांमध्ये दहा टक्के बचत अंतर्गत जैविक खतांचा वापर व हिरवळीच्या खतांचा वापर, युरिया तणनाशकासोबत कोरड्या मातीत फेकणे थांबविणे यासाठी मोहीम राबविण्यात आली. तणनाशकासोबत युरियाचा वापर थांबविण्याबाबत पत्रके वाटण्यात आली. सध्या भुईमूग आऱ्या फुटण्याच्या अवस्थेत, मूग शेंगा लागण्याच्या अवस्थेत, बाजरी व मका पोटरीत येण्याच्या अवस्थेत सोयाबीन, कपाशीवाढीच्या अवस्थेत असून, पीक परिस्थिती उत्तम आहे. काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवत असून, त्यासाठी पक्षी थांबे लावणे, इमामेक्टिन फवारणे या उपाययोजनांसाठी प्रचार मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतीशाळा, कीड रोग सर्वेक्षण मोहीम, विकेल ते पिकेल अंतर्गत मका प्रात्यक्षिक याद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

-----------------------

रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहन

नांदगाव तालुक्याची २५ जुलैअखेर २१४ मिमी पावसाची सरासरी असताना ३६४ मिलीमीटर म्हणजेच १७० टक्के पर्जन्यवृष्टी झाली असून, ती जिल्ह्यात सर्वाधिक आहे. रासायनिक खतांमध्ये २० हजार मे. टन तालुक्यासाठी मंजूर झाले आहे. ४,७५० टन युरियाचा पुरवठा झाला आहे. नत्र, स्फुरद, पालाश या तीनही घटकांची पिकांना गरज असून, युरियाचा जास्त वापर केल्यास पिकांची वाढ जास्त होणे व फुले लागणे, दाणे भरणे यांच्यावर परिणाम होतो, तसेच कीड रोगाचे प्रमाण वाढते, म्हणून रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा व नत्र खताचा अतिरिक्त वापर टाळावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

----------------------------

तुती लागवड मोहीम

नावीन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग वाढविण्यासाठी तुती लागवड मोहीम घेण्यात आली आहे. चैतन्य पाटील, अनिल हिरे, दत्तू शेलार, सतीश मढे, कृष्णा सूर्यवंशी या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने आत्मा आणि कृषी विभाग, रेशीम विभागाच्या मदतीने म.गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गोंडेगाव हे गाव तुरीचे गाव म्हणून ओळख निर्माण करीत आहे, या गावात गोरख जाधव यांनी कृषी विभागाच्या मदतीने एक एकर प्रात्यक्षिक राबवून तूर पीक लागवडीची प्रेरणा घेतली. गेल्या वर्षी ११ एकर क्षेत्रावर ९० क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. या हंगामात गोरख जाधव यांच्या मार्गदर्शनाने गोंडेगावातील ८० टक्के शेतकऱ्यांनी तुरीचे बीडीएन ७५१ वाणाचे सलग पीक घेतले आहे.

(२७ नांदगाव १)

270721\27nsk_7_27072021_13.jpg

२७ नांदगाव १