शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

येवला तालुक्यात १३ गावे, दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 01:02 IST

येवला तालुक्यातील १३ गावे आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तर तालुक्यातील नगरसूल, सायगाव, राजापूर येथील १४ वाड्या-वस्त्यांसह सोमठाण जोश गावाला पाणी टंचाई जाणवू लागल्याने त्यांचे टँकर मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत.

येवला : तालुक्यातील १३ गावे आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तर तालुक्यातील नगरसूल, सायगाव, राजापूर येथील १४ वाड्या-वस्त्यांसह सोमठाण जोश गावाला पाणी टंचाई जाणवू लागल्याने त्यांचे टँकर मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत.

तालुक्यात वाढत्या उन्हाच्या चटक्याबरोबरच पाणी मागणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदाही वाढत्या उन्हाबरोबरच पाणी मागणाऱ्या गावांची संख्या वाढती आहे. सद्य:स्थितीत तालुक्यातील ममदापूर, जायदरे, हडपसावरगाव, कोळगाव, वाईबोथी, खरवंडी, देवदरी, भुलेगाव, कोळम खुर्द व बुद्रुक, तळवाडे (शिवाजीनगर), रेंडाळे, आडसुरेगाव, पिंपळखुटे बुद्रुक (पगारेवस्ती) या १३ गावे आणि दोन वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. तीन शासकीय व चार खासगी अशा एकूण सात टँकरद्वारे १८ खेपा रोज केल्या जात आहेत. तालुक्यातील नगरसूल येथील दहा वाड्या-वस्त्या, सायगाव येथील महादेव वाडी, राजापूर येथील तीन वाड्या- वस्त्या आणि सोमठाण जोश या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागल्याने या गाव-वाड्यांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झालेले आहेत.

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीने केलेल्या आराखड्यात तिसऱ्या टप्प्यात ४७ गावे आणि २८ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwater scarcityपाणी टंचाई