शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कमी पाऊस पडूनही जिल्ह्यातील टॅँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:28 IST

पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत शासनाने मुदत दिली असल्याने जिल्ह्यातील २६९ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर रविवारपासून बंद करण्यात आले असून, ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

नाशिक : पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत शासनाने मुदत दिली असल्याने जिल्ह्यातील २६९ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर रविवारपासून बंद करण्यात आले असून, ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टॅँकर  मंजुरीचे अधिकार शासनाला असल्यामुळे ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल त्यासाठी मुदतवाढीचे नवीन प्रस्ताव तहसीलदारांना सादर करावे लागणार आहेत.नाशिक जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा मुद्दा पुढे करून मार्च महिन्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली होती. त्यातही काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी दबाव टाकल्यामुळे टॅँकर सुरू होऊ शकले होते. एप्रिल व मे महिन्यात  जिल्ह्णात उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे टंचाईत वाढ होऊन गावोगावी टॅँकरची मागणी वाढली होती.  साधारणत: जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन नद्या, नाल्यांना पाणी येते तसेच विहिरींचे स्रोत प्रवाहित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटत असल्याची शासनाची  भावना आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले असून, जून महिन्याचा पाऊस लांबणीवर पडला आहे. मात्र सरकारचे नियम, निकष बदलायला तयार नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टॅँकर बंद झाल्याने पुन्हा एकदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव सिन्नर तहसील कार्यालयाने पाठविला आहे.२६९ गावांचा समावेशच्जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ११९ गावे, २२२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु शेवटच्या आठवड्यात मान्सूनने चांगली हजेरी लावल्यामुळे २२ टॅँकरची संख्या कमी झाली होती. असे असले तरी, शासनाने टंचाई कृती आराखड्यानुसार ३० जूनपर्यंतच टंचाईग्रस्त गावांना टॅँकर सुरू करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे रविवारी जिल्ह्यातील सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा या सहा तालुक्यातील २६९ गावांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर बंद करून टाकले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई