शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

कमी पाऊस पडूनही जिल्ह्यातील टॅँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:28 IST

पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत शासनाने मुदत दिली असल्याने जिल्ह्यातील २६९ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर रविवारपासून बंद करण्यात आले असून, ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

नाशिक : पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणाऱ्या टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून अखेरपर्यंत शासनाने मुदत दिली असल्याने जिल्ह्यातील २६९ गावे, वाड्यांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर रविवारपासून बंद करण्यात आले असून, ग्रामीण भागातील जनतेला पुन्हा एकदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. टॅँकर  मंजुरीचे अधिकार शासनाला असल्यामुळे ज्या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल त्यासाठी मुदतवाढीचे नवीन प्रस्ताव तहसीलदारांना सादर करावे लागणार आहेत.नाशिक जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना प्रशासनाने जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा मुद्दा पुढे करून मार्च महिन्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली होती. त्यातही काही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी दबाव टाकल्यामुळे टॅँकर सुरू होऊ शकले होते. एप्रिल व मे महिन्यात  जिल्ह्णात उष्णतेची लाट निर्माण झाल्यामुळे टंचाईत वाढ होऊन गावोगावी टॅँकरची मागणी वाढली होती.  साधारणत: जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन नद्या, नाल्यांना पाणी येते तसेच विहिरींचे स्रोत प्रवाहित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटत असल्याची शासनाची  भावना आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले असून, जून महिन्याचा पाऊस लांबणीवर पडला आहे. मात्र सरकारचे नियम, निकष बदलायला तयार नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टॅँकर बंद झाल्याने पुन्हा एकदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव सिन्नर तहसील कार्यालयाने पाठविला आहे.२६९ गावांचा समावेशच्जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील ११९ गावे, २२२ वाड्यांना ८९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु शेवटच्या आठवड्यात मान्सूनने चांगली हजेरी लावल्यामुळे २२ टॅँकरची संख्या कमी झाली होती. असे असले तरी, शासनाने टंचाई कृती आराखड्यानुसार ३० जूनपर्यंतच टंचाईग्रस्त गावांना टॅँकर सुरू करण्याचे आदेश दिलेले असल्यामुळे रविवारी जिल्ह्यातील सिन्नर, येवला, मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा या सहा तालुक्यातील २६९ गावांना पाणीपुरवठा करणारे ६७ टॅँकर बंद करून टाकले आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई