शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

तलाठी परीक्षेचे सर्व्हर डाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:11 IST

महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.

नाशिक : महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.महापरीक्षेंतर्गत शहरात गेल्या २ तारखेपासून तलाठी पदासाठीची परीक्षा सुरू आहे. मात्र या परीक्षेसंदर्भातील अनेक अडचणी अजूनही समोर येत असून, मंगळवारी शहरातील व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निकल इन्सिट्यूट या परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. शहरातील विविध सहा केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जात असून, सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत परीक्षा घेतली जात आहे. सकाळी १० वाजता सकाळचे सत्र तर दुपारी २ वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार सकाळी १० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आले होते. नियमानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे कागदपत्रे तपासली जात असतानाच सर्व्हर डाउन असल्याचे परीक्षा केंद्रप्रमुखाच्या लक्षात आले. त्यांनी वारंवार प्रयत्न केला तसेच शासनाच्या परीक्षा नियंत्रकांनादेखील याबाबतची माहिती दिली. परंतु परीक्षेच्या निर्धारित वेळेत म्हणजे दहा वाजेपर्यंत सर्व्हर सुरू होऊ न शकल्याने अखेर परीक्षा रद्द करावी लागली.या परीक्षेसाठी उमेदवाराने ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्राच्या आवारात असावे, असा परीक्षेचा निमय आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक निर्धारित वेळेत केंद्रावर हजर होते. परंतु व्ही. एन. नाईक याा केंद्रातील सर्व्हर डाउन झाल्यानंतर कोणताही कमांड घेत नसल्याने महापरीक्षेला सदर बाब कळविण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या बॅचची परीक्षा रद्द झाली, मात्र दुपार सत्रातील परीक्षा मात्र सुरळीत पार पडली.अडचणी कायम उमेदवारांच्या तक्रारीतलाठी परीक्षा गेल्या २ तारखेपासून सुरू असून परीक्षेतील अडचणींच्या अनेक कथा ऐकायला मिळत आहे. अनेक केंद्रांवर मुलांना अडचणी येत असताना विद्यार्थ्यांचे मात्र समाधान होऊ शकलेले नसताना पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. यापूर्वी अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या अडचणी आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने परीक्षेचा कालावधी वाढला असून, एका केंद्रावर दररोज किमान १५० ते २०० विद्यार्थ्यांची परीक्षा देत आहेत.

टॅग्स :onlineऑनलाइनGovernmentसरकार