शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

तलाठी परीक्षेचे सर्व्हर डाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:11 IST

महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.

नाशिक : महाराष्ट शासनाच्या वतीने घेतल्या जात असलेल्या तलाठी भरती परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे सर्व्हर डाउन झाल्याने परीक्षाच देता आली नाही. या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परतावे लागले असून, या विद्यार्थ्यांसाठी येत्या तीन ते चार दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.महापरीक्षेंतर्गत शहरात गेल्या २ तारखेपासून तलाठी पदासाठीची परीक्षा सुरू आहे. मात्र या परीक्षेसंदर्भातील अनेक अडचणी अजूनही समोर येत असून, मंगळवारी शहरातील व्ही. एन. नाईक पॉलिटेक्निकल इन्सिट्यूट या परीक्षा केंद्रावर सर्व्हर डाउन झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. शहरातील विविध सहा केंद्रांवर सदर परीक्षा घेतली जात असून, सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांत परीक्षा घेतली जात आहे. सकाळी १० वाजता सकाळचे सत्र तर दुपारी २ वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेतली जात आहे. त्यानुसार सकाळी १० वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आले होते. नियमानुसार विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे कागदपत्रे तपासली जात असतानाच सर्व्हर डाउन असल्याचे परीक्षा केंद्रप्रमुखाच्या लक्षात आले. त्यांनी वारंवार प्रयत्न केला तसेच शासनाच्या परीक्षा नियंत्रकांनादेखील याबाबतची माहिती दिली. परंतु परीक्षेच्या निर्धारित वेळेत म्हणजे दहा वाजेपर्यंत सर्व्हर सुरू होऊ न शकल्याने अखेर परीक्षा रद्द करावी लागली.या परीक्षेसाठी उमेदवाराने ३० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्राच्या आवारात असावे, असा परीक्षेचा निमय आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक निर्धारित वेळेत केंद्रावर हजर होते. परंतु व्ही. एन. नाईक याा केंद्रातील सर्व्हर डाउन झाल्यानंतर कोणताही कमांड घेत नसल्याने महापरीक्षेला सदर बाब कळविण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या बॅचची परीक्षा रद्द झाली, मात्र दुपार सत्रातील परीक्षा मात्र सुरळीत पार पडली.अडचणी कायम उमेदवारांच्या तक्रारीतलाठी परीक्षा गेल्या २ तारखेपासून सुरू असून परीक्षेतील अडचणींच्या अनेक कथा ऐकायला मिळत आहे. अनेक केंद्रांवर मुलांना अडचणी येत असताना विद्यार्थ्यांचे मात्र समाधान होऊ शकलेले नसताना पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. यापूर्वी अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, तांत्रिक अडचणी आणि कागदपत्र पडताळणीच्या अडचणी आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील ६१ जागांसाठी सुमारे ३० हजारांच्या जवळपास अर्ज आल्याने परीक्षेचा कालावधी वाढला असून, एका केंद्रावर दररोज किमान १५० ते २०० विद्यार्थ्यांची परीक्षा देत आहेत.

टॅग्स :onlineऑनलाइनGovernmentसरकार