शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

वृक्षांना राख्या बांधून घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:08 IST

पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाताळेश्वर विद्यालयातील विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रांगणात असलेल्या वृृक्षांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.  विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे करताना आपल्या विद्यालयातील प्रांगणातील प्रत्येक वृक्षास व रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वृक्षांना राखी बांधून ‘वृक्ष वली आम्हा सोयरे वन चरे’, ‘सदा राखू, वृक्ष लावा वृक्ष जगवा, वृक्ष हीच संपत्ती, एक मूल एक झाड, वृक्ष लावा दारी मिळेल छाया भारी, अशी शपथ घेतली. नारळी पौर्णिमा या सणाचे महत्त्व व रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व सविता देशमुख यांनी सांगितले. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा ºहास होण्याची कारणे सांगून आपण सर्वांनी त्याच्या संवर्धनासाठी धार्मिकतेबरोबर विज्ञानाची जोड देऊन संकल्प केला. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थिनीने एका मुलास राखी बांधून प्रेम, बंधुता, सर्वधर्मसमभाव, स्व-संरक्षण या गुणाची त्याच्याकडे भेट म्हणून मागणी केली व माझ्या रक्षणासाठी तू माझ्या पाठीशी उभे रहावे ही भावना व्यक्त केली. विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी ओम रेवगडे याचे औक्षण करून त्यास सर्व मुलींनी राख्या बांधल्या.  आजच्या दिवसाचे औचित्य साधून वृक्षाचा वाढदिवस साजरा करून राखी बांधली. बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष गोविंद लोखंडे,  संचालक अरूण गरगटे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन अशोक रेवगडे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नवनाथ जाधव,  उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर,  आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, टी. के. रेवगडे, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, आर. आर. गिते, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे हे उपस्थित होते.

टॅग्स :environmentवातावरणRaksha Bandhanरक्षाबंधन