शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

रिकामे हंडे घेऊन महिलांचा टाहो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:07 IST

तीव्र पाणीटंचाई : नवीशेमळीला ग्रा.पं.कार्यालयासमोर ठिय्या

ठळक मुद्देविहीरीची पाण्याची पातळी खालावल्याने महिनाभरापासून गावाला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

नवीशेमळी : उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच बागलाण तालुक्यातील गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ महिलावर्गावर येऊन ठेपली आहे. शनिवारी (दि.५) नवीशेमळी या गावातील ग्रामस्थांसह महिलांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि त्यांनी रिकामे हंडे घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेत ठिय्या मांडला. दरम्यान, प्रशासनाकडून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.नवीशेमळी गावात पाण्यासाठी महिला-ग्रामस्थांना एक महिन्यापासून पायपीट करावी लागत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे महिलांसह ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन दोन तास ठिय्या आंदोलन केले. येथील ग्रामपंचायतीच्या विहिरीला पाणी नसल्याने ग्रामपंचायतीने दुसऱ्या खाजगी विहीरीवरु न पाणी घेऊन ग्रामपंचायतीच्या विहीरीत टाकले मात्र, ह्या विहीरीची पाण्याची पातळी खालावल्याने महिनाभरापासून गावाला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. महिलांनी हंडा मोर्चा व ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरनार यांनी तात्काळ या ठिकाणी भेट देऊन दुसरी विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस पाटील तेजस वाघ यांचेसह संदीप वाघ, दत्तू वाघ, बापू वाघ, दिलीप जाधव, तात्या पाटील, विशाल वाघ, बापू वाघ, मनोहर वाघ, मयूर वाघ, अनिकेत वाघ, सरदार जाधव ,आशूतोष वाघ, राजू वाघ, दादाजी निकम आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई