शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

जे आहे ते जपा; 'अंजनेरी' संवर्धनासाठी हेमंत गोडसेंना निसर्गप्रेमींचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:32 IST

जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणारे लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाडांचा हक्काचा अधिवास आहे, यामुळे हे वन कायमस्वरूपी सुरक्षित करण्याची गरज असल्याचे सांगत महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसर्वांनासोबत घेत फेरविचार करण्याचे आश्वासनगिधाडांचा हक्काचा अधिवास आहेशाश्वत विकासाची कास धरावी

नाशिक : अंजनेरीच्‍या पायथ्यापासून माथ्यापर्यंत प्रस्तावित चौदा किमीचा रस्ता तयार करण्याच्या हालचाली सुरु होताच नाशिककरांसह अन्य शहरांमधूनही कडाडून विरोध होऊ लागला आहे. रस्त्याचा प्रस्ताव तात्काळ मागे घेतला जावा, यासाठी पर्यावरणप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांना शुक्रवारी (दि.23) निवेदनांद्वारे साकडे घातलेङ्घअंजनेरीगडाचे क्षेत्र जैवविविधतेने नटलेले समृद्ध संवर्धन राखीव वन म्हणून राज्य सरकारने 2017साली घोषित केले आहे. या वनाचे संवर्धन पर्यटनाला वाव देण्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे, यामुळे या वनाला मोठ्या प्रमाणात बाधित करणारा संभाव्य प्रस्तावित रस्ता करण्याचा अट्टाहास सोडावा, अशी मागणी आपलं पर्यावरण संस्था, नेचर कॉन्सझर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक, निसर्गभान संस्था, गोविंदनगर ज्‍येष्‍ठ नागरीक संघ, शरण संस्था, इको-एको फाउंडेशन, ग्रीन रिव्हॅल्यूएशन, आम्ही मालेगावकर, गिव्ह फाउंडेशन आदींच्या वतीने देण्यात आलेले निवेदन प्रतिनधिक स्वरूपात अंजनेरी येथील जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या प्रा.जुही पेठे, वृक्षप्रेमी शेखर गायकवाड यांनी दिले.

यावेळी पेठे यांनी गोडसे यांना अंजनेरी हे केवळ एक गड नाही ते समृद्ध जैवविविधता जोपासणारे जिल्ह्याचे वैभवशाली राखीव वन आहे. या वनात अशा काही औषधी वनस्पती आहेत की त्या केवळ येथेच आढळून येतात. जगाच्या पाठीवरून नामशेष होऊ पाहणारे लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीचे गिधाडांचा हक्काचा अधिवास आहे, यामुळे हे वन कायमस्वरूपी सुरक्षित करण्याची गरज असल्याचे सांगत महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी गोडसे यांनीदेखील मी निसर्गाच्या विरोधात नाही, मात्र विकास करण्यासाठी रस्ताही गरजेचा असल्याचे सांगितले. यावेळी जो सध्याच्या रस्ता आहे तो निम्या गडापर्यंत जातो तो अधिक चांगला करुन शाश्वत विकासाची कास धरावी असे गायकवाड यांनी यावेळी नमूद केले. यावेळी याबाबत नक्कीच फेरविचार करु आणि सविस्तर चर्चा सर्वांना सोबत घेऊन करण्याचे आश्वासन गोडसे यांनी दिले. निवेदनांवर विविध स्वयंसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकHemant Godseहेमंत गोडसेanjenriअंजनेरीNatureनिसर्गforest departmentवनविभाग