शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

बदली आरोग्य कर्मचारी देण्यावरून यंत्रणा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:57 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच दाखल होणारे रुग्ण व संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा कामी येत असून, ज्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णांच्या सुश्रूषेसाठी नेमण्यात आले आहे

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच दाखल होणारे रुग्ण व संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा कामी येत असून, ज्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णांच्या सुश्रूषेसाठी नेमण्यात आले आहे त्यांना चौदा दिवसांनंतर क्वॉरंटाइन म्हणजेच विलगीकरण करण्याचे शासनाने आदेश आहेत. मात्र गेल्या दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांची नेमणूक मालेगाव शहरात करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्याने त्यांच्याऐवजी बदली कर्मचारी कोण द्यायचे? असा प्रश्न यंत्रणेपुढे पडला आहे.कोरोनाचा संक्रमण कालावधी चौदा दिवसांचा असून, या काळातच रुग्णाला त्याचे लक्षणे दिसतात व त्याच काळात त्याच्यावर योग्य उपचार होणे जसे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्याच्यावर उपचार करणाºया वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनीदेखील या चौदा दिवसांच्या काळात स्व:तच्या प्रकृतीची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. चौदा दिवसांच्या कालावधीनंतर कोरोनाबाधित रुग्ण बरा होत असल्याचे आजवरच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले असून, संशयित रुग्णांनादेखील चौदा दिवसच क्वॉरंटाइन ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बाधित, संशयित रुग्णांबरोबरच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचाºयांनादेखील चौदा दिवस क्वॉरंटाइन ठेवण्यात यावे, असे मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मालेगाव शहरात सापडत असून, तेथील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेने लगतच्या तालुक्यातील सुमारे १४२ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची सेवा मालेगावी वर्ग करून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हातभार लावला आहे. आजच्या घडीला मालेगावी गेलेल्या या वैद्यकीय पथकामार्फत घरोघरी जाऊन गेल्या दहा दिवसांपासून आरोग्य सर्व्हे करीत आहेत. येत्या दोन, तीन दिवसांत या पथकाला क्वॉरंटाइन करावे लागणार आहे, मात्र या कर्मचाºयांच्या बदल्यात कोण? असा प्रश्न आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पडला आहे.-------------------------प्रश्न कायम : अतिरिक्त मनुष्यबळाची समस्यामुळात मालेगाव तालुक्यात लगतच्या तालुक्यातूनच जिल्हा परिषदेने आपले वैद्यकीय पथक मालेगाव शहरासाठी पाठविले होते. या पथकांच्या गैरहजेरीत अन्य तालुक्याचे कामकाज इतर अधिकाºयांच्या माध्यमातून पार पाडण्यात आले. परंतु आता पुन्हा नव्याने अधिकाºयांची तजवीज कोठून व कशी करणार? असा प्रश्न पडला आहे. मालेगाव शहरात काम करण्यास मुळातच वैद्यकीय पथक नाखूष असले तरी, सद्यपरिस्थिती पाहता मालेगाव शहरासाठी अतिरिक्तमनुष्यबळ कोठून व कसे उपलब्ध करायचे? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक