शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

बदली आरोग्य कर्मचारी देण्यावरून यंत्रणा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:57 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच दाखल होणारे रुग्ण व संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा कामी येत असून, ज्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णांच्या सुश्रूषेसाठी नेमण्यात आले आहे

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच दाखल होणारे रुग्ण व संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा कामी येत असून, ज्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णांच्या सुश्रूषेसाठी नेमण्यात आले आहे त्यांना चौदा दिवसांनंतर क्वॉरंटाइन म्हणजेच विलगीकरण करण्याचे शासनाने आदेश आहेत. मात्र गेल्या दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांची नेमणूक मालेगाव शहरात करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्याने त्यांच्याऐवजी बदली कर्मचारी कोण द्यायचे? असा प्रश्न यंत्रणेपुढे पडला आहे.कोरोनाचा संक्रमण कालावधी चौदा दिवसांचा असून, या काळातच रुग्णाला त्याचे लक्षणे दिसतात व त्याच काळात त्याच्यावर योग्य उपचार होणे जसे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्याच्यावर उपचार करणाºया वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनीदेखील या चौदा दिवसांच्या काळात स्व:तच्या प्रकृतीची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. चौदा दिवसांच्या कालावधीनंतर कोरोनाबाधित रुग्ण बरा होत असल्याचे आजवरच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले असून, संशयित रुग्णांनादेखील चौदा दिवसच क्वॉरंटाइन ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बाधित, संशयित रुग्णांबरोबरच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचाºयांनादेखील चौदा दिवस क्वॉरंटाइन ठेवण्यात यावे, असे मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मालेगाव शहरात सापडत असून, तेथील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेने लगतच्या तालुक्यातील सुमारे १४२ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची सेवा मालेगावी वर्ग करून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हातभार लावला आहे. आजच्या घडीला मालेगावी गेलेल्या या वैद्यकीय पथकामार्फत घरोघरी जाऊन गेल्या दहा दिवसांपासून आरोग्य सर्व्हे करीत आहेत. येत्या दोन, तीन दिवसांत या पथकाला क्वॉरंटाइन करावे लागणार आहे, मात्र या कर्मचाºयांच्या बदल्यात कोण? असा प्रश्न आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पडला आहे.-------------------------प्रश्न कायम : अतिरिक्त मनुष्यबळाची समस्यामुळात मालेगाव तालुक्यात लगतच्या तालुक्यातूनच जिल्हा परिषदेने आपले वैद्यकीय पथक मालेगाव शहरासाठी पाठविले होते. या पथकांच्या गैरहजेरीत अन्य तालुक्याचे कामकाज इतर अधिकाºयांच्या माध्यमातून पार पाडण्यात आले. परंतु आता पुन्हा नव्याने अधिकाºयांची तजवीज कोठून व कशी करणार? असा प्रश्न पडला आहे. मालेगाव शहरात काम करण्यास मुळातच वैद्यकीय पथक नाखूष असले तरी, सद्यपरिस्थिती पाहता मालेगाव शहरासाठी अतिरिक्तमनुष्यबळ कोठून व कसे उपलब्ध करायचे? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक