शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

संवादासाठी सहानुभूतीची आवश्यकता

By admin | Updated: July 22, 2015 01:01 IST

जयप्रकाश काबरा : रामनाथशेठ स्मृती व्याख्यानमाला

नाशिक : भाषा हे संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. विचार आणि आयडियांची देवाण-घेवाण केल्याने ज्ञानात वाढ होते. नेहमी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत जयप्रकाश काबरा यांनी संस्कृती वैभव आयोजित रामनाथशेठ स्मृती व्याख्यानमालेत व्यक्त केले.काबरा यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात मंगेश पाडगावकर यांच्या ‘सांगा कसं जगायचं’ या कवितेने केली. यावेळी जयप्रकाश काबरा यांनी वेगवेगळी उदाहरणे देत संवादाचे महत्त्व अधोरखित केले. माणसाने दु:खाचा बाजार कधीच न मांडता जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीला महत्त्व देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. संवाद बोलून आणि न बोलूनही साधता येतो, असे सांगत आपला चेहरा १४४ प्रकारच्या भावना व्यक्त करत असतो, असे सांगितले. यावेळी पुढे बोलताना काबरा म्हणाले की, भावना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक असल्याचे सांगत व्यक्त न होण्यामुळे हृदयविकाराच्या घटना बळावत असल्याचे ठळकपणे सांगितले. ‘सुसंवादातून आत्मविकास’ हा विषय उलगडून सांगताना काबरा यांनी चार्ली चॅपलीन, आर. के. लक्ष्मण यांच्या अंगी असलेल्या कलेचा उपयोग संवाद साधताना कसा होतो हे उलगडून सांगितले. संवाद म्हणजे केवळ बोलणे नाही तर लक्षपूर्वक ऐकणे आणि ते आत्मसात करणे होय. आईनेदेखील आपल्या पाल्याचे म्हणणे नीट ऐकून त्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. संवाद साधताना अनुभूती नाही, तर सहानुभूतीची आवश्यकता असल्याचे नेहमी लक्षात ठेवायला हवे, असा सल्ला उपस्थिताना दिला.व्याख्यानाच्या सुरुवातीला अतुल चांडक यांनी रामनाथशेठ यांचा जीवनपट उलगडून सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित, उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, अरविंद पाठक, रवींद्र देवधर यांच्यासह स्व. रामनाथशेठ चांडक यांचे नातू अतुल चांडक आणि दीपक चांडक आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले, तर सूत्रसंचालन सुप्रिया देवघरे यांनी केले. (प्रतिनिधी)