शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

संवादासाठी सहानुभूतीची आवश्यकता

By admin | Updated: July 22, 2015 01:01 IST

जयप्रकाश काबरा : रामनाथशेठ स्मृती व्याख्यानमाला

नाशिक : भाषा हे संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. विचार आणि आयडियांची देवाण-घेवाण केल्याने ज्ञानात वाढ होते. नेहमी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत जयप्रकाश काबरा यांनी संस्कृती वैभव आयोजित रामनाथशेठ स्मृती व्याख्यानमालेत व्यक्त केले.काबरा यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात मंगेश पाडगावकर यांच्या ‘सांगा कसं जगायचं’ या कवितेने केली. यावेळी जयप्रकाश काबरा यांनी वेगवेगळी उदाहरणे देत संवादाचे महत्त्व अधोरखित केले. माणसाने दु:खाचा बाजार कधीच न मांडता जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीला महत्त्व देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. संवाद बोलून आणि न बोलूनही साधता येतो, असे सांगत आपला चेहरा १४४ प्रकारच्या भावना व्यक्त करत असतो, असे सांगितले. यावेळी पुढे बोलताना काबरा म्हणाले की, भावना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक असल्याचे सांगत व्यक्त न होण्यामुळे हृदयविकाराच्या घटना बळावत असल्याचे ठळकपणे सांगितले. ‘सुसंवादातून आत्मविकास’ हा विषय उलगडून सांगताना काबरा यांनी चार्ली चॅपलीन, आर. के. लक्ष्मण यांच्या अंगी असलेल्या कलेचा उपयोग संवाद साधताना कसा होतो हे उलगडून सांगितले. संवाद म्हणजे केवळ बोलणे नाही तर लक्षपूर्वक ऐकणे आणि ते आत्मसात करणे होय. आईनेदेखील आपल्या पाल्याचे म्हणणे नीट ऐकून त्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. संवाद साधताना अनुभूती नाही, तर सहानुभूतीची आवश्यकता असल्याचे नेहमी लक्षात ठेवायला हवे, असा सल्ला उपस्थिताना दिला.व्याख्यानाच्या सुरुवातीला अतुल चांडक यांनी रामनाथशेठ यांचा जीवनपट उलगडून सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित, उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, अरविंद पाठक, रवींद्र देवधर यांच्यासह स्व. रामनाथशेठ चांडक यांचे नातू अतुल चांडक आणि दीपक चांडक आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले, तर सूत्रसंचालन सुप्रिया देवघरे यांनी केले. (प्रतिनिधी)