शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

संवादासाठी सहानुभूतीची आवश्यकता

By admin | Updated: July 22, 2015 01:01 IST

जयप्रकाश काबरा : रामनाथशेठ स्मृती व्याख्यानमाला

नाशिक : भाषा हे संवादाचे महत्त्वाचे साधन आहे. विचार आणि आयडियांची देवाण-घेवाण केल्याने ज्ञानात वाढ होते. नेहमी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा, असे मत जयप्रकाश काबरा यांनी संस्कृती वैभव आयोजित रामनाथशेठ स्मृती व्याख्यानमालेत व्यक्त केले.काबरा यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात मंगेश पाडगावकर यांच्या ‘सांगा कसं जगायचं’ या कवितेने केली. यावेळी जयप्रकाश काबरा यांनी वेगवेगळी उदाहरणे देत संवादाचे महत्त्व अधोरखित केले. माणसाने दु:खाचा बाजार कधीच न मांडता जन्मभूमीपेक्षा कर्मभूमीला महत्त्व देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. संवाद बोलून आणि न बोलूनही साधता येतो, असे सांगत आपला चेहरा १४४ प्रकारच्या भावना व्यक्त करत असतो, असे सांगितले. यावेळी पुढे बोलताना काबरा म्हणाले की, भावना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक असल्याचे सांगत व्यक्त न होण्यामुळे हृदयविकाराच्या घटना बळावत असल्याचे ठळकपणे सांगितले. ‘सुसंवादातून आत्मविकास’ हा विषय उलगडून सांगताना काबरा यांनी चार्ली चॅपलीन, आर. के. लक्ष्मण यांच्या अंगी असलेल्या कलेचा उपयोग संवाद साधताना कसा होतो हे उलगडून सांगितले. संवाद म्हणजे केवळ बोलणे नाही तर लक्षपूर्वक ऐकणे आणि ते आत्मसात करणे होय. आईनेदेखील आपल्या पाल्याचे म्हणणे नीट ऐकून त्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. संवाद साधताना अनुभूती नाही, तर सहानुभूतीची आवश्यकता असल्याचे नेहमी लक्षात ठेवायला हवे, असा सल्ला उपस्थिताना दिला.व्याख्यानाच्या सुरुवातीला अतुल चांडक यांनी रामनाथशेठ यांचा जीवनपट उलगडून सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर संस्कृती वैभवचे अध्यक्ष नंदन दीक्षित, उपाध्यक्ष पी. एस. कुलकर्णी, अरविंद पाठक, रवींद्र देवधर यांच्यासह स्व. रामनाथशेठ चांडक यांचे नातू अतुल चांडक आणि दीपक चांडक आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदन दीक्षित यांनी केले, तर सूत्रसंचालन सुप्रिया देवघरे यांनी केले. (प्रतिनिधी)